शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

बहुतांश शाळांनी दप्तराचे ओझे कमी केले

By admin | Updated: July 28, 2016 01:39 IST

शाळेच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी राज्यातील ८७.४५ टक्के शाळांनी केल्याचा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला आहे.

मुंबई : शाळेच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी राज्यातील ८७.४५ टक्के शाळांनी केल्याचा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला आहे. चिमुकल्यांच्या पाठीवर त्यांच्या वयापेक्षा दुप्पट दप्तराचे ओझे लादण्यात येत असल्याने त्यांना अनेक विकारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांना मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा आदेश देण्यास राज्य सरकारला सांगावे, अशी मागणी चेंबूरच्या सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.बुधवारच्या सुनावणीत मुख्य सरकारी वकील पुर्णिमा कंथारिया यांनी राज्यातील शाळा तपासणीचा अहवाल खंडपीठापुढे सादर केला. अहवालानुसार, अधिकाऱ्यांनी १७ हजार शाळांची तपासणी केली. मात्र अद्यापही काही शाळा परिपत्रकाची अंमलबजावणी करत नसल्याचे याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यावर खंडपीठाने ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश दिले. तसेच राज्य सरकारला पुढील अहवाल १७ आॅक्टोबर रोजी सादर करण्याचे निर्देश दिले.सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार राज्यात एकूण १ लाख ७ हजार ५८५ शाळा आहेत. त्यापैकी १७ हजार २३५ शाळांतील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याची तपासणी करण्यात आली.(प्रतिनिधी) शिफारशींच्या आधारावर परिपत्रक- दप्तराच्या ओझ्यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात एका समितीची स्थापना केली. - या समितीने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अनेक शिफारशी केल्या. त्या शिफारशींचा आधार घेत शासनाने परिपत्रक काढले व या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातील सर्व शाळांना दिले.