शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बालगंधर्व स्मारकासाठी चळवळ उभारणार

By admin | Updated: November 6, 2015 01:28 IST

निधी उपलब्ध असतानाही नागठाणे येथील बालगंधर्वांचे स्मारक रखडल्याची बाब क्लेशदायी असून, आता शासनदरबारी स्मारकाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे.

सांगली : निधी उपलब्ध असतानाही नागठाणे येथील बालगंधर्वांचे स्मारक रखडल्याची बाब क्लेशदायी असून, आता शासनदरबारी स्मारकाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी चळवळ उभी करून मी पुढाकार घेण्यास तयार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी गुरुवारी येथे केले.अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे येथील भावे नाट्यमंदिरात गोखले यांना नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज यांच्या हस्ते ‘विष्णुदास भावे पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. गौरव पदक, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व अकरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गोखले म्हणाले की, परंपरा जपत मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या विष्णुदास भावे यांच्याइतक्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाची नवीन कलाकारांना ओळख करून देण्यासाठी सांगलीकरांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नाटकाचे दिग्दर्शन, अभिनय आणि नियोजन या क्षेत्रातील भावे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व मराठी रंगभूमीला लाभले, हे नशीबच मानावे लागेल. ते केवळ मराठी रंगभूमीचेच नव्हे, तर भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार आहेत.बालगंधर्वांच्या स्मारकाला साडेतीन कोटी निधी उपलब्ध असतानाही, त्याचे काम रखडले आहे. शासन त्याच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करीत नसल्याने आता आपणच पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. सांगलीतील नाट्यदिग्दर्शिका चेतना वैद्य यांचा गोखले यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)पाच नोव्हेंबरला सांगलीतनाट्यक्षेत्रात मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरवपदक मिळणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी पाच नोव्हेंबरला रंगभूमीदिनी सांगलीला भेट देणार आहे. या दिवशी पूर्ण दिवस येथील कलाकारांना अभिनयाचे धडे देण्यास तयार असल्याचेही गोखले यांनी सांगितले.