शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दहावीत मुंबईतील दोघांना ९९ टक्के

By admin | Updated: June 4, 2017 01:35 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) १०वी परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी दुपारी जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्णतेचे प्रमाण

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) १०वी परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी दुपारी जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्णतेचे प्रमाण सुमारे पाच टक्क्यांनी घटले असून, दिल्ली भागात तर ही घट १३.६७ टक्के आहे. चेन्नई विभागाचा निकाल हा ९९.६२ टक्के लागला आहे. जळगावच्या आयुषी राजेंद्र पायघन या विद्यार्थिनीने सर्वाधिक ९९.६० टक्के गुण मिळविले आहेत. तर मुंबईतील दोघांना ९९ टक्के मिळाले.सीबीएसईतर्फे बोर्डाची परीक्षा ९ मार्च ते १० एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती, तर शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा १५ मार्चपासून घेण्यात आली होती. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत एकूण ९०.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर त्रिवेंद्रम विभागातून सर्वाधिक म्हणजे ९९.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई विभाग आहे. या विभागातून ९९.६२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. चेन्नई विभागातून शाळेतून एकूण २३ हजार ३८९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २३ हजार ३३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बोर्डातर्फे परीक्षेला १ लाख ५४ हजार ८६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १ लाख ५४ हजार ४४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. खासगीरीत्या २१० विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यातील फक्त ७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाचाटक्का घसरलागेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्णतेचे प्रमाण सुमारे पाच टक्क्यांनी घटले असून, दिल्ली भागात तर ही घट १३.६७ टक्के आहे. चेन्नई विभागाचा निकाल हा ९९.६२ टक्के लागला आहे. जळगावच्या आयुषी राजेंद्र पायघन या विद्यार्थिनीने सर्वाधिक ९९.६० टक्के गुण मिळविले आहेत.अभ्यासाचा एकच मंत्र आहे, तुम्ही समाधानी असाल तर तुमचा अभ्यास झाला आहे. मी असाच अभ्यास केला. मी खूप ताण घेऊन वर्षभरात कधीच अभ्यास केला नाही. एका दिवसात एका विषयाचा अभ्यास करायचे. अभ्यासातून वेळ काढून बाहेर जाऊन खेळायचे. मला डॉक्टर व्हायचे आहे. त्यामुळे आता ‘नीट’चा अभ्यास सुरू करणार आहे. मला बालरोगतज्ज्ञ व्हायचे आहे. - नीर सावला, ९९.२ टक्के वर्षभरात मी अभ्यासाचा ताण घेतला नव्हता. त्यामुळेच हे शक्य झाले. पाठ्यपुस्तकांचा पूर्ण अभ्यास केला होता. मला इंजिनीअरिंग करायचे आहे. पण मी आयआयटीमध्ये जाणार नाही. कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा याबद्दल विचार सुरू आहे. - आयुष शहा, ९९.४ टक्के अलाहाबाद, चेन्नई, दिल्ली, देहरादून आणि थिरुअनंतपुरम विभागांचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला असून उर्वरित विभागांचा निकाल नंतर जाहीर केला जाईल, असे सीबीएसईने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे. एकूण ९०.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालात मुलांनी बाजी मारली असून मुलींपेक्षा मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ०.९ टक्के इतके अधिक आहे. त्रिवेंद्रम विभागातून सर्वाधिक म्हणजे ९९.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई विभाग आहे.जळगावातील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या आयुषी राजेंद्र पायघन या विद्यार्थिनीने ५०० पैकी सर्वाधिक ४९८ (९९.६० टक्के) गुण मिळविले आहेत. संस्कृत व विज्ञान दोनच विषयात तिला ९९ तर इतर सर्व विषयात १०० गुण मिळाले आहेत.सोलापूरच्या इंडियन मॉडेल स्कूलचा विद्यार्थी विनीत डोके याने ५०० पैकी ४९७ गुण (९९़४ टक्के) मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे़ त्याच्या या यशामुळे त्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. हे यश पुढेही कायम राखण्याचे आव्हान आता सर्व गुणवंतंसमोर आहे.