शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

ग्रामीण महाराष्ट्रात मृत्युदर चढाच!

By admin | Updated: April 23, 2016 03:53 IST

शेवटच्या घरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत असल्या, तरीही ग्रामीण महाराष्ट्रातील मृत्युदर आजही शहरी आणि राज्याच्या एकंदर मृत्युदरापेक्षा अधिक आहे.

संकेत सातोपे,  मुंबईशेवटच्या घरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत असल्या, तरीही ग्रामीण महाराष्ट्रातील मृत्युदर आजही शहरी आणि राज्याच्या एकंदर मृत्युदरापेक्षा अधिक आहे. जनगणनेच्या एका अहवालानुसार, १९७१ ते २०१३ या काळात मृत्युदर आटोक्यात आणण्यात मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. मात्र शहरी आणि ग्रामीण भागातील मृत्युदरामधील तफावत इतक्या वर्षांनंतरही कायम आहे.१९७१ साली राज्याचा मृत्युदर दरहजारी १२.३ होता. मात्र त्याच वर्षी हा दर शहरात ९.७ आणि ग्रामीण भागात १३.५ होता. त्यानंतरच्या दशकात हा दर कमी होत १९८० साली दरहजारी ९.७ एकूण, तर १०.९ ग्रामीण आणि ७.१ शहरी असा झाला. नव्वदच्या दशकात राज्याचा मृत्युदर आणखी कमी होऊन दरहजारी ७.४ वर आला. मात्र त्याही वेळी ग्रामीण महाराष्ट्रातील मृत्युदर ८.५ होता, तर शहरी भागात ५.४ होता.२००० साली हा दर किंचित वाढून दरहजारी ७.५ झाला, याच वर्षी ग्रामीण भागातील दर ८.६, तर शहरी भागातील दर ५.८ असा होता. २०१३मध्ये हा दर आणखी कमी करून राज्याचा एकूण मृत्युदर ६.२ पर्यंत, तर शहरी भागातील मृत्युदर दरहजारी ५ इथपर्यंत खाली आणण्यात शासनाला यश आले. परंतु, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्राचा मृत्युदर दरहजारी दोनने अधिक म्हणजे ७.१ इतका राहिला आहे. दर्जेदार सेवासुविधांची उपलब्धता कमी असल्यामुळेच ही तफावत जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.शहरांमध्ये आरोग्य सेवा, मिळकत आणि शिक्षण यांचे प्रमाण ग्रामीण भागांच्या तुलनेत जास्त आहे. तसेच शिक्षण-नोकरीसाठी शहरांत स्थलांतरित होणाऱ्या तरुणांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागांत वृद्धांची संख्या अधिक आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून शहरांतील मृत्युदर ग्रामीण भागांच्या तुलनेत कमी आहे. ही परिस्थिती शंभर वर्षांपूर्वीही अशीच होती. ती पालटायची असेल, तर ग्रामीण भागांत केवळ आरोग्य सुविधा देऊन भागणार नाही. अन्य पायाभूत सुविधाही उपलब्ध करून द्याव्या लागतील.- डॉ. अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते