शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

बालगंधर्व स्मारकासाठी चळवळ उभारणार

By admin | Updated: November 6, 2015 01:28 IST

निधी उपलब्ध असतानाही नागठाणे येथील बालगंधर्वांचे स्मारक रखडल्याची बाब क्लेशदायी असून, आता शासनदरबारी स्मारकाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे.

सांगली : निधी उपलब्ध असतानाही नागठाणे येथील बालगंधर्वांचे स्मारक रखडल्याची बाब क्लेशदायी असून, आता शासनदरबारी स्मारकाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी चळवळ उभी करून मी पुढाकार घेण्यास तयार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी गुरुवारी येथे केले.अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे येथील भावे नाट्यमंदिरात गोखले यांना नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज यांच्या हस्ते ‘विष्णुदास भावे पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. गौरव पदक, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व अकरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गोखले म्हणाले की, परंपरा जपत मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या विष्णुदास भावे यांच्याइतक्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाची नवीन कलाकारांना ओळख करून देण्यासाठी सांगलीकरांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नाटकाचे दिग्दर्शन, अभिनय आणि नियोजन या क्षेत्रातील भावे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व मराठी रंगभूमीला लाभले, हे नशीबच मानावे लागेल. ते केवळ मराठी रंगभूमीचेच नव्हे, तर भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार आहेत.बालगंधर्वांच्या स्मारकाला साडेतीन कोटी निधी उपलब्ध असतानाही, त्याचे काम रखडले आहे. शासन त्याच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करीत नसल्याने आता आपणच पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. सांगलीतील नाट्यदिग्दर्शिका चेतना वैद्य यांचा गोखले यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)पाच नोव्हेंबरला सांगलीतनाट्यक्षेत्रात मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरवपदक मिळणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी पाच नोव्हेंबरला रंगभूमीदिनी सांगलीला भेट देणार आहे. या दिवशी पूर्ण दिवस येथील कलाकारांना अभिनयाचे धडे देण्यास तयार असल्याचेही गोखले यांनी सांगितले.