शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

बारामतीवर शोककळा

By admin | Updated: May 25, 2015 23:08 IST

आजची पहाट तिन्ही गावांमधील या युवकांच्या मृत्यूच्या बातमीने सुरू झाली. त्यानंतर या गावांमध्ये कमालीची शांतता पसरली. तिन्ही गावांमधील व्यवहार बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला.

बारामती : आजची पहाट तिन्ही गावांमधील या युवकांच्या मृत्यूच्या बातमीने सुरू झाली. त्यानंतर या गावांमध्ये कमालीची शांतता पसरली. तिन्ही गावांमधील व्यवहार बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला. चौकाचौकांमध्ये ग्रामस्थ एकत्रित येऊन या अपघाताबाबत चर्चा करीत होते. शेखर गवळी हा तरुण बारामती खरेदी-विक्री संघाचे संचालक बापूराव गवळी यांचा मुलगा आहे. त्याच्या मागे आई, वडील, दोन बहिणी आणि लहान भाऊ असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूच्या धक्क्याने वडील बापूराव यांना रक्तदाबाचा त्रास झाला. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करावे लागले. तसेच हृषीकेश हा येथील राजेंद्र उपहारगृहाचे मालक पोपट गवळी यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मागे आई, वडील, लहान बहीण असा परिवार आहे तर अनिल गवळी यांचा अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मोठा भाऊ असा परिवार आहे. देऊळगाव रसाळ येथील बारामती खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अंकुश रसाळ यांचा सागर हा मुलगा होता. तर सागर बाळासाहेब रसाळ हा गिरणी व्यावसायिक, शेतकरी बाळासाहेब रसाळ यांचा एकुलता एक मुलगा होता. तो विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. तर अजित रसाळ हा त्याचा सख्खा चुलतभाऊ आहे. त्याचाही अपघातात मृत्यू झाला आहे. त्याचा विवाह झाला असून, त्याला मुलगादेखील आहे. त्याचा परिसरात दूध व्यवसाय, शेती व्यवसाय होता. खराडेवाडी येथील नागेश बाळासाहेब खराडे हा तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. याशिवाय घरातील शेतीकाम करून कौटुंबिक जबाबदाऱ्या संभाळण्यासाठी त्याचा पुढाकार होता.(वार्ताहर)४उंडवडी सुपे, देऊळगाव रसाळ गावांमधील व्यवहार पूर्ण ठप्प होते. चौकाचौकांत पारावर बसून फक्त अपघात आणि युवकांच्या दुर्दैवी मृत्यूच्या चर्चा सुरू होत्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरच शोककळा पसरल्याचे चित्र होते. काही मृतांच्या घरी या अपघाताबाबत माहिती नव्हती. मृत्यूची बातमी त्या युवकांच्या घरी सांगायची कोणी, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता. तर नियतीसमोर काय करणार, असा सवाल या घटनेच्या पार्श्वभूमीवर एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केला. ४तिरुपतीच्या सहलीसाठी नेण्यात आलेली स्कॉर्पिओ खराडवाडी परिसरातील भापकर वस्ती येथील होती. गाडी भाडेतत्त्वावर नेण्यात आली होती. मात्र, या स्कॉर्पिओच्या चालकाबाबत एकाही ग्रामस्थाला माहिती नव्हती. तिन्ही गावांमधील ग्रामस्थांनी, त्या सातपैकी चार जण चारचाकी वाहनाचे सराईत चालक होते. त्यामुळे अपघाताच्या वेळी गाडी कोण चालवत होता, असा प्रश्न ग्रामस्थांनादेखील पडल्याचे चर्चेतून जाणवले. घरचा आधार गेला...अपघाताची वार्ता समजल्यापासून आम्हाला अवस्थ वाटू लागले आहे. नागेश आमचा जवळचा मित्र होता. घरातील व्यक्ती गेल्याप्रमाणे गावातील वातावरण शोकाकुल झाले आहे, अशी प्रतिक्रिया परशुराम खराडे, गणेश खराडे, सागर खराडे यांनी व्यक्त केली, तर अपघाताची माहिती समजल्यानंतर ‘अन्नाचा घास पोटात गेला नाही, काय होऊन बसलं, कमी वयात नागेश घरचं सगळं पाहत होता. त्यामुळे त्याचं कौतुक होतं,’ अशी प्रतिक्रिया येथील वयोवृद्ध महिला विमल खराडे यांनी व्यक्त केली. सुदैवाने बचावला..अपघातातील ७ तरुणांबरोबर उंडवडी सुपे येथील मोहन गवळी हादेखील जाणार होता. मात्र, ऐनवेळी तो त्यांच्याबरोबर गेला नाही. या दुर्घटनेत गवळी यालादेखील अपघात झाला, असे वृत्त आल्यानंतर काही काळ संदिग्ध वातावरण निर्माण झाले होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. तो बालाजी दर्शनाला गेलाच नाही, असे समजल्यावर ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला. तिन्ही गावचे ग्रामस्थ अपघात स्थळाकडे रवानातिरुपती देवस्थानच्या दर्शनासाठी गेलेल्या युवकांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजल्यानंतर तिन्ही गावांमधील युवावर्ग मोठ्या प्रमाणात गावांमध्ये एकत्रित आला. तातडीने तिन्ही गावांमधील युवक आंध्र प्रदेशमधील अपघाताच्या ठिकाणी स्वतंत्र वाहनांमधून रवाना झाले आहेत. या युवकांचे मृतदेह सोमवारी रात्री उशिरा गावामध्ये आणण्यात येणार असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.