शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बाबूराव पेंटर यांच्यावर लवकरच चित्रपट

By admin | Updated: June 3, 2015 00:59 IST

या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी उज्ज्वल गावंड यांनी कोल्हापुरात अनेकवेळा भेट दिली आहे. कोल्हापूरचा परिसर विशेषत: रंकाळ्यावरील लोकेशनचा या चित्रपटात भर असणार आहे

संदीप आडनाईक -कोल्हापूरदेशातील पहिला स्वदेशी बनावटीचा कॅमेरा तयार करून लोकमान्य टिळक यांच्याकडून सिनेमा केसरी अशी पदवी मिळविलेल्या कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्यावरील मराठी चित्रपटाची निर्मिती पुण्याचे दिग्दर्शक उज्ज्वल गावंड करत आहेत. सुखांत पाणीग्रही हे या चित्रपटाचे कलादिग्दर्शक आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झाले नसले तरी हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट होणार आहे. या चित्रपटासाठी साडेतीन कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे.कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी कलात्मक चित्रपटांचे युग देशभरात आणले. शिल्पकार, चित्रकार या त्यांच्या ओळखीपेक्षा ‘सैरंध्री’ या चित्रपटाद्वारे पहिल्या महिला स्त्री कलाकार रुपेरी पडद्यावर आणणारे आणि स्वदेशी बनावटीच्या कॅमेऱ्याने चित्रपटाचे चित्रीकरण करणारे पहिले व शेवटचे दिग्दर्शक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. याशिवाय अनेक तंत्राचे पहिले जनक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. आशिया खंडात त्यांची तुलना ग्रीफिथ यांच्यासोबत केली जाते. महाराष्ट्र फिल्म कंपनी स्थापन करून १९१८ मध्ये बाबूराव पेंटर यांनी ‘सीता स्वयंवर’ हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला असला तरी १९१९ मध्ये ‘सैरंध्री’ या चित्रपटाच्या निर्मितीतून त्यांनी कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. ७ फेब्रुवारी १९२0 रोजी पुण्याच्या आर्यन सिनेमागृहात हा मूकपट प्रदर्शित झाला. याच चित्रपटामुळे सेन्सॉर बोर्ड अस्तित्वात आले. १९२0 ते १९३0 या काळात त्यांनी १७ चित्रपटांची निर्मिती केली.मूळचे रायगड जिल्ह्यातील उरणचे रहिवासी असलेले उज्ज्वल गावंड या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. उज्ज्वल यांनी पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमधून चित्रपटविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला असून दोन वर्षांपासून या चित्रपटावर ते काम करीत आहेत. त्यांच्यासोबत कलादिग्दर्शक सुखांत पाणीग्रही हेही या भव्य चित्रपटासाठी मेहनत घेत आहेत. सुखांत पाणीग्रही यांनी ‘गंगाजल’ चित्रपटापासून कला दिग्दर्शनाला सुरुवात केली. ‘चक दे इंडिया’, ‘कहाणी’, ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटांचे कला दिग्दर्शनही त्यांनीच केले.बाबूराव पेंटर व आनंदराव पेंटर यांच्यातील नातेसंबंध, चित्रपट निर्मितीचा दोघांचा ध्यास, आनंदराव पेंटर यांच्या मृत्यूनंतर बाबूराव यांची मन:स्थिती आणि सैरंध्री चित्रपटाच्या निर्मितीपासून महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या चित्रपट निर्मितीच्या कालखंडावर हा चित्रपट बेतलेला आहे. या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी उज्ज्वल गावंड यांनी कोल्हापुरात अनेकवेळा भेट दिली आहे. कोल्हापूरचा परिसर विशेषत: रंकाळ्यावरील लोकेशनचा या चित्रपटात भर असणार आहे. याशिवाय १९१९ मधील मराठीची भाषाशैली कशी होती, यावर ते विशेष अभ्यास करत आहेत. त्या काळातील साहित्याचाही ते शोध घेत आहेत. ‘सैरंध्री’च्या वेळी बाबूराव पेंटर यांनी जसा स्टुडिओ उभारला होता, तसाच स्टुडिओ उभारण्याचा कला दिग्दर्शक सुखांत पाणीग्रही प्रयत्न करत आहेत. मद्रास फिल्म इंडस्ट्रीजची पायाभरणी करणाऱ्या बाबूराव पेंटर यांच्या या चित्रपटासाठी दक्षिणेबरोबरच देशभरातील अनेक नामवंत कलावंत काम करत आहेत. हा चित्रपट मराठी भाषेत होणार असला तरी इंग्रजी आणि हिंदी भाषेतील उपशीर्षके चित्रपटाला असणार आहेत. दादासाहेब फाळके यांनी पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली, पण बाबूराव पेंटर यांचे चित्रपट देशात आणि देशाबाहेर प्रदर्शित झाले. त्यांच्या चित्रपट निर्मितीचा ध्यास हा चित्रपटाचा विषय ठरू शकतो म्हणून या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटातील कलाकार अद्याप निश्चित झालेले नसले तरी पटकथेवर काम सुरू आहे. लवकरच प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.- उज्ज्वल गावंड, दिग्दर्शक