शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पूल १६ सप्टेंबरपासून बंद

By admin | Updated: September 13, 2016 14:32 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक ८ वरील उल्हासनदीवर ४३ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल तिसऱ्यांदा दुरुस्तीयोग्य झाल्याने तज्ज्ञांकडून त्याची तपासणी सुरु आहे.

ऑनलाइन लोकमत 

भाईंदर, दि. १३ -   मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक ८ वरील उल्हासनदीवर ४३ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल तिसऱ्यांदा दुरुस्तीयोग्य झाल्याने तज्ज्ञांकडून त्याची तपासणी सुरु असून त्याचा  अहवाल प्राप्त झाल्यानंतरच दुरुस्तीसाठी त्यावरील वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे एनएचएआय (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणान) कडून सांगण्यात आले आहे. परंतु, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मात्र १६ पासूनच वाहतूक बंद करण्याचे आदेश जरी केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. 

एनएचएआयने १९७३ मध्ये मुंबई ते गुजरातदरम्यानची वाहतूक जलद करण्यासाठी वसई-विरार व मीरा-भाईंदर पालिकेच्या हद्दीवरून वाहणाऱ्या उल्हास नदीवर दोन पदरी वाहतूक पूल बांधला. १९ वर्षांतच या पुलाच्या दुरुस्तीने डोके वर काढले. १९९२-९३ मध्ये दुरुस्तीसाठी हा पूल दोन महिने  वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर डिसेंबर २०१३ मध्ये याच पुलाच्या एका गर्डरला तडा गेल्याची बाब उघडकीस आल्याने तो दुरुस्तीसाठी तब्बल दिड वर्षे त्यावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. यानंतरही या पुलाच्या पडझडीला सुरुवात झाल्याने ऑगस्टमध्ये महाड येथील पुलाच्या दुर्घटनेमुळे त्याची दुरुस्तीसुद्धा आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. त्याचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने ५ ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध केले. त्यानंतर ४ सप्टेंबरपासून एनएचएआयच्या निर्देशानुसार आयआरबी (आयडियल रोड बिल्डर) व एनएचएआयच्या तज्ज्ञांकडून ४३ वर्षीय व १९९५ मध्ये लागतच बांधलेल्या नवीन वाहतूक पुलांची तपासणी सुरु झाली. त्यावेळी जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, गणेशोत्सव काळात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने गणेशोत्सवानंतर दुरुस्ती सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी माहिती जिल्हा प्रशासनासह वाहतूक विभाग व स्थानिक पोलिसाना देण्यात आली. यानुसार जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी १६ सेप्टेंबरपासून जुना वाहतूक पूल दुरुस्तीसाठी बंद करण्याचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. तत्पूर्वी वाहतूक विभागाने या पुलावरील अवजड वाहतूक बंद करुन  हलक्या वाहनांची वाहतूक सुरु ठेवली आहे. परंतु, हा पूल नेमक्या कोणत्या  तारखेपासून वाहतुकीसाठी बंद करायचा त्यासाठी तज्ज्ञांच्या अहवालाची प्रतिक्षा करण्यात येत आहे. या  पूलाच्या दुरुस्तीसाठी १५  दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याला सुमारे ६ महिन्यांचा कालावधी  लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत एनएचएआयचे  व्यवस्थापक  दिनेश अग्रवाल म्हणाले, वाहतूक मंत्रालय, आयआरबी व एनएचएआयसाच्या तज्ज्ञांकडून  अद्याप पुलाची तपासणी सुरु असून त्याचा अहवाल १५ सेप्टेंबरपर्यंत प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. अहवालातील सूचनेनुसारच दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेऊन त्या पुलावरील वाहतूक  पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. 
 
जुन्या पुलाच्या दुरुस्तीनंतर लगतच्या पुलाची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने येथील  वाहतूक कोंडी वर्षभर कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुरुस्तीदरम्यान ठाणे येथून गुजरातकडे जाणारी वाहतूक माजिवडा जंकशन, माणकोली नाका, अंजूर फाटा, चिंचोटी मार्गे महामार्ग क्रमांक ८ वर वळविण्यात येणार आहे. तर मुंबईहून गुजरातकडे जाणारी व मुंबईकडे येणारी दोन्ही बाजूंकडील वाहतूक नवीन पुलावरून सुमारे १५ ते २० मिनिटांच्या थांब्याने सोडण्यात येणार आहे.