शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाहनमालकांना दंड आकारणार नाही

By admin | Updated: April 14, 2017 02:18 IST

फिटनेस सर्टिफिकेटचे नूतनीकरण करण्यास विलंब झाल्यास वाहनमालकांकडून आकारण्यात येणारा दंड रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती गुरुवारी

मुंबई : फिटनेस सर्टिफिकेटचे नूतनीकरण करण्यास विलंब झाल्यास वाहनमालकांकडून आकारण्यात येणारा दंड रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती गुरुवारी सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली. सरकारच्या या निर्णयामुळे रिक्षा, टॅक्सी व अन्य वाहनांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत टॅक्सी व रिक्षामालकांना फिटनेस सर्टिफिकेटचे नूतनीकरण करण्यास १५ दिवस किंवा त्याहून अधिक दिवस विलंब झाल्यास १०० रुपये तर अन्य वाहनांना २०० रुपये दंड भरावा लागत असे. मात्र, एप्रिल २०१७पासून हा दंड रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे गृहविभागाचे (परिवहन व बंदर) प्रधान सचिव मनोज सौनिक यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.हे प्रतिज्ञापत्र पुण्याचे श्रीकांत कर्वे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उत्तर देताना सादर करण्यात आले. मोटार व्हेहिकल अ‍ॅक्टमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार राज्यांतील आरटीओंमध्ये वाहनांची तपासणी न करताच फिटनेस सर्टिफिकेट देत असल्याच आरोप कर्वे यांनी केला आहे. त्यावर न्या. अभय ओक व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाने ही रक्कम कशासाठी आकारली जाते? अशी विचारणा आरटीओकडे केली. ही रक्कम आकारण्याची परवानगी दिल्यासंदर्भात ज्या फायली उपलब्ध आहेत, त्या सादर करा, असे निर्देशही राज्य सरकारला दिले. (प्रतिनिधी) चाचणी अशक्यराज्यातील प्रत्येक आरटीओत दिवासातून किमान ७० वाहनांची चाचणी केली जाते व फिटनेस सर्टिफिकेट दिले जाते. कायद्यानुसार ही चाचणी केली तर दिवसातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहनांची चाचणी करणे अशक्य आहे. त्याशिवाय आरटीओ ‘किरकोळ’ या मथळ्याखाली वाहन मालकाकडून ४०० रुपये वसूल करत असल्याचा आरोपही कर्वे यांनी याचिकेद्वारे केला आहे.