शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

बाबूराव पेंटर यांच्यावर लवकरच चित्रपट

By admin | Updated: June 3, 2015 00:59 IST

या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी उज्ज्वल गावंड यांनी कोल्हापुरात अनेकवेळा भेट दिली आहे. कोल्हापूरचा परिसर विशेषत: रंकाळ्यावरील लोकेशनचा या चित्रपटात भर असणार आहे

संदीप आडनाईक -कोल्हापूरदेशातील पहिला स्वदेशी बनावटीचा कॅमेरा तयार करून लोकमान्य टिळक यांच्याकडून सिनेमा केसरी अशी पदवी मिळविलेल्या कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्यावरील मराठी चित्रपटाची निर्मिती पुण्याचे दिग्दर्शक उज्ज्वल गावंड करत आहेत. सुखांत पाणीग्रही हे या चित्रपटाचे कलादिग्दर्शक आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झाले नसले तरी हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट होणार आहे. या चित्रपटासाठी साडेतीन कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे.कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी कलात्मक चित्रपटांचे युग देशभरात आणले. शिल्पकार, चित्रकार या त्यांच्या ओळखीपेक्षा ‘सैरंध्री’ या चित्रपटाद्वारे पहिल्या महिला स्त्री कलाकार रुपेरी पडद्यावर आणणारे आणि स्वदेशी बनावटीच्या कॅमेऱ्याने चित्रपटाचे चित्रीकरण करणारे पहिले व शेवटचे दिग्दर्शक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. याशिवाय अनेक तंत्राचे पहिले जनक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. आशिया खंडात त्यांची तुलना ग्रीफिथ यांच्यासोबत केली जाते. महाराष्ट्र फिल्म कंपनी स्थापन करून १९१८ मध्ये बाबूराव पेंटर यांनी ‘सीता स्वयंवर’ हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला असला तरी १९१९ मध्ये ‘सैरंध्री’ या चित्रपटाच्या निर्मितीतून त्यांनी कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. ७ फेब्रुवारी १९२0 रोजी पुण्याच्या आर्यन सिनेमागृहात हा मूकपट प्रदर्शित झाला. याच चित्रपटामुळे सेन्सॉर बोर्ड अस्तित्वात आले. १९२0 ते १९३0 या काळात त्यांनी १७ चित्रपटांची निर्मिती केली.मूळचे रायगड जिल्ह्यातील उरणचे रहिवासी असलेले उज्ज्वल गावंड या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. उज्ज्वल यांनी पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमधून चित्रपटविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला असून दोन वर्षांपासून या चित्रपटावर ते काम करीत आहेत. त्यांच्यासोबत कलादिग्दर्शक सुखांत पाणीग्रही हेही या भव्य चित्रपटासाठी मेहनत घेत आहेत. सुखांत पाणीग्रही यांनी ‘गंगाजल’ चित्रपटापासून कला दिग्दर्शनाला सुरुवात केली. ‘चक दे इंडिया’, ‘कहाणी’, ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटांचे कला दिग्दर्शनही त्यांनीच केले.बाबूराव पेंटर व आनंदराव पेंटर यांच्यातील नातेसंबंध, चित्रपट निर्मितीचा दोघांचा ध्यास, आनंदराव पेंटर यांच्या मृत्यूनंतर बाबूराव यांची मन:स्थिती आणि सैरंध्री चित्रपटाच्या निर्मितीपासून महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या चित्रपट निर्मितीच्या कालखंडावर हा चित्रपट बेतलेला आहे. या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी उज्ज्वल गावंड यांनी कोल्हापुरात अनेकवेळा भेट दिली आहे. कोल्हापूरचा परिसर विशेषत: रंकाळ्यावरील लोकेशनचा या चित्रपटात भर असणार आहे. याशिवाय १९१९ मधील मराठीची भाषाशैली कशी होती, यावर ते विशेष अभ्यास करत आहेत. त्या काळातील साहित्याचाही ते शोध घेत आहेत. ‘सैरंध्री’च्या वेळी बाबूराव पेंटर यांनी जसा स्टुडिओ उभारला होता, तसाच स्टुडिओ उभारण्याचा कला दिग्दर्शक सुखांत पाणीग्रही प्रयत्न करत आहेत. मद्रास फिल्म इंडस्ट्रीजची पायाभरणी करणाऱ्या बाबूराव पेंटर यांच्या या चित्रपटासाठी दक्षिणेबरोबरच देशभरातील अनेक नामवंत कलावंत काम करत आहेत. हा चित्रपट मराठी भाषेत होणार असला तरी इंग्रजी आणि हिंदी भाषेतील उपशीर्षके चित्रपटाला असणार आहेत. दादासाहेब फाळके यांनी पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली, पण बाबूराव पेंटर यांचे चित्रपट देशात आणि देशाबाहेर प्रदर्शित झाले. त्यांच्या चित्रपट निर्मितीचा ध्यास हा चित्रपटाचा विषय ठरू शकतो म्हणून या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटातील कलाकार अद्याप निश्चित झालेले नसले तरी पटकथेवर काम सुरू आहे. लवकरच प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.- उज्ज्वल गावंड, दिग्दर्शक