शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

शहरांच्या निवडीसाठी सर्वतोपरी प्रयत्न गरजेचे

By admin | Updated: November 8, 2015 00:30 IST

स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय स्तरावरील आंतरराज्यीय स्मार्ट सिटी चॅलेंज स्पर्धेमध्ये राज्यातील दहा शहरांची निवड होण्यासाठी सर्वतोपरी

मुंबई : स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय स्तरावरील आंतरराज्यीय स्मार्ट सिटी चॅलेंज स्पर्धेमध्ये राज्यातील दहा शहरांची निवड होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.स्मार्ट सिटी चॅलेंज स्पर्धेत राज्यातील शहरांची निवड व्हावी यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांच्या दालनात आढावा बैठक झाली. अपर मुख्य सचिव (नियोजन) सुनील पोरवाल, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता, प्रधान सचिव (ऊर्जा) अपूर्व चंद्रा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त यु. पी. एस. मदान, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलींद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर आदींसह अभियानात सहभागी झालेल्या महानगरपालिकांचे आयुक्त बैठकीला उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारतर्फे देशभरातून २० शहरांची निवड करण्यात येणार आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रत्येक शहराने आपले मॉडेल तयार करुन जास्तीत जास्त गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील जास्तीत शहरांची निवड होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले पाहिजेत. राज्यातील दहा शहरांची निवड व्हावीअभियानांतर्गत ‘स्मार्ट लेव्हल असेसमेंट’, ‘एरिया बेस्ड डेव्हलपमेंट’, ‘पॅन सिटी डेव्हलपमेंट’ या परिमाणांनुसार नियोजनपूर्वक सुविधांची उभारणी, प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी गतिमान प्रक्रिया, सुलभ वाहतूक सुविधा, पारदर्शक व गतिमान प्रशासकीय कारभार, वाजवी किंमतीत घरांची उपलब्धता, आवश्यक तेथे पुनर्विकास आदी विविध बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सर्वांनी परस्पर समन्वय ठेवून राज्यातील दहा शहरांची स्पर्धेत निवड व्हावी, यासाठी एकित्रत प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.