शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई बेजार

By admin | Updated: September 22, 2016 02:41 IST

मागील आठवड्यातील गुरुवारपासून मुंबई शहर आणि उपनगरात सुरू झालेल्या पावसाने आपला मारा अद्यापही कायम ठेवला आहे.

मुंबई : मागील आठवड्यातील गुरुवारपासून मुंबई शहर आणि उपनगरात सुरू झालेल्या पावसाने आपला मारा अद्यापही कायम ठेवला आहे. बुधवारी तर मुंबईत पडलेल्या पावसाची १४२.६ मिलीमीटर एवढी नोंद झाली असून, दिवसभर कोसळलेल्या या पावसामुळे धावत्या मुंबईला ब्रेक लावल्याचे चित्र होते. सलग सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकर बेजार झाल्याचे चित्र आहे.गेल्या आठवड्यातील गुरुवारी मध्य भारतावर निर्माण झालेली वातावरणीय चक्राकार स्थिती, पश्चिम बंगालवरील कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे पावसाने राज्यासह मुंबईत जोर पकडला. गेल्या आठवड्यातील गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारी काही काळ घेतलेली विश्रांती वगळता, जलधारांचा मारा सुरूच आहे. बुधवारी सकाळी झालेल्या वातावरणीय बदलामुळे पाऊस उघडीप घेईल, असा अंदाज मुंबईकरांना होता. मात्र, मंगळवारी रात्रभर पडलेल्या पावसाने बुधवारी सकाळपासून जोरदार मारा सुरू केला.बुधवारी सकाळी कुलाबा, फोर्ट, मरिन ड्राइव्ह, गिरगाव, भायखळा, लालबाग, लोअर परळ, परळ, वरळी, माहीम, दादर, माटुंगा आणि सायन येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. पूर्व उपनगरात कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथेही सकाळी पावसाने तुफान हजेरी लावली. पश्चिम उपनगरात वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, बोरीवली आणि गोरेगाव येथे सकाळी हजेरी लावलेल्या मुसळधार पावसाने धावत्या मुंबईला काहीसा ब्रेक लावला. दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे शहरासह उपनगरातील रस्ते वाहतूक मंदावली, तर ठिकठिकाणी वाहतूककोंडीमुळे मुंबईकरांचा अर्धाधिक वेळ प्रवासात गेल्याचे चित्र होते. मुंबई शहरात डॉ. बाबासाहेब आंबडेकर मार्ग, पूर्व उपनगरात लालबहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला-अंधेरी रोड, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, कुर्ला-सीएसटी रोड, घाटकोपर येथील असल्फा रोड आणि पश्चिम उपनगरात एस.व्ही. रोडवरील वाहतुकीचा वेग पावसामुळे मंदावला होता. विशेषत: सकाळऐवजी सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)>गारव्यात वाढमागील सहा दिवसांपासून शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २८, २६ अंशांच्या आसपास नोंदवण्यात येत आहे. मुंबईतील गारव्यात वाढ झाली असून, पुढील ७२ तासांसाठी कमाल, किमान तापमान स्थिर राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.