शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई बेजार

By admin | Updated: September 22, 2016 02:41 IST

मागील आठवड्यातील गुरुवारपासून मुंबई शहर आणि उपनगरात सुरू झालेल्या पावसाने आपला मारा अद्यापही कायम ठेवला आहे.

मुंबई : मागील आठवड्यातील गुरुवारपासून मुंबई शहर आणि उपनगरात सुरू झालेल्या पावसाने आपला मारा अद्यापही कायम ठेवला आहे. बुधवारी तर मुंबईत पडलेल्या पावसाची १४२.६ मिलीमीटर एवढी नोंद झाली असून, दिवसभर कोसळलेल्या या पावसामुळे धावत्या मुंबईला ब्रेक लावल्याचे चित्र होते. सलग सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकर बेजार झाल्याचे चित्र आहे.गेल्या आठवड्यातील गुरुवारी मध्य भारतावर निर्माण झालेली वातावरणीय चक्राकार स्थिती, पश्चिम बंगालवरील कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे पावसाने राज्यासह मुंबईत जोर पकडला. गेल्या आठवड्यातील गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारी काही काळ घेतलेली विश्रांती वगळता, जलधारांचा मारा सुरूच आहे. बुधवारी सकाळी झालेल्या वातावरणीय बदलामुळे पाऊस उघडीप घेईल, असा अंदाज मुंबईकरांना होता. मात्र, मंगळवारी रात्रभर पडलेल्या पावसाने बुधवारी सकाळपासून जोरदार मारा सुरू केला.बुधवारी सकाळी कुलाबा, फोर्ट, मरिन ड्राइव्ह, गिरगाव, भायखळा, लालबाग, लोअर परळ, परळ, वरळी, माहीम, दादर, माटुंगा आणि सायन येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. पूर्व उपनगरात कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथेही सकाळी पावसाने तुफान हजेरी लावली. पश्चिम उपनगरात वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, बोरीवली आणि गोरेगाव येथे सकाळी हजेरी लावलेल्या मुसळधार पावसाने धावत्या मुंबईला काहीसा ब्रेक लावला. दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे शहरासह उपनगरातील रस्ते वाहतूक मंदावली, तर ठिकठिकाणी वाहतूककोंडीमुळे मुंबईकरांचा अर्धाधिक वेळ प्रवासात गेल्याचे चित्र होते. मुंबई शहरात डॉ. बाबासाहेब आंबडेकर मार्ग, पूर्व उपनगरात लालबहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला-अंधेरी रोड, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, कुर्ला-सीएसटी रोड, घाटकोपर येथील असल्फा रोड आणि पश्चिम उपनगरात एस.व्ही. रोडवरील वाहतुकीचा वेग पावसामुळे मंदावला होता. विशेषत: सकाळऐवजी सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)>गारव्यात वाढमागील सहा दिवसांपासून शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २८, २६ अंशांच्या आसपास नोंदवण्यात येत आहे. मुंबईतील गारव्यात वाढ झाली असून, पुढील ७२ तासांसाठी कमाल, किमान तापमान स्थिर राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.