शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

कर्जदारांपासून सुटण्यासाठी आई, आजीची केली हत्या

By admin | Updated: April 28, 2017 03:44 IST

आईने घेतलेले कर्ज, त्यामुळे कर्जदारांची घराबाहेर वाढती रांग यातून सुटण्यासाठी अंधेरीच्या समीरने आईसह आजीची हत्या

मुंबई : आईने घेतलेले कर्ज, त्यामुळे कर्जदारांची घराबाहेर वाढती रांग यातून सुटण्यासाठी अंधेरीच्या समीरने आईसह आजीची हत्या करत स्वत:ला संपविल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याचा आई आणि आजीवर जीव होता. आपल्यानंतर त्यांचे काय होणार, या काळजीत त्याने हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांना आहे. अंधेरी पश्चिमेतील इंदिरानगर परिसरातील संक्रमण शिबिरात समीर बारसकर उर्फ समीर खान, आई मीनाताई बारसकर उर्फ मीनाताई खान आणि आजी फातिमा शेख (७५) यांच्यासोबत राहायचा. समीर हा मीनाताई यांचा सावत्र मुलगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, तो त्यांचाच मुलगा असल्याचे तपासात समोर आले. फातिमा ही मीनाताई यांची मानलेली आई आहे. समीरचा दोघींवरही जीव होता. मीनातार्इंनी बरेच कर्ज काढले होते. समीरचा धाबा होता. धाब्यावर जमलेल्या गल्ल्यातील पैशांतून तो घरखर्च आणि कर्जदारांचे पैसे फेडत होता. मात्र कर्ज फिटत नव्हते. त्यामुळे नेहमी दारावर येणाऱ्या कर्जदारांमुळे समीर वैतागून गेला होता. रोजच्या कटकटीला कंटाळून त्याने जीव देण्याचा निर्णय घेतला. आपल्यानंतर आई आणि आजीचे काय होणार, या काळजीने त्याने त्यांनाही संपविण्याचे ठरवले. मंगळवारच्या रात्री आई आणि आजीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यांच्या अंगावर चादर पांघरून स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. मात्र, आई, आजीच्या शवविच्छेदनाचा अहवाल मिळणे बाकी आहे. (प्रतिनिधी)