शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मार्इंच्या जाण्याने श्री सदस्य झाले पोरके

By admin | Updated: April 16, 2015 02:06 IST

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे अशा उपक्रमांमध्ये अनिताताई धर्माधिकारी यांचा सक्रिय सहभाग होता.

अलिबाग : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे अशा उपक्रमांमध्ये अनिताताई धर्माधिकारी यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने लाखो श्री सदस्यांचे मायेचे छत्र हरपले. त्यांच्या पश्चात पती ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब, उमेश, सचिन, राहुल हे तीन चिरंजीव व प्रीती ही कन्या, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अनितातार्इंच्या निधनाचे वृत्त समजताच राज्यातील विविध जिल्ह्यांतून सुमारे साठ हजारांपेक्षा अधिक श्री सदस्य बुधवारी सकाळीच रेवदंड्यात पोहोचले.चौलपासून रेवदंड्यापर्यंत श्री सदस्यांनी रस्त्याच्या दुतर्फा अत्यंत शिस्तीत उभे राहून वाहनांना दिशादर्शक मार्गदर्शन केले.मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजलीअनिताताई यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार पंडितशेठ पाटील, आमदार भरतशेठ गोगावले, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, रायगड जि.प.अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक प्रताप गंभीर, रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, रायगड पोलीस अधीक्षक डॉ.शशिकांत महावरकर आदी उपस्थित होते.अल्प परिचय च्अनितातार्इंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या गावात मध्यमवर्गीय खंडकर कुटुंबात २२ सप्टेंबर १९५२ रोजी झाला. नलिनी असे त्यांचे माहेरचे नाव होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मंडणगड येथेच झाले. रेवदंड्यामधील निरुपणाची अनन्यसाधारण परंपरा जोपासलेल्या आणि त्याच माध्यमातून समाज परिवर्तनाची प्रक्रिया घडवून आणणाऱ्या धर्माधिकारी कुटुंबातील दत्तात्रेय ऊर्फ आप्पासाहेब यांच्याशी त्यांचा मार्च १९७४ मध्ये विवाह झाला.श्री सदस्यांचा मायेचा आधारस्तंभ हरपला धर्माधिकारी परिवाराकडून सुरू असलेल्या प्रबोधनाच्या कार्यात मार्इंची भूमिका मोठी होती. त्यांच्या निधनाने श्री सदस्यांचा एक मायेचा आधारस्तंभ हरपला आहे.-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री त्यांचे कार्य सुरू ठेवणे हीच श्रद्धांजलीडॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या निरुपणातून समाजपरिवर्तनाचा वारसा आप्पासाहेब यांनी प्रभावीपणे सुरू ठेवला. त्यामध्ये त्यांना लाभलेली अनितातार्इंची साथ ही महत्त्वपूर्ण होती. त्यांचे कार्य पुढे अथक सुरू ठेवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.-प्रकाश महेता, पालकमंत्री, रायगडआप्पासाहेबांच्या त्या प्रेरणा होत्या डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांचे समाज प्रबोधनाचे कार्य त्यांच्या पश्चात आप्पासाहेबांनी अविरतपणे सुरुच ठेवले आहे. त्यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नी अनिताताईंचा सिंहाचा वाटा आहे. आप्पासाहेबांच्या त्या प्रेरणा होत्या. धर्माधिकारी कुटुंबीय आणि त्यांच्या श्री सदस्यांना मोठे दु:ख झाले आहे. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर धर्माधिकारी कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसअनिताताई या धर्माधिकारी कुटुंबाच्या आधारवड : अनिताताई या धर्माधिकारी कुटुंबाच्या आधारवड होत्या. नानासाहेब, शारदामाता गेल्यानंतर या कुटुंबासह श्री सदस्यांना सावरण्याचे काम त्यांनी केले. आप्पासाहेबांच्या कार्यामागे त्या सक्षमपणे उभ्या होत्या. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच दु:ख झाले आहे. - प्रशांत ठाकूर, आमदार