शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुंबई १६ अंशांवर, दिल्ली ५, अहमदनगर ७ आणि मुंबई १६ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 05:14 IST

उत्तर भारतात पडलेल्या कडाक्याच्या थंडीदरम्यानच महाराष्ट्रही थंडीने गारठून गेला आहे. विशेष म्हणजे उत्तर भारत दाट धुक्यात हरविला असतानाच गुरुवारी दिल्लीचे किमान तापमान ५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

मुंबई  - उत्तर भारतात पडलेल्या कडाक्याच्या थंडीदरम्यानच महाराष्ट्रही थंडीने गारठून गेला आहे. विशेष म्हणजे उत्तर भारत दाट धुक्यात हरविला असतानाच गुरुवारी दिल्लीचे किमान तापमान ५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तर अहमदनगरचे किमान तापमान ७ अंश नोंदविण्यात आले. मुंबईचे (सांताक्रुझ वेधशाळा) किमान तापमान १६.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. घटत्या किमान तापमानामुळे गारवा वाढतच असून, पडलेल्या थंडीने मुंबईकर आता चांगलेच गारठले आहेत.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. दुसरीकडे मुंबईच्या किमान तापमानात मागील तीन दिवसांपासून घट नोंदविण्यात येत आहे. मुंबईचे किमान तापमान सोमवारी १४, मंगळवारी १५ आणि गुरुवारी १६ अंश नोंदविण्यात आले आहे. विशेषत: सकाळी आणि सायंकाळी वाहणारे गार वारे मुंबईच्या थंडीत भर घालत आहेत. येत्या ४८ तासांसाठी किमान तापमान १६ अंशावर स्थिर राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी वाढती थंडी मुंबईकरांना आणखी हुडहुडी भरविणार आहे.राज्यात सर्वांत कमी किमान तापमान अहमदनगर येथे ७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.५ ते ६ जानेवारीदरम्यान विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.५ आणि ६ जानेवारी - किमान तापमान १६ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील. पहाटेच्या वेळी धुके पडण्याची शक्यता आहे.राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमानअंश सेल्सिअसमध्येमुंबई १६.४, अहमदनगर ७, पुणे १२.१, जळगाव ९.४, कोल्हापूर १६.८, महाबळेश्वर १४, मालेगाव १२, नाशिक ९.३, सांगली १४.७, सातारा १२.७, सोलापूर १४.९, औरंगाबाद १२, परभणी १२.४, नांदेड १३, अकोला ११.१, अमरावती १२.६, बुलढाणा १३.३, चंद्रपूर १०.७, गोंदिया ७.२, नागपूर ८.२, वाशिम ११.४, वर्धा १०.६, यवतमाळ १०

टॅग्स :MumbaiमुंबईNatureनिसर्ग