शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीसाठी बहुसंच प्रश्नपत्रिका

By admin | Updated: February 18, 2017 04:07 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ फेब्रुवारी रोजी घेतल्या जाणाऱ्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस राज्यातील ९ लाख ४८ हजार

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ फेब्रुवारी रोजी घेतल्या जाणाऱ्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस राज्यातील ९ लाख ४८ हजार २३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरला असून, विद्यार्थ्यांना प्रथमच बहुसंच प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना एकूण प्रश्नांपैकी २० टक्के प्रश्नांची दोन उत्तरे द्यावी लागणार आहेत.शिष्यवृत्ती परीक्षेस विद्यार्थ्यांना प्रथमच ए, बी, सी, डी या पद्धतीने प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (पाचवी) उत्तराच्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल. परंतु, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (आठवी) प्रत्येक पेपरमध्ये कमाल २० टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक असून, दोन्ही अचूक पर्याय न नोंदवल्यास शून्य गुण दिले जातील. कोणत्या प्रश्नांची दोन उत्तरे द्यावीत याबाबत विद्यार्थ्यांना स्पष्ट सूचना प्रश्नपत्रिकेत दिल्या जाणार आहेत. प्रवेशपत्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून, तेथून त्याची प्रिंट विद्यार्थ्यांनी काढून घ्यायची आहे, असे परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पद्धतीत बदलराज्याच्या शिक्षण विभागातर्फे यंदा चौथीऐवजी पाचवीच्या विद्यार्थ्यांची आणि सातवीऐवजी आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. इयत्ता पाचवीच्या एकूण ५ लाख ४५ हजार ३५९ तर आठवीच्या ४ लाख २ हजार ८७७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज केला आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी केलेले बदल लक्षात घ्यावेत, असे आवाहन परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.