शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

सातारकरांची चळवळ मुंबई दरबारी

By admin | Updated: May 5, 2017 00:14 IST

मसाप पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा : मराठीच्या अभिजात दर्जासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा

सातारा : ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात आपण स्वत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्यक्तीश: पाठपुरावा करणार आहोत,’ अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती मसाप, सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भिलार येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय ‘मसाप’ने घेतला होता. मात्र, बुधवारी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, खंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक रवींद्र पिसाळ, ‘भाजप’च्या प्रवक्त्या कांताताई नलावडे यांनी साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. पाचगणीच्या हेलिपॅडवर जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाशी भेट घडवून दिली. भिलार गावात आंदोलन करण्यासाठी अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, संजय माने, वजीर नदाफ, सचिन धुमाळ, सतीश घोरपडे, सुरेंद्र वारद, प्राचार्य रवींद्र येवले, शाहूपुरी, फलटण शाखेसह सातारा जिल्ह्यातील सर्व शाखांचे प्रतिनिधी अंदोलन करण्यासाठी उपस्थित होते. मात्र, दिल्ली दरबारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आपण नक्की प्रयत्न करू असा शब्द मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा विनोद कुलकर्णी यांनी केली.दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांचे हेलिकॅप्टर भिलार गावच्या हेलीपॅडवर आल्यानंतर वेद पठणाने त्यांचे स्वागत करण्यात आल्याचे सांगून सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)सरपंचांच्या घरी घेतली भेटभिलारच्या सरपंच वंदना भिलारे यांच्या निवासस्थानी जाऊन आणि काही घरांना भेटी देऊन मुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. गुरुवारचा कार्यक्रम आगळावेगळा असल्याने साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने आले होते.भिलारच्या औदार्याची चित्रफितीतून माहितीया कार्यक्रमात‘पुस्तकाचं गाव भिलार’ यावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. या चित्रफितीतून भिलारवासीयांनी दाखविलेल्या औदार्याची माहिती मिळाली.भिलार येथील सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचे भाषण संपताच एका व्यक्तीने कर्जमाफीच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी त्याला बाहेर नेले.