शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

मुंबईकरांना स्वस्त पर्याय!

By admin | Updated: May 10, 2014 01:12 IST

दक्षिण मुंबईमध्ये वीजपुरवठा करणार्‍या बेस्टच्या क्षेत्रात टाटा पॉवर या वीज कंपनीला वीज वितरणाची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.

मुंबई : दक्षिण मुंबईमध्ये वीजपुरवठा करणार्‍या बेस्टच्या क्षेत्रात टाटा पॉवर या वीज कंपनीला वीज वितरणाची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे सातत्याने होणार्‍या बेस्टच्या महागड्या वीजदरांपासून दक्षिण मुंबईतील ग्राहकांची सुटका होणार असून त्यांना आता टाटा पॉवरची स्वस्त वीज घेता येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत प्रामुख्याने चार वीज कंपन्या विजेचा पुरवठा करतात. मुंबई शहरात बेस्ट विजेचे वितरण करत आहे, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरांत टाटा पॉवर, रिलायन्स आणि महावितरण या कंपन्या विजेचे वितरण करत आहेत. उपनगरांत प्रामुख्याने रिलायन्स आणि टाटा पॉवर या दोन वीज कंपन्यांमध्ये स्पर्धा असून रिलायन्सच्या तुलनेत टाटाची वीज स्वस्त आहे. परिणामी, आपसूकच उपनगरांतील रिलायन्सचे ग्राहक स्वस्त विजेसाठी टाटाची निवड करत आहेत. मुंबईच्या उपनगरांतील ग्राहकांसह शहरांतील ग्राहकांना आकर्षित करण्यात टाटाने यापूर्वीच प्रयत्न केले होते. परंतु, बेस्टने टाटा पॉवरच्या या कामात खोडा घातला होता. शिवाय, टाटाला शहरात वीजपुरवठा करण्यास ना-हरकत दाखला देण्यास नकार दर्शवला होता. मात्र, सरतेशेवटी २००९ साली बेस्ट आणि टाटा पॉवरमधील वाद अखेर राज्य वीज नियामक आयोगाच्या दारी दाखल झाला होता. आयोगानेही बेस्टच्या विरोधात निकाल दिला होता. शिवाय, टाटा पॉवरने बेस्टची यंत्रणा वापरून अथवा स्वत:ची वीजयंत्रणा उभारून ग्राहकांना वीज वितरीत करावी, असे स्पष्ट केले होते. मात्र, यावर बेस्टने केंद्रीय वीज लवादाचे दार ठोठावले होते. परंतु, लवादानेही आयोगाचा निर्णय कायम ठेवला. परिणामी, बेस्टने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. शहरात विजेचे वितरण करताना टाटा पॉवरला बेस्टची वीजयंत्रणा वापरता येणार नाही. त्यासाठी बेस्टची परवानगी लागेल. शिवाय, आयोगाला या प्रकरणी निकाल देण्याचा अधिकार नाही, अशा अनेक मुद्यांचा ऊहापोह बेस्टने दाखल केलेल्या याचिकेत केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने बेस्टचे सर्वच मुद्दे फेटाळून लावले. शिवाय, ज्या वीज कंपनीकडे वीज वितरणाचा परवाना असेल, अशा कंपनीकडे वीजजोडणी मागितल्यास त्यांना वीजजोडणी देण्याचे बंधन संबंधित कंपनीवर आहे, असे म्हणत टाटाला शहरात वीज वितरणाची परवानगी दिली आहे. दरम्यान, टाटा पॉवर कंपनीने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. शिवाय, आता दक्षिण मुंबईतील वीजग्राहकांना त्यांच्या पसंतीची आणि स्वस्त वीज घेता येईल, असे म्हणत येथील ग्राहकांना दिलासा दिला आहे. तसेच ग्राहकांना स्वस्त दरात वीज आणि उत्तम सेवा देण्यात येईल, असा दावादेखील कंपनीने केला आहे. (प्रतिनिधी)