शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

खेडमध्येच विमानतळ उभारण्याच्या हालचाली - मुख्यमंत्र्यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2016 15:39 IST

औद्योगिकरणाच्या दृष्टीकोणातून व शेतक-यांच्या हितासाठी उद्योगनगरीच्या जवळ असलेल्या खेडमध्येच विमानतळ उभारण्यात येणार आहे, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.

ऑनलाइन लोकमत
चाकण (पुणे), दि. ६ -  खेड तालुक्यातून प्रस्तावित विमानतळ स्थलांतराच्या निर्णयामुळे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव, चाकण, राजगुरुनगर, रांजणगाव आदी औद्योगिक पट्ट्यातील उद्योजक, तसेच स्थानिक शेतक-यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, औद्योगिकरणाच्या दृष्टीकोणातून व शेतक-यांच्या हितासाठी उद्योगनगरीच्या जवळ असलेल्या खेडमध्येच विमानतळ उभारण्यात येणार आहे, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. त्यामुळे उद्योजक, शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. पण सेझ  शेतकऱ्यांना परतावा देण्याबाबत बैठक आयोजीत करण्यात आली होती. शेतकऱ्यांना जमीनीचे चालु दरानुसार पैसे मिळावेत अशी मागणी केली यावर लवकरच मुख्यमत्र्यांची पुन्हा बैठक होणार आहे. यावेळी सेझमध्ये विमानतळ करण्यात यावे अशी आग्रही मागणी खासदार शिवाजी आढळराव पाटील व आमदार सुरेश गोरे यांनी केली.
खेड तालुक्यात होणा-या नियोजित विमानतळाचे स्थलांतर पुरंदर तालुक्यात होणार, असे निश्चित करण्यात आले होते. त्याचा फटका उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव, चाकण, रांजणगाव आदी औद्योगिक क्षेत्राला बसणार होता. याबाबत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार सुरेश गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सुभाष देसाई यांना मुंबई येथे आज बैठकीत साकडे घातले. खेड-चाकण परिसरात विमानतळ होणार म्हणून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करुन उद्योग उभारले आहेत. या औद्योगिक पट्ट्यात 15 ते 20 हजार लहान-मोठे उद्योग आहेत. त्यामध्ये मोठ्याप्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांनीही मोठे प्रकल्प उभारले आहेत. त्यामुळे येथील शेतक-यांनाही त्याचा फायदा होणार होता. उद्योग क्षेत्राच्या विकासासाच्या दृष्टीने आणि स्थानिक शेतक-यांच्या हितासाठी प्रस्तावित विमानतळाचे स्थलांतर करु नये, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले होते. यावर सकारात्मक चर्चा झाली असून, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे तांत्रिक पथक आता खेड परिसरातील राजगुरुनगर येथील क्षेत्राचा अभ्यास करणार आहे
 
आमदार सुरेश गोरे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड, खेड, चाकण, तळेगाव, आंबेगाव, जुन्नर आदी परिसरातील शेतकरी, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची बैठक घेवून विमानतळाच्या अपरिहार्यतेबाबत भूमिका जाणून घ्यावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी आमची बाजू समजून घेतली आहे. खेडमध्येच विमानतळ उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत. त्यामुळे तमाम शेतकरी, उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. यापुढेही आम्ही पाठपुरावा करणार आहोत.खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील व आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी आज उद्योगमत्री सुभाष देसाई यांची विमानतळा संर्दभात भेट घेतली तसेच शेतकऱ्यांच्या परतावा जमीनीसाठी आग्रही भूमिका घेतली.