शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 01:05 IST

महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुकांनंतर घेण्यासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.

पुणे : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून १२ जागांसाठी होणारी निवडणूक महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुकांनंतर घेण्यासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठीच नगर परिषदांच्या निवडणुकांची आचारसंहिता ६० दिवस अगोदर लावण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.विधान परिषदेची निवडणूक होत असलेल्या महानगरपालिका व नगर परिषदांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे पक्षीय बलानुसार त्यांचेच सर्वाधिक आमदार पुन्हा निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे. आगामी महापालिका व नगर परिषदांमध्ये निवडणुकांमध्ये भाजपाचे सदस्य जास्त संख्येने निवडून येतील, त्यामुळे या निवडणुकांनंतर विधान परिषदेची निवडणूक झाल्यास त्याचा भाजपाला मोठा फायदा होऊ शकेल, असा विश्वास पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानापूर्वी केवळ ३५ दिवस अगोदर आचारसंहिता लावली जाईल असा धोरणात्मक निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार नगर परिषदांच्या निवडणुकांची आचारसंहिता १५ नोव्हेंबरनंतर लागणे अपेक्षित होते, मात्र राज्य निवडणूक आयोगाने अचानकपणे ६० दिवस अगोदरच निवडणुका जाहीर करून आचारसंहिता लागू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता चालू असताना त्याच्या सदस्यांचे मतदान घेणे योग्य नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.>शहरातील काही वरिष्ठ पदाधिकारी नुकतेच राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले असता, ते अनवधानाने विधान परिषदेची निवडणूक पुढे जाणार असल्याचे बोलून गेले असल्याचा किस्साही पालिका वर्तुळात चर्चिला जात आहे. एव्हाना जर केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला तरी त्याविरोधात न्यायालयामध्ये जाण्याचीही तयारी विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सुरू केली आहे. एकंदरीत विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय झाला, तर त्याला विरोधी पक्षांकडून प्रचंड विरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.