शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

मुंबई कॉँग्रेसचे ‘नोट पे चर्चा’ अभियान

By admin | Updated: November 18, 2016 06:46 IST

केंद्र सरकारने हजार आणि पाचशेच्या नोटांवर बंदी घातल्यापासून देशभर मोठे वादळ निर्माण झाले आहे.

मुंबई : केंद्र सरकारने हजार आणि पाचशेच्या नोटांवर बंदी घातल्यापासून देशभर मोठे वादळ निर्माण झाले आहे. नोटाबंदी म्हणजे काळ्या पैशावरील बिनतोड कारवाई असल्याचा दावा भाजपा करीत असली तरी या निर्णयामुळे केवळ सामान्य जनतेच्या अडचणी वाढल्याचा आरोप करीत विरोधक आक्रमक झाले आहेत. मुंबई काँग्रेसने याच मुद्द्यावरून ‘नोट पे चर्चा’ या अभियानाची घोषणा केली आहे. आगामी महापालिका निवडणूक पाहता नोटाबंदीचे राजकारण दीर्घकाळ रंगण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात पत्रकारांना संबोधित करताना नोट पे चर्चा अभियानाची घोषणा केली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य जनतेच्याच अडचणी वाढल्या आहेत. स्वत:चेच पैसे काढण्यासाठी लोकांना बँकेसमोर ताटकळत उभे राहावे लागत आहे. या मनस्तापामुळे आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यूदेखील झालेला आहे. नोटाबंदीमुळे घरातील लग्नकार्य, रुग्णांचे उपचार अडले आहेत. डायमंड मार्केट, ज्वेलरी मार्केट, रिटेल मार्केट, हॉटेल इंडस्ट्री, हेल्थकेअर इंडस्ट्री, होम अप्लायंस, फार्मा इंडस्ट्री, लेदर इंडस्ट्री, कपडा मार्केट अशा सर्व इंडस्ट्रीला ७० ते ८० टक्के फटका बसला आहे. त्यामुळे बेरोजगारीचा धोका वाढल्याचे निरुपम म्हणाले. जनतेला अडचणींचा सामना करावा लागत असतानाच मल्ल्यासारख्या ६३ कर्जबुडव्यांना कर्जे माफ करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. माफ केलेल्या कर्जाचा आकडा ७ हजार कोटींच्या वर असून, या मेहेरबानीचे कारण मोदींनी जनतेला सांगावे, असे आव्हानही निरुपम यांनी दिले. (प्रतिनिधी)