शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

खेडमध्येच विमानतळ उभारण्याच्या हालचाली - मुख्यमंत्र्यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2016 15:39 IST

औद्योगिकरणाच्या दृष्टीकोणातून व शेतक-यांच्या हितासाठी उद्योगनगरीच्या जवळ असलेल्या खेडमध्येच विमानतळ उभारण्यात येणार आहे, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.

ऑनलाइन लोकमत
चाकण (पुणे), दि. ६ -  खेड तालुक्यातून प्रस्तावित विमानतळ स्थलांतराच्या निर्णयामुळे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव, चाकण, राजगुरुनगर, रांजणगाव आदी औद्योगिक पट्ट्यातील उद्योजक, तसेच स्थानिक शेतक-यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, औद्योगिकरणाच्या दृष्टीकोणातून व शेतक-यांच्या हितासाठी उद्योगनगरीच्या जवळ असलेल्या खेडमध्येच विमानतळ उभारण्यात येणार आहे, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. त्यामुळे उद्योजक, शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. पण सेझ  शेतकऱ्यांना परतावा देण्याबाबत बैठक आयोजीत करण्यात आली होती. शेतकऱ्यांना जमीनीचे चालु दरानुसार पैसे मिळावेत अशी मागणी केली यावर लवकरच मुख्यमत्र्यांची पुन्हा बैठक होणार आहे. यावेळी सेझमध्ये विमानतळ करण्यात यावे अशी आग्रही मागणी खासदार शिवाजी आढळराव पाटील व आमदार सुरेश गोरे यांनी केली.
खेड तालुक्यात होणा-या नियोजित विमानतळाचे स्थलांतर पुरंदर तालुक्यात होणार, असे निश्चित करण्यात आले होते. त्याचा फटका उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव, चाकण, रांजणगाव आदी औद्योगिक क्षेत्राला बसणार होता. याबाबत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार सुरेश गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सुभाष देसाई यांना मुंबई येथे आज बैठकीत साकडे घातले. खेड-चाकण परिसरात विमानतळ होणार म्हणून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करुन उद्योग उभारले आहेत. या औद्योगिक पट्ट्यात 15 ते 20 हजार लहान-मोठे उद्योग आहेत. त्यामध्ये मोठ्याप्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांनीही मोठे प्रकल्प उभारले आहेत. त्यामुळे येथील शेतक-यांनाही त्याचा फायदा होणार होता. उद्योग क्षेत्राच्या विकासासाच्या दृष्टीने आणि स्थानिक शेतक-यांच्या हितासाठी प्रस्तावित विमानतळाचे स्थलांतर करु नये, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले होते. यावर सकारात्मक चर्चा झाली असून, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे तांत्रिक पथक आता खेड परिसरातील राजगुरुनगर येथील क्षेत्राचा अभ्यास करणार आहे
 
आमदार सुरेश गोरे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड, खेड, चाकण, तळेगाव, आंबेगाव, जुन्नर आदी परिसरातील शेतकरी, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची बैठक घेवून विमानतळाच्या अपरिहार्यतेबाबत भूमिका जाणून घ्यावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी आमची बाजू समजून घेतली आहे. खेडमध्येच विमानतळ उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत. त्यामुळे तमाम शेतकरी, उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. यापुढेही आम्ही पाठपुरावा करणार आहोत.खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील व आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी आज उद्योगमत्री सुभाष देसाई यांची विमानतळा संर्दभात भेट घेतली तसेच शेतकऱ्यांच्या परतावा जमीनीसाठी आग्रही भूमिका घेतली.