शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई काँग्रेसचे भांडण दिल्लीदरबारी

By admin | Updated: August 22, 2015 01:30 IST

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांच्यातील शीतयुद्ध थांबवा, असे साकडे प्रदेश काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी थेट काँग्रेसचे

अतुल कुलकर्णी, मुंबईमुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांच्यातील शीतयुद्ध थांबवा, असे साकडे प्रदेश काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी थेट काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना घातले आहे. आपापसांतल्या भांडणात मुंबईत पक्षच शिल्लक राहणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली असल्याचे समजते.राजीव गांधी पुण्यतिथी दिनाच्या दिवशीच दोन नेत्यांमधली दुफळी उघडपणे पाहायला मिळाली. निरुपम यांनी जाहीर केलेल्या मोटारसायकल रॅलीकडे पूर्णपणे पाठ फिरवत कामत सकाळी जाऊन राजीव गांधींना पुष्पांजली अर्पण करून आले. त्यानंतर एक तासाने निरुपम आणि अन्य आमदार मोटारसायकल रॅलीने तेथे आले. माजी मंत्री नसीम खान यांनीही रॅलीकडे पाठ फिरवली. निरुपम यांनी मुंबई काँग्रेसच्या बॅनरवर केवळ उत्तर भारतीयांचे मेळावे घेणे सुरू केले, याआधी तसे कधीही घडले नव्हते असा दावा एक गट करत असताना कामत गट कामच करू देत नाही, असा आक्षेप निरुपम गटातर्फे घेतला जात आहे. दिल्लीत राहुल गांधींकडे याबाबत चर्चा झाली. मराठी माणूस शिवसेनेसोबत जातो, कोकणातला माणूसदेखील पोटनिवडणुकीत जर नारायण राणे यांच्या सोबत उभा राहिला नाही. त्यामुळे उत्तर भारतीयांचे नेतृत्व कसे स्वीकारणार, असा युक्तीवादही गांधींना ऐकवण्यात आला. गुजराती मतं भाजपाची साथ सोडणार नाहीत, मुस्लीम मतांचे विभाजन करण्यासाठी एमआयएम आहेच. दक्षिण भारतीय मतदार उमेदवार पाहून निर्णय घेईल. तर उत्तर भारतीय मतदार देखील पूर्णत: काँग्रेससोबत नाही. मतदारांची ही फाटाफूट आहे आणि २२७ नगरसेवकांच्या मुंबई महापालिकेत काँग्रेसचे ५२ नगरसेवक असूनही त्यांनी एकत्र येऊन कधी महापालिका दणाणून सोडल्याचे उदाहरण औषधाला सुध्दा नाही. हेच चित्र कायम राहिले तर मुंबई महापालिकेत अवघ्या पंधरा जागा येणे देखील अवघड होऊन बसेल, अशा स्पष्ट शब्दात खा. गांधींना परिस्थिती सांगण्यात आल्याचे समजते. निरुपम यांच्या आधी जनार्दन चांदूरकर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. पण त्यांच्या काळात पक्ष चर्चेत नव्हता, पण त्याआधी कृपाशंकर सिंह अध्यक्षपदी असताना त्यांनी सतत कार्यक्रम घेऊन पक्ष संघटनेत चैतन्य आणले. परंतु त्यांनाही कामत यांनी काम करु दिले नाही. आता निरुपम यांच्या बाबतीतही तेच होत आहे, असा दावा निरुपम समर्थकांचा आहे.मराठी माणूस सेनेसोबत जातो, कोकणातला माणूस पोटनिवडणुकीत नारायण राणे यांच्यासोबत उभा राहिला नाही. त्यामुळे उत्तर भारतीयांचे नेतृत्व कसे स्वीकारणार, असेही गांधींना सांगण्यात आले.माझी लढाई भाजपा-शिवसेनेसोबत आहे. आमच्यात काही मतभेद असतील तर आपापसांत बसवून ते मिटवले पाहिजेत. काही चुकत असेल तर सांगितले पाहिजे. आज आम्ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेच्या बाहेर फेकले गेलो आहोत याची जाणीव ठेवून सगळ्यांनी झोकून देऊन काम केले पाहिजे. पण कोणी त्यात व्यक्तिगत स्वार्थाला महत्त्व देत असेल तर त्याला मी काय करणार?- संजय निरुपम, मुंबई काँग्रेस अध्यक्ष