शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

ठाण्यात उच्चभ्रू वस्त्यांत फटाक्यांचे प्रदूषण सर्वाधिक

By admin | Updated: November 2, 2016 03:06 IST

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणाबाबत झालेल्या जनजागृतीचा परिणाम दिवाळीत दिसून आला.

ठाणे : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणाबाबत झालेल्या जनजागृतीचा परिणाम दिवाळीत दिसून आला. मागील वर्षी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी ध्वनी प्रदूषणाची पातळी ही १३० डेसीबलपेक्षाही अधिक झाली होती. यंदा ती १२५ डेसीबलपेक्षाही कमी झाल्याचे पाहणीत आढळले आहे. दिवाळीच्या पहिल्या तीन दिवसांपैकी लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच सर्वाधिक फटाक्यांची आतषबाजी झाली आहे. ठाण्याच्या उच्चभू्र वस्त्यांमध्ये मोठ्या आवाजाचे आणि वायु प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचे प्रमाण मात्र वाढल्याचे या पाहणीतून समोर आले आहे. वाढत्या जनजागृतीमुळे मोठ्या आवाजांच्या फटाक्यांचे प्रमाण कमी होऊन आतषबाजीच्या फटाक्यांची मागणी मात्र वाढल्याचेही या पाहणीतून समोर आले आहे.मागील काही वर्षांपासून ठाण्यातील दक्ष नागरिक डॉ. महेश बेडेकर हे ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात लढा देत आहेत. त्यांच्या लढ्याला आता खऱ्या अर्थाने यश आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि इतर सामाजिक संस्थांनीदेखील दिवाळीत होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात जनजागृती सुरु केल्याने मागील दोन ते तीन वर्षापासून मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. मागील वर्षी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी शहरात ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण हे १३० डेसीबल पेक्षा अधिक होते. यंदा या दिवशी फटाके वाजविण्याचे प्रमाण हे कित्येक पटीने अधिक असतांनाही आवाजाचे प्रमाण मात्र १२५ डेसीबल पेक्षा कमी असल्याची माहिती बेडेकर यांनी लोकमतशी बोलतांना दिली. या दिवशी शहरातील नौपाडा, गोखले रोड, राम मारुती रोड आदी भागात फटाके फोडण्याचे प्रमाण फारच कमी झाल्याचे आढळले आहे. पाचपाखाडी, वर्तकनगर, किंबहुना शहरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मात्र मोठ्या आवाजाचे आणि वायु प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचे प्रमाण हे अधिक आढळून आल्याचेही बेडकर यांनी सांगितले. पहिल्या दिवशी फटाके फोडण्याचे प्रमाण फारच कमी होते. तिसऱ्या दिवशी मात्र हे प्रमाण फारच तुरळक दिसून आले आहे. केवळ लक्ष्मीपुजनाच्याच दिवशीच शहरात अधिक फटाके फोडले गेले आहेत. >शाळकरी मुलांनी दिला उत्तम प्रतिसादमागील काही वर्षात सुरु असलेली जनजागृती आणि शाळांनादेखील विद्यार्थ्यांना केलेले प्रबोधन यामुळे यंदा त्याचा फायदा झाला असून शहरातील उच्चभ्रू वस्ती सोडल्यास इतर ठिकाणी मात्र ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण हे मागील वर्षीच्या तुलनेत फारच कमी आढळून आले आहे. शाळकरी मुलांनीही मोठ्या आवाजाच्या फटांक्याऐवजी आवाज विरहित फटाक्यांची मागणी लावून धरल्याचादेखील हा परिणाम असून शकतो.दरम्यान दिवाळीच्या पहिल्या दिवशी आवाजाची पातळी ही सकाळच्या सुमारास ७० ते ७५ डेसीबलपर्यंत होती. तर लक्ष्मीपुजनाच्या दिवशी ती १२५ डेसीबलपर्यंत पोहचली होती. इतर दिवशी पुन्हा हे प्रमाण ७० डेसीबल पर्यंत आले होते. एकूणच आणखी जनजागृती झाली आणि आपण स्वत:च यातून काही बोध घेतला तर मात्र येत्या काळात ध्वनी प्रदूषणाचे हे प्रमाण आणखी कमी होईल, असा विश्वासही बेडेकर यांनी व्यक्त केला.