शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

ठाण्यात उच्चभ्रू वस्त्यांत फटाक्यांचे प्रदूषण सर्वाधिक

By admin | Updated: November 2, 2016 03:06 IST

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणाबाबत झालेल्या जनजागृतीचा परिणाम दिवाळीत दिसून आला.

ठाणे : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणाबाबत झालेल्या जनजागृतीचा परिणाम दिवाळीत दिसून आला. मागील वर्षी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी ध्वनी प्रदूषणाची पातळी ही १३० डेसीबलपेक्षाही अधिक झाली होती. यंदा ती १२५ डेसीबलपेक्षाही कमी झाल्याचे पाहणीत आढळले आहे. दिवाळीच्या पहिल्या तीन दिवसांपैकी लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच सर्वाधिक फटाक्यांची आतषबाजी झाली आहे. ठाण्याच्या उच्चभू्र वस्त्यांमध्ये मोठ्या आवाजाचे आणि वायु प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचे प्रमाण मात्र वाढल्याचे या पाहणीतून समोर आले आहे. वाढत्या जनजागृतीमुळे मोठ्या आवाजांच्या फटाक्यांचे प्रमाण कमी होऊन आतषबाजीच्या फटाक्यांची मागणी मात्र वाढल्याचेही या पाहणीतून समोर आले आहे.मागील काही वर्षांपासून ठाण्यातील दक्ष नागरिक डॉ. महेश बेडेकर हे ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात लढा देत आहेत. त्यांच्या लढ्याला आता खऱ्या अर्थाने यश आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि इतर सामाजिक संस्थांनीदेखील दिवाळीत होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात जनजागृती सुरु केल्याने मागील दोन ते तीन वर्षापासून मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. मागील वर्षी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी शहरात ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण हे १३० डेसीबल पेक्षा अधिक होते. यंदा या दिवशी फटाके वाजविण्याचे प्रमाण हे कित्येक पटीने अधिक असतांनाही आवाजाचे प्रमाण मात्र १२५ डेसीबल पेक्षा कमी असल्याची माहिती बेडेकर यांनी लोकमतशी बोलतांना दिली. या दिवशी शहरातील नौपाडा, गोखले रोड, राम मारुती रोड आदी भागात फटाके फोडण्याचे प्रमाण फारच कमी झाल्याचे आढळले आहे. पाचपाखाडी, वर्तकनगर, किंबहुना शहरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मात्र मोठ्या आवाजाचे आणि वायु प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचे प्रमाण हे अधिक आढळून आल्याचेही बेडकर यांनी सांगितले. पहिल्या दिवशी फटाके फोडण्याचे प्रमाण फारच कमी होते. तिसऱ्या दिवशी मात्र हे प्रमाण फारच तुरळक दिसून आले आहे. केवळ लक्ष्मीपुजनाच्याच दिवशीच शहरात अधिक फटाके फोडले गेले आहेत. >शाळकरी मुलांनी दिला उत्तम प्रतिसादमागील काही वर्षात सुरु असलेली जनजागृती आणि शाळांनादेखील विद्यार्थ्यांना केलेले प्रबोधन यामुळे यंदा त्याचा फायदा झाला असून शहरातील उच्चभ्रू वस्ती सोडल्यास इतर ठिकाणी मात्र ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण हे मागील वर्षीच्या तुलनेत फारच कमी आढळून आले आहे. शाळकरी मुलांनीही मोठ्या आवाजाच्या फटांक्याऐवजी आवाज विरहित फटाक्यांची मागणी लावून धरल्याचादेखील हा परिणाम असून शकतो.दरम्यान दिवाळीच्या पहिल्या दिवशी आवाजाची पातळी ही सकाळच्या सुमारास ७० ते ७५ डेसीबलपर्यंत होती. तर लक्ष्मीपुजनाच्या दिवशी ती १२५ डेसीबलपर्यंत पोहचली होती. इतर दिवशी पुन्हा हे प्रमाण ७० डेसीबल पर्यंत आले होते. एकूणच आणखी जनजागृती झाली आणि आपण स्वत:च यातून काही बोध घेतला तर मात्र येत्या काळात ध्वनी प्रदूषणाचे हे प्रमाण आणखी कमी होईल, असा विश्वासही बेडेकर यांनी व्यक्त केला.