शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

मुंबईत २,२६७ तर ठाण्यात ८0५ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: February 8, 2017 04:58 IST

मुंबई महापालिका निवडणुकीतील २२७ जागांसाठी एकूण २ हजार २६७ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ३६७ जणांनी आपले अर्ज मागे घेतले

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीतील २२७ जागांसाठी एकूण २ हजार २६७ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ३६७ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. तर शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि समाजवादी पक्षासह मोठ्या प्रमाणावर अपक्षांनी अर्ज दाखल केल्याने बहुतेक प्रभागांमध्ये बहुरंगी लढत आहे. ठाण्यात ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी ८०५ उमेदवार तर उल्हासनगरात ७८ जागेसाठी ४७९ उमेदवार उभे ठाकले असून बहुतेक वॉर्डात तिरंगी अथवा चौरंगी लढती अपेक्षित आहेत.एकीकडे सर्वच प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी अर्ज भरले असले तरी मुंबईतील तीन प्रभागांमध्ये मात्र उलट स्थिती आहे. प्रभाग क्रमांक १०० आणि १५८ मध्ये शिवसेना, भाजपा आणि कॉंग्रेस अशा तीनच पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत तर १२६ मध्ये शिवसेना, मनसे आणि भाजपा अशी तिहेरी लढत आहे. या तीन ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. तर १० प्रभागांमध्ये चौरंगी लढत आहे. याशिवाय प्रभाग ५, ६, ९, २१, २७, ३२, ४६, ५९, ६७, ९९, १८६, १९०, २१७, २१८, २१९ आणि २२४ या सोळा ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे. ठाण्यात विद्यमान ९८ नगरसेवकांचा उमेदवारांमध्ये समावेश असून शेवटच्या दिवसापर्यंत ५५ उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून तब्बल २८८ बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये शिवसेना आणि भाजापमधील अधिक बंडखोरांचा समावेश आहे. आता बुधवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार असून, तब्बल २५ वर्षाच्या मैत्रीनंतर ठाण्यात प्रथमच शिवसेना विरुद्ध भाजपा आणि शिवसेना विरुद्ध आघाडी आणि मनसे असा चौरंगी सामना ठाण्यात रंगणार आहे. येत्या २१ फेबु्रवारी रोजी ठाणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. ३३ प्रभागातून १३१ नगरसेवक हे पालिकेत निवडून जाणार आहेत. यामध्ये ६६ महिलांचा समावेश असणार आहे. प्रभाग क्रमांक तीन मधून काँग्रेसमधून भाजपात डेरेदाखल झालेले जयनाथ पूर्णेकर यांनी अखेरच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली आहे. (प्रतिनिधी)