शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मार्इंच्या जाण्याने श्री सदस्य झाले पोरके

By admin | Updated: April 16, 2015 02:06 IST

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे अशा उपक्रमांमध्ये अनिताताई धर्माधिकारी यांचा सक्रिय सहभाग होता.

अलिबाग : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे अशा उपक्रमांमध्ये अनिताताई धर्माधिकारी यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने लाखो श्री सदस्यांचे मायेचे छत्र हरपले. त्यांच्या पश्चात पती ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब, उमेश, सचिन, राहुल हे तीन चिरंजीव व प्रीती ही कन्या, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अनितातार्इंच्या निधनाचे वृत्त समजताच राज्यातील विविध जिल्ह्यांतून सुमारे साठ हजारांपेक्षा अधिक श्री सदस्य बुधवारी सकाळीच रेवदंड्यात पोहोचले.चौलपासून रेवदंड्यापर्यंत श्री सदस्यांनी रस्त्याच्या दुतर्फा अत्यंत शिस्तीत उभे राहून वाहनांना दिशादर्शक मार्गदर्शन केले.मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजलीअनिताताई यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार पंडितशेठ पाटील, आमदार भरतशेठ गोगावले, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, रायगड जि.प.अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक प्रताप गंभीर, रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, रायगड पोलीस अधीक्षक डॉ.शशिकांत महावरकर आदी उपस्थित होते.अल्प परिचय च्अनितातार्इंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या गावात मध्यमवर्गीय खंडकर कुटुंबात २२ सप्टेंबर १९५२ रोजी झाला. नलिनी असे त्यांचे माहेरचे नाव होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मंडणगड येथेच झाले. रेवदंड्यामधील निरुपणाची अनन्यसाधारण परंपरा जोपासलेल्या आणि त्याच माध्यमातून समाज परिवर्तनाची प्रक्रिया घडवून आणणाऱ्या धर्माधिकारी कुटुंबातील दत्तात्रेय ऊर्फ आप्पासाहेब यांच्याशी त्यांचा मार्च १९७४ मध्ये विवाह झाला.श्री सदस्यांचा मायेचा आधारस्तंभ हरपला धर्माधिकारी परिवाराकडून सुरू असलेल्या प्रबोधनाच्या कार्यात मार्इंची भूमिका मोठी होती. त्यांच्या निधनाने श्री सदस्यांचा एक मायेचा आधारस्तंभ हरपला आहे.-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री त्यांचे कार्य सुरू ठेवणे हीच श्रद्धांजलीडॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या निरुपणातून समाजपरिवर्तनाचा वारसा आप्पासाहेब यांनी प्रभावीपणे सुरू ठेवला. त्यामध्ये त्यांना लाभलेली अनितातार्इंची साथ ही महत्त्वपूर्ण होती. त्यांचे कार्य पुढे अथक सुरू ठेवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.-प्रकाश महेता, पालकमंत्री, रायगडआप्पासाहेबांच्या त्या प्रेरणा होत्या डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांचे समाज प्रबोधनाचे कार्य त्यांच्या पश्चात आप्पासाहेबांनी अविरतपणे सुरुच ठेवले आहे. त्यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नी अनिताताईंचा सिंहाचा वाटा आहे. आप्पासाहेबांच्या त्या प्रेरणा होत्या. धर्माधिकारी कुटुंबीय आणि त्यांच्या श्री सदस्यांना मोठे दु:ख झाले आहे. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर धर्माधिकारी कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसअनिताताई या धर्माधिकारी कुटुंबाच्या आधारवड : अनिताताई या धर्माधिकारी कुटुंबाच्या आधारवड होत्या. नानासाहेब, शारदामाता गेल्यानंतर या कुटुंबासह श्री सदस्यांना सावरण्याचे काम त्यांनी केले. आप्पासाहेबांच्या कार्यामागे त्या सक्षमपणे उभ्या होत्या. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच दु:ख झाले आहे. - प्रशांत ठाकूर, आमदार