शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

खेडमध्येच विमानतळ उभारण्याच्या हालचाली - मुख्यमंत्र्यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2016 15:39 IST

औद्योगिकरणाच्या दृष्टीकोणातून व शेतक-यांच्या हितासाठी उद्योगनगरीच्या जवळ असलेल्या खेडमध्येच विमानतळ उभारण्यात येणार आहे, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.

ऑनलाइन लोकमत
चाकण (पुणे), दि. ६ -  खेड तालुक्यातून प्रस्तावित विमानतळ स्थलांतराच्या निर्णयामुळे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव, चाकण, राजगुरुनगर, रांजणगाव आदी औद्योगिक पट्ट्यातील उद्योजक, तसेच स्थानिक शेतक-यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, औद्योगिकरणाच्या दृष्टीकोणातून व शेतक-यांच्या हितासाठी उद्योगनगरीच्या जवळ असलेल्या खेडमध्येच विमानतळ उभारण्यात येणार आहे, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. त्यामुळे उद्योजक, शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. पण सेझ  शेतकऱ्यांना परतावा देण्याबाबत बैठक आयोजीत करण्यात आली होती. शेतकऱ्यांना जमीनीचे चालु दरानुसार पैसे मिळावेत अशी मागणी केली यावर लवकरच मुख्यमत्र्यांची पुन्हा बैठक होणार आहे. यावेळी सेझमध्ये विमानतळ करण्यात यावे अशी आग्रही मागणी खासदार शिवाजी आढळराव पाटील व आमदार सुरेश गोरे यांनी केली.
खेड तालुक्यात होणा-या नियोजित विमानतळाचे स्थलांतर पुरंदर तालुक्यात होणार, असे निश्चित करण्यात आले होते. त्याचा फटका उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव, चाकण, रांजणगाव आदी औद्योगिक क्षेत्राला बसणार होता. याबाबत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार सुरेश गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सुभाष देसाई यांना मुंबई येथे आज बैठकीत साकडे घातले. खेड-चाकण परिसरात विमानतळ होणार म्हणून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करुन उद्योग उभारले आहेत. या औद्योगिक पट्ट्यात 15 ते 20 हजार लहान-मोठे उद्योग आहेत. त्यामध्ये मोठ्याप्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांनीही मोठे प्रकल्प उभारले आहेत. त्यामुळे येथील शेतक-यांनाही त्याचा फायदा होणार होता. उद्योग क्षेत्राच्या विकासासाच्या दृष्टीने आणि स्थानिक शेतक-यांच्या हितासाठी प्रस्तावित विमानतळाचे स्थलांतर करु नये, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले होते. यावर सकारात्मक चर्चा झाली असून, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे तांत्रिक पथक आता खेड परिसरातील राजगुरुनगर येथील क्षेत्राचा अभ्यास करणार आहे
 
आमदार सुरेश गोरे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड, खेड, चाकण, तळेगाव, आंबेगाव, जुन्नर आदी परिसरातील शेतकरी, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची बैठक घेवून विमानतळाच्या अपरिहार्यतेबाबत भूमिका जाणून घ्यावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी आमची बाजू समजून घेतली आहे. खेडमध्येच विमानतळ उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत. त्यामुळे तमाम शेतकरी, उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. यापुढेही आम्ही पाठपुरावा करणार आहोत.खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील व आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी आज उद्योगमत्री सुभाष देसाई यांची विमानतळा संर्दभात भेट घेतली तसेच शेतकऱ्यांच्या परतावा जमीनीसाठी आग्रही भूमिका घेतली.