शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

MSRDC चे प्रकल्प, कार्यालये सौरऊर्जेने उजळणार; संपूर्णपणे अक्षय्य ऊर्जेच्या वापराच्या दिशेने पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 06:01 IST

सल्लागाराला प्रकल्पाचा सुसाध्यता अहवाल तयार करावा लागेल. त्याचबरोबर डीपीआर तयार करून कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदाप्रक्रिया राबवावी लागणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची उभारणी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) राज्यभरातील कार्यालये तसेच प्रकल्प सौर ऊर्जेने उजळून निघणार आहेत. समृद्धी महामार्गालगतच्या मोकळ्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन असून, त्यासाठी लवकरच सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. 

मुंबईतील मुख्यालय, पुणे, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद येथील विभागीय कार्यालये तसेच विविध टोलनाके यांसाठी एमएसआरडीसीला मोठ्या प्रमाणात विजेची गरज भासते. समृद्धी महामार्गावर इगतपुरी येथे आठ किमी लांबीचा तर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उभारण्यात येत असलेल्या मिसिंग लिंकवर नऊ किमी लांबीचा बोगदा या ठिकाणी विजेच्या दिव्यांसह वायुव्हिजन यंत्रणा उभारावी लागणार आहे. या सगळ्यांसाठी एकंदर १५ मेगावॉट विजेची गरज भासणार आहे. 

या विजेची गरज पर्यावरणपूरक अक्षय्य ऊर्जेतून भागविण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. त्यातून प्रदूषणकारी पारंपरिक विजेचा वापर घटणार आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गालगत इंटरचेंज आणि अन्य भागांत असलेल्या मोकळ्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर अन्य पर्यायांमधूनही वीज उपलब्ध होऊ शकते का, याची चाचपणी एमएसआरडीसी करत आहे. त्यासाठी एमएसआरडीसीकडून सल्लागाराची नियुक्ती केली जाणार असून, निविदा मागविण्यात आल्या आहेत.

सल्लागाराला प्रकल्पाचा सुसाध्यता अहवाल तयार करावा लागेल. त्याचबरोबर डीपीआर तयार करून कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदाप्रक्रिया राबवावी लागणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एमएसआरडीसीच्या अंदाजानुसार समृद्धी महामार्गालगतच्या आणि इंटरचेंजजवळच्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारून जवळपास १४० ते १४५ मेगावॉट विजेची निर्मिती करता येणार आहे. यातील एमएसआरडीसीच्या प्रकल्पांसाठी लागणारी विजेची गरज भागवून अन्य वीज खुल्या बाजारात विकता येईल. त्यातून एमएसआरडीसीला उत्पन्नाचा स्रोतही उपलब्ध होईल आणि विजेच्या वापरावर होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चातही बचत होऊ शकणार आहे. 

एमएसआरडीसीची विजेची गरज भागविण्यासाठी आणि वीज वापर नेट झीरो करण्यासाठी, त्याचबरोबर ग्रीन एनर्जी वापरासाठी सौर ऊर्जेच्या वापरावर भर देत आहोत. हे वातावरणीय बदलांना समोरे जाण्यासाठी पर्यावरणपूरक ऊर्जा वापराच्या दिशेने पाऊल आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गालगत सौर ऊर्जा प्रकल्प उभारत आहोत. - मनूज जिंदाल, सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी