शहरं
Join us  
Trending Stories
1
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
2
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
3
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
4
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
5
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
6
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
7
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
8
हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्वीनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
9
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
10
चापलूस एआय तुमची हुजरेगिरी करायला सोकावले आहे!
11
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
12
जगभर: तरुणीवर अत्याचार, इटलीत थेट कायदाच बदलला !
13
विशेष लेख: व्हेंटिलेटरवर ठेवलेली ‘राज्यघटना’ समजून घेताना...
14
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
15
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
16
Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार
17
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
18
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
19
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
20
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण महाराष्ट्रात मृत्युदर चढाच!

By admin | Updated: April 23, 2016 03:53 IST

शेवटच्या घरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत असल्या, तरीही ग्रामीण महाराष्ट्रातील मृत्युदर आजही शहरी आणि राज्याच्या एकंदर मृत्युदरापेक्षा अधिक आहे.

संकेत सातोपे,  मुंबईशेवटच्या घरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत असल्या, तरीही ग्रामीण महाराष्ट्रातील मृत्युदर आजही शहरी आणि राज्याच्या एकंदर मृत्युदरापेक्षा अधिक आहे. जनगणनेच्या एका अहवालानुसार, १९७१ ते २०१३ या काळात मृत्युदर आटोक्यात आणण्यात मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. मात्र शहरी आणि ग्रामीण भागातील मृत्युदरामधील तफावत इतक्या वर्षांनंतरही कायम आहे.१९७१ साली राज्याचा मृत्युदर दरहजारी १२.३ होता. मात्र त्याच वर्षी हा दर शहरात ९.७ आणि ग्रामीण भागात १३.५ होता. त्यानंतरच्या दशकात हा दर कमी होत १९८० साली दरहजारी ९.७ एकूण, तर १०.९ ग्रामीण आणि ७.१ शहरी असा झाला. नव्वदच्या दशकात राज्याचा मृत्युदर आणखी कमी होऊन दरहजारी ७.४ वर आला. मात्र त्याही वेळी ग्रामीण महाराष्ट्रातील मृत्युदर ८.५ होता, तर शहरी भागात ५.४ होता.२००० साली हा दर किंचित वाढून दरहजारी ७.५ झाला, याच वर्षी ग्रामीण भागातील दर ८.६, तर शहरी भागातील दर ५.८ असा होता. २०१३मध्ये हा दर आणखी कमी करून राज्याचा एकूण मृत्युदर ६.२ पर्यंत, तर शहरी भागातील मृत्युदर दरहजारी ५ इथपर्यंत खाली आणण्यात शासनाला यश आले. परंतु, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्राचा मृत्युदर दरहजारी दोनने अधिक म्हणजे ७.१ इतका राहिला आहे. दर्जेदार सेवासुविधांची उपलब्धता कमी असल्यामुळेच ही तफावत जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.शहरांमध्ये आरोग्य सेवा, मिळकत आणि शिक्षण यांचे प्रमाण ग्रामीण भागांच्या तुलनेत जास्त आहे. तसेच शिक्षण-नोकरीसाठी शहरांत स्थलांतरित होणाऱ्या तरुणांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागांत वृद्धांची संख्या अधिक आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून शहरांतील मृत्युदर ग्रामीण भागांच्या तुलनेत कमी आहे. ही परिस्थिती शंभर वर्षांपूर्वीही अशीच होती. ती पालटायची असेल, तर ग्रामीण भागांत केवळ आरोग्य सुविधा देऊन भागणार नाही. अन्य पायाभूत सुविधाही उपलब्ध करून द्याव्या लागतील.- डॉ. अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते