शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

शहर एसटी बंदविरोधात आंदोलन

By admin | Updated: September 18, 2016 02:06 IST

नालासोपारा आगारातील एसटी सेवेचे ९ मार्ग बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद वसईत उमटले आहेत.

वसई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) नालासोपारा आगारातील एसटी सेवेचे ९ मार्ग बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद वसईत उमटले आहेत. त्याच्या विरोधात लढा उभारण्यासाठी जनआंदोलन समिती सरसावली आहे. शुक्रवारी संध्याकाळी तिने निषेध सभा आयोजिली होती. तोट्याचे कारण देत नालासोपारा आगारातील गास, उमराळे, नाळे, कळंब, भुईगाव, निर्मळ, राजोडी अशा एकूण ९ मार्गांची सेवा बंद केल्याचे एसटीने कळवले आहे. याचबरोबर या मार्गावर महापालिकने परिवहन सेवा सुरू करावी अशी विनंती केली आहे. त्याविरोधात समितीने आंदोलनाची तयारी केली आहे. या मार्गावरील सेवा नफ्यात असतांना त्या बंद करण्याची गरज नव्हती. या निर्णयाविरोधात तसेच वसईतून लढा उभारण्यासाठी सर्व पक्ष आणि संघटनांना एकत्र आणले जात आहे. शुक्रवारी संध्यकाळी निर्मळ येथे सभेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात आंदोलनाटी दिशा ठरवण्यात आली. यावेळी एसटी कामगार संघटनेचे भरत पेंढारी, डॉमणिका डाबरे, समीर वर्तक, रुपेश राड्रीग्ज यांच्यासह कार्यकर्ते आणि प्रवासी संघटनेचे पदाधिकारी हजर होते.या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी चार वाजता नालासोपारा एसटी स्टँडमध्ये निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच एसटीच्या निर्णाविरोधात आंदोलन करण्यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर आंदोलन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)>‘टीम आमची वसई’च्या सूचनाप्रदूषणकारी व त्रासदायक बसेस बंद करुन पालिकेने छोट्या किंवा मोठ्या अधुनिक बसेस आणाव्यात सध्याच्या बसेस जास्त धूर सोडतात. त्याचे ड्रायव्हर फार रफ ड्रायव्हिंग करतात व कंडक्टर प्रवाशांना अपमानास्पद वागणूक देतात असा बऱ्याच प्रवाशांना अनुभव आहे. वसई विरार पालिकेच्या बस सकाळी ७ च्या नंतर सुरु होतात आणि रात्री १० नंतर बंद होतात. गावच्या लोकांनी फर्स्ट शिफ्ट, नाईट शिफ्ट करायची कशी? बायका- मुलें येणार जाणार कशी ? महापालिकेचे स्वत:चे बस डेपो ही नाहीत. त्यामुळे बसेस रस्त्यावरच उभ्या राहतात व वाहतूक कोंडी होते. पालिका टु व्हिलर पार्किंगची धड सोय सुद्धा करत नाही. जी आहे ती परवडत नाही आणि खिशाला खार लावून गाड्या पार्किंगमध्ये ठेवल्या तर गाड्या चोरीला जातात. या सर्व मुद्यांवर विचार करून त्यावर तोडगे काढून व अमलात आणूनच एसटीची सेवा बंद करून परिवहन सेवा सुरू करण्याचा विचार पालिकेने करावा अशी सूचना आमची वसई टीमने केली आहे.