शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’पुढे ६६ वर्षांत समस्यांचा डोंगर

By admin | Updated: June 1, 2014 00:54 IST

प्रवाशांना बदलत्या काळानुसार सेवा देण्यात कमी पडलेल्या एसटी महामंडळापुढे समस्यांचा मोठा डोंगर उभा आहे. कामगारांच्या समस्या, भंगार बसेस आदी प्रश्नातून मार्ग काढत तोटा कमी करण्यासाठी महामंडळापुढे

कामगारांचे प्रश्न :  भंगार बसेस पाचवीला पुजलेल्याविलास गावंडे - यवतमाळप्रवाशांना बदलत्या काळानुसार सेवा देण्यात कमी पडलेल्या एसटी महामंडळापुढे समस्यांचा मोठा  डोंगर उभा आहे. कामगारांच्या समस्या, भंगार बसेस आदी प्रश्नातून मार्ग काढत तोटा कमी  करण्यासाठी महामंडळापुढे सध्या तरी, ठोस अशी कुठलीही योजना नाही. रविवार दि. १ जून रोजी  ६६ व्या वर्षात पदार्पण करणार्‍या एसटीकडून जनतेला खूप अपेक्षा आहे. १९४८ मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्थापनेनंतर बेडफोर्ड कंपनीची पहिली २४  आसनी बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. आज वातानुकुलित बसेस प्रवाशांना सेवा देत आहेत.  टू-बाय टू, परिवर्तन, निमआराम, मीडीबसेस प्रवाशांच्या सेवेसाठी आहेत. महामंडळाचा  राज्यातील डोलारा सांभाळण्यासाठी एक लाख २0 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. २४८ आगार,  ५८0 हून अधिक बसस्थानके, चार हजारावर प्रवासी मार्ग निवारे याद्वारे प्रवाशांना सेवा पुरविली  जात आहे. प्रवाशांना तिकिट देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स तिकिट इश्यू मशिनचा वापर केला जात आहे.   अधिकाधिक बसस्थानकांवर संगणकीय आरक्षण सुविधा पुरविण्यात आली. यात्रा, प्रासंगिक  करार, आवडेल तेथे प्रवास व मासिक पास या योजना सुरू करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न  करण्यात आला.१९६८-६९ ते १९८७-८८ अशी २0 वर्षे एसटीच्या उत्कर्षाची गेली. मात्र १९८८  मध्ये मोटर वाहन कायद्यात झालेल्या बदलानंतर पर्यटन परवाने मुक्तपणे देण्यास सुरुवात झाली.  शिवाय परवान्याच्या अटीही पाळल्या जात नव्हत्या. कायदा व न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही या  वाहनांकडून अवैध प्रवासी वाहतूक थांबली नाही. परिणामी १९८८-८९ ते २00५-0६ या १८  वर्षांच्या काळात एसटीला अनेक अडचणीतून मार्गक्रमण करावे लागले ते आजही करावे लागत  आहे. डिझेल दरवाढ, टायर आणि सुट्या भागांच्या किंमतीत झालेली वाढ, शासनाचे प्रतिकूल  धोरण आदी कारणांमुळे २0१२-१३ पासून एसटी तोट्यात आहे. शासनाकडे महामंडळाचे १८४0  कोटी थकीत आहे. महामंडळाचा शासनाला हातभार लागत असतानाही पथकर, किफायतशीर  मार्गावरील सेवेमुळे होणार्‍या नुकसानीची भरपाई दिली जात नाही. सर्वाधिक १७.५ टक्के प्रवासी कर  महाराष्ट्रात आहे. या सर्व बाबींचा परिणाम कामगारांच्या अतिकालिक भत्त्यात कपात, विविध  आर्थिक लाभांना कात्री, विनावाहक सेवा आदींवर होत आहे.