शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

ग्रामीण महाराष्ट्रात मृत्युदर चढाच!

By admin | Updated: April 23, 2016 03:53 IST

शेवटच्या घरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत असल्या, तरीही ग्रामीण महाराष्ट्रातील मृत्युदर आजही शहरी आणि राज्याच्या एकंदर मृत्युदरापेक्षा अधिक आहे.

संकेत सातोपे,  मुंबईशेवटच्या घरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत असल्या, तरीही ग्रामीण महाराष्ट्रातील मृत्युदर आजही शहरी आणि राज्याच्या एकंदर मृत्युदरापेक्षा अधिक आहे. जनगणनेच्या एका अहवालानुसार, १९७१ ते २०१३ या काळात मृत्युदर आटोक्यात आणण्यात मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. मात्र शहरी आणि ग्रामीण भागातील मृत्युदरामधील तफावत इतक्या वर्षांनंतरही कायम आहे.१९७१ साली राज्याचा मृत्युदर दरहजारी १२.३ होता. मात्र त्याच वर्षी हा दर शहरात ९.७ आणि ग्रामीण भागात १३.५ होता. त्यानंतरच्या दशकात हा दर कमी होत १९८० साली दरहजारी ९.७ एकूण, तर १०.९ ग्रामीण आणि ७.१ शहरी असा झाला. नव्वदच्या दशकात राज्याचा मृत्युदर आणखी कमी होऊन दरहजारी ७.४ वर आला. मात्र त्याही वेळी ग्रामीण महाराष्ट्रातील मृत्युदर ८.५ होता, तर शहरी भागात ५.४ होता.२००० साली हा दर किंचित वाढून दरहजारी ७.५ झाला, याच वर्षी ग्रामीण भागातील दर ८.६, तर शहरी भागातील दर ५.८ असा होता. २०१३मध्ये हा दर आणखी कमी करून राज्याचा एकूण मृत्युदर ६.२ पर्यंत, तर शहरी भागातील मृत्युदर दरहजारी ५ इथपर्यंत खाली आणण्यात शासनाला यश आले. परंतु, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्राचा मृत्युदर दरहजारी दोनने अधिक म्हणजे ७.१ इतका राहिला आहे. दर्जेदार सेवासुविधांची उपलब्धता कमी असल्यामुळेच ही तफावत जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.शहरांमध्ये आरोग्य सेवा, मिळकत आणि शिक्षण यांचे प्रमाण ग्रामीण भागांच्या तुलनेत जास्त आहे. तसेच शिक्षण-नोकरीसाठी शहरांत स्थलांतरित होणाऱ्या तरुणांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागांत वृद्धांची संख्या अधिक आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून शहरांतील मृत्युदर ग्रामीण भागांच्या तुलनेत कमी आहे. ही परिस्थिती शंभर वर्षांपूर्वीही अशीच होती. ती पालटायची असेल, तर ग्रामीण भागांत केवळ आरोग्य सुविधा देऊन भागणार नाही. अन्य पायाभूत सुविधाही उपलब्ध करून द्याव्या लागतील.- डॉ. अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते