शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीकरांना महावितरणचा धक्का

By admin | Updated: August 1, 2016 02:00 IST

उन्हाळा आला, की भारनियमनाचे चक्र सुरू आणि पावसाळा सुरू झाली की वारंवार वीजपुरवठा खंडित

भोसरी : उन्हाळा आला, की भारनियमनाचे चक्र सुरू आणि पावसाळा सुरू झाली की वारंवार वीजपुरवठा खंडित... ‘महावितरण’च्या अशा झटक्यांनी पिंपरीकर अक्षरश: हैराण झाले आहेत. हे कमी काय म्हणून गेल्या १५ ते २० दिवसांपासून पिंपरी परिसरात रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ वीज गायब होत आहे. याबाबत प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतली असून, पिंपरीकरांच्या पाठीमागे वीजवितरण कंपनीने लावलेले हे विजेचे शुक्लकाष्ठ हटणार कधी, अशा संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत. पिंपरीच्या अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. विविध प्रकारच्या उत्पादनांची या ठिकाणी निर्मिती होत आहे. साहजिकच या ठिकाणी विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. महावितरणने प्रत्येक गुरुवारी वीजकपात करण्याचे धोरण अवंबल्यामुळे अनेक कंपन्या या दिवशी बंद असतात. मात्र त्या व्यतिरिक्त इतर दिवशीही अचानक वीज गायब होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे उत्पादननिर्मितीवर विपरीत परिणाम होऊ लागला असल्याचे बोलले जात आहे. दिवसभरात कधीही वीजपुरवठा खंडित होत असून, पुन्हा अचानक वीजपुरवठा सुरू झाल्यामुळे घरगुती वीज उपकरणे जळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. वीजवितरण कंपनीच्या अशा भोंगळ कारभारामुळे नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अघोषित भारनियमनाने आता मात्र पिंपरीकरांची चांगलीच झोप उडाली आहे. दररोज सकाळी, दुपारी, रात्री वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे, मात्र महावितरण कंपनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)>वीजवाहिन्या भूमिगत, तरीही घोटाळा पिंपरी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या सर्व वीजवाहिन्या भूमिगत आहेत. त्यामुळे वीजवाहिनी तुटून किंवा वीजखांबाचे नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये पाणी जाऊन त्यात बिघाड व्हावा, एवढा पाऊसही नाही; मग तरीही वारंवार वीज गायब होण्याचे कारण काय, नेमका घोटाळा कुठे आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. पाट्या टाकण्याचे काम बंद करामहावितरणकडून आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी वीजकपात केली जाते. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कंपन्यांना या दिवशी सुटी असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रोज सकाळ, दुपार, संध्याकाळी काही तास वीज गायब होत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही समस्या दिसत नाही का, असा संतप्त सवाल करून कर्मचारी केवळ पाट्या टाकण्याचे काम करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.