शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
2
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
3
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
4
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
5
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
6
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
7
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
8
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
9
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
10
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
11
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
12
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
13
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
14
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
15
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
16
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
17
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
18
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
19
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
20
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

मुंबई कॉँग्रेसचे ‘नोट पे चर्चा’ अभियान

By admin | Updated: November 18, 2016 06:46 IST

केंद्र सरकारने हजार आणि पाचशेच्या नोटांवर बंदी घातल्यापासून देशभर मोठे वादळ निर्माण झाले आहे.

मुंबई : केंद्र सरकारने हजार आणि पाचशेच्या नोटांवर बंदी घातल्यापासून देशभर मोठे वादळ निर्माण झाले आहे. नोटाबंदी म्हणजे काळ्या पैशावरील बिनतोड कारवाई असल्याचा दावा भाजपा करीत असली तरी या निर्णयामुळे केवळ सामान्य जनतेच्या अडचणी वाढल्याचा आरोप करीत विरोधक आक्रमक झाले आहेत. मुंबई काँग्रेसने याच मुद्द्यावरून ‘नोट पे चर्चा’ या अभियानाची घोषणा केली आहे. आगामी महापालिका निवडणूक पाहता नोटाबंदीचे राजकारण दीर्घकाळ रंगण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात पत्रकारांना संबोधित करताना नोट पे चर्चा अभियानाची घोषणा केली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य जनतेच्याच अडचणी वाढल्या आहेत. स्वत:चेच पैसे काढण्यासाठी लोकांना बँकेसमोर ताटकळत उभे राहावे लागत आहे. या मनस्तापामुळे आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यूदेखील झालेला आहे. नोटाबंदीमुळे घरातील लग्नकार्य, रुग्णांचे उपचार अडले आहेत. डायमंड मार्केट, ज्वेलरी मार्केट, रिटेल मार्केट, हॉटेल इंडस्ट्री, हेल्थकेअर इंडस्ट्री, होम अप्लायंस, फार्मा इंडस्ट्री, लेदर इंडस्ट्री, कपडा मार्केट अशा सर्व इंडस्ट्रीला ७० ते ८० टक्के फटका बसला आहे. त्यामुळे बेरोजगारीचा धोका वाढल्याचे निरुपम म्हणाले. जनतेला अडचणींचा सामना करावा लागत असतानाच मल्ल्यासारख्या ६३ कर्जबुडव्यांना कर्जे माफ करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. माफ केलेल्या कर्जाचा आकडा ७ हजार कोटींच्या वर असून, या मेहेरबानीचे कारण मोदींनी जनतेला सांगावे, असे आव्हानही निरुपम यांनी दिले. (प्रतिनिधी)