शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

बहीण-भावाच्या अपघाती मृत्यूने मन्यारखेडा गावावर शोककळा

By admin | Updated: April 23, 2017 19:43 IST

ट्रॅव्हलमधून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील ढोरेगावजवळ घडली़

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 23 -  लहान बहिणीला आळंदीला सोडून पुन्हा जळगावकडे परतणा:या मन्यारखेडा येथील बहिण-भावाचा ट्रॅव्हलमधून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील ढोरेगावजवळ घडली़ या घटनेने मन्यारखेडा गावावर शोककळा पसरली आह़े कुटुंबांची जबाबदारी सांभाळणा:या मुला आणि मुलीच्या मृत्यूने वडील सुरेश मराठे यांचा आधार हरपला असून पोटच्या गोळ्य़ांचे मृतदेह पाहून वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा होता़सुरेश वामन मराठे हे सेवानिवृत्त बसचालक आहेत़ सात वर्षापूर्वी ते परिवहन मंडळातून सेवानिवृत्त झाल. तीन मुली, एक मुलगा, जावई व नातवंडे असा त्यांचा परिवार आह़े खाजगी गाडीवर चालक म्हणून काम करून ते कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात़ प्रतिभा, तुलसी या दोघा मुलींचे लग्न झाले असून त्या सासरी नांदत आहेत़ मुलगा गजानन हा वाहनाच्या शोरूममध्ये चालक म्हणून काम करून कुटुंबास हातभार लावत होता़लहान मुलगी पोलीस भरतीला आली होतीमराठे यांची लहान मुलगी तुलसी ही आळंदीला राहत़े पोलीस व्हायची इच्छा असल्याने तिने पोलीस भरतीसाठी जळगावात अर्ज केला होता व भरतीसाठी तुलसी दीड महिन्यांपूर्वी वडिलांकडे जळगावला आली होती़ मैदानी चाचणी, लेखी परीक्षेदरम्यान तुलसीच्या 11 महिन्यांचा चिमुकला, मानसचा मोठी बहिण अरूणा हिने सांभाळ केला होता़ पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याने तुलसीला सोडण्यासाठी 15 रोजी मोठी बहिण अरूणा व भाऊ गजानन हे आळंदीला गेले होत़ेसाखर झोपेतच दोघा बहिण भावांचा करूण अंत22 रोजी रात्री गजानन व अरूणा मराठे हे दोघे   ट्रॅव्हल्सने (एम एच 19 वाय 8001) पुणे येथून जळगावकडे परत येत होत़े दोघे बहिण भाऊ ट्रॅव्हल्सच्या मागील सीटवर बसले होत़े याच सीटखाली ट्रॅव्हलची दोन चाकेही ठेवलेली होती़ गंगापूर तालुक्यातील ढोरेगावनजीक गतिरोधकावर जोरदार दणक्याने दोघा चाकांच्या वजनामुळे तसेच बहिण भाऊ बसलेले सीट  जीर्ण पत्र्यातून जागीच खचल़े याच मागाच्या चाकात आल्याने गजानन व अरूणा यांचा जागीच मृत्यू झाला़जळगावजवळील मन्यारखेडा या गावात ही वार्ता समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. संध्याकाळी गावात दोघांचेही मृतदेह आणल्यानंतर सर्वाना शोक अनावर झाला. या वेळी पोटच्या गोळ्य़ांचे मृतदेह पाहून वडील शोकसागरात बुडून त्यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. बहीण-भावाची अंत्ययात्रा सोबतच निघाल्याचे दृष्य पाहून गावक:यांना आश्रू आवरता आले नाही.