शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोल्हापूरची श्री अंबाबाई ‘घागरा-चोळी’मध्ये...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 04:48 IST

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाईला पारंपरिक काठापदराच्या साडीऐवजी घागरा-चोळी नेसविण्यात आल्याने कोल्हापूरकर

- लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाईला पारंपरिक काठापदराच्या साडीऐवजी घागरा-चोळी नेसविण्यात आल्याने कोल्हापूरकर आणि एकूणच भाविकांमधून तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावर हा विषय चांगलाच चर्चेत होता. अंबाबाई मंदिराचा गाभारा पुजाऱ्यांच्या अधिकारात आहे. त्यामुळे ते गाभाऱ्यात करतील त्या सगळ्या गोष्टी योग्यच, असा अलिखित नियम आहे. शुक्रवारी असाच प्रकार झाला. श्री अंबाबाईला घागरा-चोळीचा पोषाख करण्यात आला. एका भाविकाने दिलेली ३५ हजारांची घागरा-चोळी आहे, असे सांगण्यात आले. देवीचा हा नव्या पोषाखातील फोटो व्हायरल झाल्यावर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आदिशक्ती असलेल्या श्री अंबाबाईची काठापदराच्या साडीतील सालंकृत खडी पूजा ही मुख्य पूजा. सणवाराच्या औचित्त्याने त्यात बदल केले जात असले तरी साडी या मूळ पेहरावाला धक्का लावण्यात आला नव्हता. ही परंपरा मोडण्याचा अधिकार पुजाऱ्यांना कुणी दिला, अशा प्रकारचे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. अंबाबाईची साडी आणि खणा नारळाने ओटी भरणे हे नेहमीचेच. मात्र अंबाबाईला घागरा-चोळी वाहण्याचा हा बहुधा पहिलाच प्रकार असावा.कायद्याचे व नियमांचे आणि देवीची बदनामी होणार नाही याचे भान जसे आम्ही ठेवतो, तसेच श्रीपूजकांनी परंपरांचे भान ठेवावे. अन्यथा भविष्यात या घटनांविरोधात कोल्हापूरकरांचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.-संजय पवार, शिवसेना, कोल्हापूर जिल्हाप्रमुख उद्या, रविवारी सकाळी अकराच्या दरम्यान शहरातील सर्व तालीम मंडळ व संस्था एकत्र येऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सदर पूजा बांधलेल्या पुजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत. तसेच आंदोलनाची दिशा ठरविणार आहेत. हा प्रकार म्हणजे भक्तांच्या भावनांशी खेळ असून, त्याला आताच चाप लावला पाहिजे.- दिलीप देसाई, प्रजासत्ताक सामाजिक संस्था