शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर प्रेमवीरांना मोगली एरंडांनी सुजविणार !

By admin | Updated: February 11, 2017 23:56 IST

धोक्याची घंटा : गड-किल्ल्यांवर व्हॅलेंटाईन डे साजरा न करण्याचे ‘मराठा क्रांती ग्रुप’चे आवाहन

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास सांगणाऱ्या गड-किल्ल्यांवर फिरकणाऱ्या प्रेमवीरांना यंदा मोगली एरंडांनी सुजविण्याचा दम मराठा क्रांती ग्रुपच्या वतीने देण्यात आला आहे.सातारा जिल्ह्यात नामांकित गड आणि किल्ले आहेत. इतिहासातील अनेक आठवणी आणि शूर इतिहासाचे साक्षीदार असलेले हे गड आणि किल्ले आता प्रेमवीरांचे अड्डे झाले आहेत. एकांतात नको ते चाळे करून किल्ल्यावर सहकुटुंब येणाऱ्यांना लाज वाटेल, असे वर्तन येथे प्रेमवीरांकडून केले जाते. व्हॅलेंटाईन डे दिवशीही महाविद्यालयांना दांड्या मारून झुंडीने तरुणाई निसर्गाच्या कुशीत अर्थातच गड-किल्ल्यांवर पोहोचते. सज्जनगड, अजिंक्यतारा, प्रतापगड, वर्धनगड आदी गडांवर या दिवशी तरुणाईची तुफान गर्दी असते. येथे येणाऱ्या इतिहासप्रेमींची यामुळे भलतीच गोची होते. यंदा व्हॅलेंटाईन डे मंगळवारी आला आहे. सातारा एमआयडीसीतील अनेक कामगार व कर्मचारी त्यांच्या साप्ताहिक सुटीचा दिवस सहकुटुंब किल्ल्यावर जातात. त्यावेळी प्रेमीयुगुलांचे चाळे त्रासदायक ठरतात. त्यामुळे मराठा क्रांती ग्रुपच्या स्वयंसेवकांनी व्हॅलेंटाईन डे दिवशी हे आंदोलन छेडले आहे. (प्रतिनिधी)मुलांना सडकणार... मुलींच्या घरातल्यांना बोलवणारप्रेमवीरांनी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी गड-किल्ले सोडून कुठेही जाण्याला या ग्रुपचा विरोध नाही. पण चुकून जर कोणी जोडपे त्यांना गड-किल्ल्यावर आढळले तर त्यांना शिक्षा काय देण्यात यावी याविषयी त्यांनी ठरवले आहे. मुलांना मोगली एरंडांनी फटके देण्यात येणार आहेत, तर मुलींच्या घरातल्यांना फोन करून बोलवून त्यांना याविषयीची माहिती देऊन मगच मुलींना सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचं किंवा न करण्याचा अधिकार व्यक्तीगत आहे. त्यामुळे त्या अधिकारावर आम्ही आक्षेप घेणार नाही. पण गड-किल्ल्याच्या आश्रयाने प्रेमवीरांचे ओघळवाणे वर्तन आम्ही कदापि सहन करणार नाही. गड-किल्ल्यावर घडणाऱ्या अनैतिक प्रकारांवर हा हल्लाबोल असणार आहे. - राहुल भोसले, मराठा क्रांती ग्रुप, सातारासहभागी होण्याचे आवाहनमराठा क्रांती ग्रुपच्या वतीने सातारा तालुक्यातील गड-किल्ल्यांवर प्रेमवीरांना अटकाव करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही स्वयंस्फूर्तीने कार्यकर्त्यांनी या मोहिमेत आपापल्या भागासाठी सामील होण्याचे आवाहन राहुल भोसले यांनी केले आहे.मोगली एरंडंच का?पूर्वी साप निघाले की लोक मोगली एरंडांने या सापांना मारायचे. या एरंडाचा जोराचा फटका बसला तर शरीरावर झिणझिण्या येतात. त्यामुळे मार लागलेला भाग सुजतो. विशेष म्हणजे गड-किल्ल्यांवर मोगली एरंडं मुबलक सापडते. त्यामुळे जोडपे दिसले की हे एरंडं तोडून मग प्रेमवीराला ‘प्रसाद’ मिळणार आहे.