शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

मुंबई बेजार

By admin | Updated: September 22, 2016 02:41 IST

मागील आठवड्यातील गुरुवारपासून मुंबई शहर आणि उपनगरात सुरू झालेल्या पावसाने आपला मारा अद्यापही कायम ठेवला आहे.

मुंबई : मागील आठवड्यातील गुरुवारपासून मुंबई शहर आणि उपनगरात सुरू झालेल्या पावसाने आपला मारा अद्यापही कायम ठेवला आहे. बुधवारी तर मुंबईत पडलेल्या पावसाची १४२.६ मिलीमीटर एवढी नोंद झाली असून, दिवसभर कोसळलेल्या या पावसामुळे धावत्या मुंबईला ब्रेक लावल्याचे चित्र होते. सलग सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकर बेजार झाल्याचे चित्र आहे.गेल्या आठवड्यातील गुरुवारी मध्य भारतावर निर्माण झालेली वातावरणीय चक्राकार स्थिती, पश्चिम बंगालवरील कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे पावसाने राज्यासह मुंबईत जोर पकडला. गेल्या आठवड्यातील गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारी काही काळ घेतलेली विश्रांती वगळता, जलधारांचा मारा सुरूच आहे. बुधवारी सकाळी झालेल्या वातावरणीय बदलामुळे पाऊस उघडीप घेईल, असा अंदाज मुंबईकरांना होता. मात्र, मंगळवारी रात्रभर पडलेल्या पावसाने बुधवारी सकाळपासून जोरदार मारा सुरू केला.बुधवारी सकाळी कुलाबा, फोर्ट, मरिन ड्राइव्ह, गिरगाव, भायखळा, लालबाग, लोअर परळ, परळ, वरळी, माहीम, दादर, माटुंगा आणि सायन येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. पूर्व उपनगरात कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथेही सकाळी पावसाने तुफान हजेरी लावली. पश्चिम उपनगरात वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, बोरीवली आणि गोरेगाव येथे सकाळी हजेरी लावलेल्या मुसळधार पावसाने धावत्या मुंबईला काहीसा ब्रेक लावला. दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे शहरासह उपनगरातील रस्ते वाहतूक मंदावली, तर ठिकठिकाणी वाहतूककोंडीमुळे मुंबईकरांचा अर्धाधिक वेळ प्रवासात गेल्याचे चित्र होते. मुंबई शहरात डॉ. बाबासाहेब आंबडेकर मार्ग, पूर्व उपनगरात लालबहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला-अंधेरी रोड, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, कुर्ला-सीएसटी रोड, घाटकोपर येथील असल्फा रोड आणि पश्चिम उपनगरात एस.व्ही. रोडवरील वाहतुकीचा वेग पावसामुळे मंदावला होता. विशेषत: सकाळऐवजी सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)>गारव्यात वाढमागील सहा दिवसांपासून शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २८, २६ अंशांच्या आसपास नोंदवण्यात येत आहे. मुंबईतील गारव्यात वाढ झाली असून, पुढील ७२ तासांसाठी कमाल, किमान तापमान स्थिर राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.