शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

मुंबई १६ अंशांवर, दिल्ली ५, अहमदनगर ७ आणि मुंबई १६ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 05:14 IST

उत्तर भारतात पडलेल्या कडाक्याच्या थंडीदरम्यानच महाराष्ट्रही थंडीने गारठून गेला आहे. विशेष म्हणजे उत्तर भारत दाट धुक्यात हरविला असतानाच गुरुवारी दिल्लीचे किमान तापमान ५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

मुंबई  - उत्तर भारतात पडलेल्या कडाक्याच्या थंडीदरम्यानच महाराष्ट्रही थंडीने गारठून गेला आहे. विशेष म्हणजे उत्तर भारत दाट धुक्यात हरविला असतानाच गुरुवारी दिल्लीचे किमान तापमान ५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तर अहमदनगरचे किमान तापमान ७ अंश नोंदविण्यात आले. मुंबईचे (सांताक्रुझ वेधशाळा) किमान तापमान १६.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. घटत्या किमान तापमानामुळे गारवा वाढतच असून, पडलेल्या थंडीने मुंबईकर आता चांगलेच गारठले आहेत.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. दुसरीकडे मुंबईच्या किमान तापमानात मागील तीन दिवसांपासून घट नोंदविण्यात येत आहे. मुंबईचे किमान तापमान सोमवारी १४, मंगळवारी १५ आणि गुरुवारी १६ अंश नोंदविण्यात आले आहे. विशेषत: सकाळी आणि सायंकाळी वाहणारे गार वारे मुंबईच्या थंडीत भर घालत आहेत. येत्या ४८ तासांसाठी किमान तापमान १६ अंशावर स्थिर राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी वाढती थंडी मुंबईकरांना आणखी हुडहुडी भरविणार आहे.राज्यात सर्वांत कमी किमान तापमान अहमदनगर येथे ७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.५ ते ६ जानेवारीदरम्यान विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.५ आणि ६ जानेवारी - किमान तापमान १६ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील. पहाटेच्या वेळी धुके पडण्याची शक्यता आहे.राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमानअंश सेल्सिअसमध्येमुंबई १६.४, अहमदनगर ७, पुणे १२.१, जळगाव ९.४, कोल्हापूर १६.८, महाबळेश्वर १४, मालेगाव १२, नाशिक ९.३, सांगली १४.७, सातारा १२.७, सोलापूर १४.९, औरंगाबाद १२, परभणी १२.४, नांदेड १३, अकोला ११.१, अमरावती १२.६, बुलढाणा १३.३, चंद्रपूर १०.७, गोंदिया ७.२, नागपूर ८.२, वाशिम ११.४, वर्धा १०.६, यवतमाळ १०

टॅग्स :MumbaiमुंबईNatureनिसर्ग