शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

मुंबईत २,२६७ तर ठाण्यात ८0५ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: February 8, 2017 04:58 IST

मुंबई महापालिका निवडणुकीतील २२७ जागांसाठी एकूण २ हजार २६७ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ३६७ जणांनी आपले अर्ज मागे घेतले

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीतील २२७ जागांसाठी एकूण २ हजार २६७ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ३६७ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. तर शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि समाजवादी पक्षासह मोठ्या प्रमाणावर अपक्षांनी अर्ज दाखल केल्याने बहुतेक प्रभागांमध्ये बहुरंगी लढत आहे. ठाण्यात ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी ८०५ उमेदवार तर उल्हासनगरात ७८ जागेसाठी ४७९ उमेदवार उभे ठाकले असून बहुतेक वॉर्डात तिरंगी अथवा चौरंगी लढती अपेक्षित आहेत.एकीकडे सर्वच प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी अर्ज भरले असले तरी मुंबईतील तीन प्रभागांमध्ये मात्र उलट स्थिती आहे. प्रभाग क्रमांक १०० आणि १५८ मध्ये शिवसेना, भाजपा आणि कॉंग्रेस अशा तीनच पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत तर १२६ मध्ये शिवसेना, मनसे आणि भाजपा अशी तिहेरी लढत आहे. या तीन ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. तर १० प्रभागांमध्ये चौरंगी लढत आहे. याशिवाय प्रभाग ५, ६, ९, २१, २७, ३२, ४६, ५९, ६७, ९९, १८६, १९०, २१७, २१८, २१९ आणि २२४ या सोळा ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे. ठाण्यात विद्यमान ९८ नगरसेवकांचा उमेदवारांमध्ये समावेश असून शेवटच्या दिवसापर्यंत ५५ उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून तब्बल २८८ बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये शिवसेना आणि भाजापमधील अधिक बंडखोरांचा समावेश आहे. आता बुधवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार असून, तब्बल २५ वर्षाच्या मैत्रीनंतर ठाण्यात प्रथमच शिवसेना विरुद्ध भाजपा आणि शिवसेना विरुद्ध आघाडी आणि मनसे असा चौरंगी सामना ठाण्यात रंगणार आहे. येत्या २१ फेबु्रवारी रोजी ठाणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. ३३ प्रभागातून १३१ नगरसेवक हे पालिकेत निवडून जाणार आहेत. यामध्ये ६६ महिलांचा समावेश असणार आहे. प्रभाग क्रमांक तीन मधून काँग्रेसमधून भाजपात डेरेदाखल झालेले जयनाथ पूर्णेकर यांनी अखेरच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली आहे. (प्रतिनिधी)