शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

शहरांच्या निवडीसाठी सर्वतोपरी प्रयत्न गरजेचे

By admin | Updated: November 8, 2015 00:30 IST

स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय स्तरावरील आंतरराज्यीय स्मार्ट सिटी चॅलेंज स्पर्धेमध्ये राज्यातील दहा शहरांची निवड होण्यासाठी सर्वतोपरी

मुंबई : स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय स्तरावरील आंतरराज्यीय स्मार्ट सिटी चॅलेंज स्पर्धेमध्ये राज्यातील दहा शहरांची निवड होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.स्मार्ट सिटी चॅलेंज स्पर्धेत राज्यातील शहरांची निवड व्हावी यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांच्या दालनात आढावा बैठक झाली. अपर मुख्य सचिव (नियोजन) सुनील पोरवाल, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता, प्रधान सचिव (ऊर्जा) अपूर्व चंद्रा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त यु. पी. एस. मदान, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलींद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर आदींसह अभियानात सहभागी झालेल्या महानगरपालिकांचे आयुक्त बैठकीला उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारतर्फे देशभरातून २० शहरांची निवड करण्यात येणार आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रत्येक शहराने आपले मॉडेल तयार करुन जास्तीत जास्त गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील जास्तीत शहरांची निवड होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले पाहिजेत. राज्यातील दहा शहरांची निवड व्हावीअभियानांतर्गत ‘स्मार्ट लेव्हल असेसमेंट’, ‘एरिया बेस्ड डेव्हलपमेंट’, ‘पॅन सिटी डेव्हलपमेंट’ या परिमाणांनुसार नियोजनपूर्वक सुविधांची उभारणी, प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी गतिमान प्रक्रिया, सुलभ वाहतूक सुविधा, पारदर्शक व गतिमान प्रशासकीय कारभार, वाजवी किंमतीत घरांची उपलब्धता, आवश्यक तेथे पुनर्विकास आदी विविध बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सर्वांनी परस्पर समन्वय ठेवून राज्यातील दहा शहरांची स्पर्धेत निवड व्हावी, यासाठी एकित्रत प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.