शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई काँग्रेसमध्ये पुन्हा नाराजीनाट्य

By admin | Updated: January 21, 2017 06:00 IST

मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

मुंबई : मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप होत आला आहे. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी निरुपम यांच्या नकारात्मक कार्यपद्धतीमुळे महापालिका निवडणुकीतील उमेदवार निवडीच्या प्रक्रियेतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मुंबई काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण उफाळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुरुदास कामत यांनी शुक्रवारी संजय निरुपमांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. सतत डावलण्यात येत असल्याने उमेदवार निवड समितीतून बाहेर पडत असल्याचा मेसेज काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पाठविला आहे. निरुपम यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे हा निर्णय घेतला असून, यापुढे तिकिटासाठी इच्छुक उमेदवारांनी संबंधित जिल्हाध्यक्ष आणि आमदारांशी संपर्क साधावा. मी उमेदवार निवड प्रक्रियेतून बाहेर पडत असल्याचे कामत यांनी आपल्या मेसेजमध्ये म्हटले आहे. निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार निवडीच्या चर्चेसाठी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गुरुदास कामत यांनी या बैठकीवरही बहिष्कार टाकला. बैठकीला संजय निरुपम, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, नसीम खान, चरणजितसिंग सप्रा, अमीन पटेल, अस्लम शेख आदी नेते उपस्थित होते. दरम्यान, कामत यांच्यावर आपण निवडणुकीनंतर बोलू, असे सांगत संजय निरुपम यांनी या विषयावर बोलणे टाळले. सध्या फक्त भाजपा आणि शिवसेनेविरोधात लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशानुसार उमेदवार निवडीसाठी एक प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. या प्रक्रियेवर कामतांसह सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली असून, त्यावर सर्वांच्या स्वाक्षऱ्याही आहेत. त्यामुळे या प्रक्रियेनुसारच उमेदवार निवडले जातील, असेही निरुपम यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>विश्वासात न घेतल्याचा आरोपयापूर्वीही संजय निरुपम यांच्या कार्यशैलीवरून मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. अलीकडेच कोकणवासीयांच्या मेळाव्यादरम्यानही कामत यांनी मुंबई काँग्रेसमधील घडामोडींवर नाराजी व्यक्त केली होती. पक्षाचा जाहीरनामा तयार करण्याच्या कामात कोणालाच विश्वासात घेतले जात नसून परस्पर निर्णय घेतले जात असल्याचा आरोप केला होता.