शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पूल १६ सप्टेंबरपासून बंद

By admin | Updated: September 13, 2016 14:32 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक ८ वरील उल्हासनदीवर ४३ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल तिसऱ्यांदा दुरुस्तीयोग्य झाल्याने तज्ज्ञांकडून त्याची तपासणी सुरु आहे.

ऑनलाइन लोकमत 

भाईंदर, दि. १३ -   मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक ८ वरील उल्हासनदीवर ४३ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल तिसऱ्यांदा दुरुस्तीयोग्य झाल्याने तज्ज्ञांकडून त्याची तपासणी सुरु असून त्याचा  अहवाल प्राप्त झाल्यानंतरच दुरुस्तीसाठी त्यावरील वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे एनएचएआय (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणान) कडून सांगण्यात आले आहे. परंतु, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मात्र १६ पासूनच वाहतूक बंद करण्याचे आदेश जरी केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. 

एनएचएआयने १९७३ मध्ये मुंबई ते गुजरातदरम्यानची वाहतूक जलद करण्यासाठी वसई-विरार व मीरा-भाईंदर पालिकेच्या हद्दीवरून वाहणाऱ्या उल्हास नदीवर दोन पदरी वाहतूक पूल बांधला. १९ वर्षांतच या पुलाच्या दुरुस्तीने डोके वर काढले. १९९२-९३ मध्ये दुरुस्तीसाठी हा पूल दोन महिने  वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर डिसेंबर २०१३ मध्ये याच पुलाच्या एका गर्डरला तडा गेल्याची बाब उघडकीस आल्याने तो दुरुस्तीसाठी तब्बल दिड वर्षे त्यावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. यानंतरही या पुलाच्या पडझडीला सुरुवात झाल्याने ऑगस्टमध्ये महाड येथील पुलाच्या दुर्घटनेमुळे त्याची दुरुस्तीसुद्धा आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. त्याचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने ५ ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध केले. त्यानंतर ४ सप्टेंबरपासून एनएचएआयच्या निर्देशानुसार आयआरबी (आयडियल रोड बिल्डर) व एनएचएआयच्या तज्ज्ञांकडून ४३ वर्षीय व १९९५ मध्ये लागतच बांधलेल्या नवीन वाहतूक पुलांची तपासणी सुरु झाली. त्यावेळी जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, गणेशोत्सव काळात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने गणेशोत्सवानंतर दुरुस्ती सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी माहिती जिल्हा प्रशासनासह वाहतूक विभाग व स्थानिक पोलिसाना देण्यात आली. यानुसार जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी १६ सेप्टेंबरपासून जुना वाहतूक पूल दुरुस्तीसाठी बंद करण्याचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. तत्पूर्वी वाहतूक विभागाने या पुलावरील अवजड वाहतूक बंद करुन  हलक्या वाहनांची वाहतूक सुरु ठेवली आहे. परंतु, हा पूल नेमक्या कोणत्या  तारखेपासून वाहतुकीसाठी बंद करायचा त्यासाठी तज्ज्ञांच्या अहवालाची प्रतिक्षा करण्यात येत आहे. या  पूलाच्या दुरुस्तीसाठी १५  दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याला सुमारे ६ महिन्यांचा कालावधी  लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत एनएचएआयचे  व्यवस्थापक  दिनेश अग्रवाल म्हणाले, वाहतूक मंत्रालय, आयआरबी व एनएचएआयसाच्या तज्ज्ञांकडून  अद्याप पुलाची तपासणी सुरु असून त्याचा अहवाल १५ सेप्टेंबरपर्यंत प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. अहवालातील सूचनेनुसारच दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेऊन त्या पुलावरील वाहतूक  पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. 
 
जुन्या पुलाच्या दुरुस्तीनंतर लगतच्या पुलाची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने येथील  वाहतूक कोंडी वर्षभर कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुरुस्तीदरम्यान ठाणे येथून गुजरातकडे जाणारी वाहतूक माजिवडा जंकशन, माणकोली नाका, अंजूर फाटा, चिंचोटी मार्गे महामार्ग क्रमांक ८ वर वळविण्यात येणार आहे. तर मुंबईहून गुजरातकडे जाणारी व मुंबईकडे येणारी दोन्ही बाजूंकडील वाहतूक नवीन पुलावरून सुमारे १५ ते २० मिनिटांच्या थांब्याने सोडण्यात येणार आहे.