शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सरकारकडून इंग्रजांपेक्षाही भयंकर दडपशाही-चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 05:29 IST

सरकारने विनाशकारी प्रकल्प कोकणच्या माथी मारताना जी दंडेली चालविली आहे तेवढी इंग्रजांच्या काळातही झाली नव्ह

राजापूर (जि. रत्नागिरी) : सरकारने विनाशकारी प्रकल्प कोकणच्या माथी मारताना जी दंडेली चालविली आहे तेवढी इंग्रजांच्या काळातही झाली नव्हती. सरकार जनतेच्या घरावर नांगर फिरवून विकास करणार असेल तर त्याला काँग्रेसचा विरोध असून हा प्रकल्प आम्ही हाणून पाडू, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.रिफायनरी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चव्हाण यांची सागवे येथील कोचाळी मैदानावर सभा झाली. व्यासपीठावर काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, खासदार हुसेन दलवाई, आमदार भाई सावंत, हुस्नबानु खलिफे, प्रदेश प्रवक्ते हरिष रोग्ये, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम आदी उपस्थित होते.या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याच्या निर्णयावरुन शिवसेना - भाजपामध्ये निर्माण झालेल्या संघर्षावर चव्हाण यांनी जोरदार तोफ डागली. आपणही या राज्याचे मुख्यमंत्री होतो. उद्योगमंत्री म्हणूनही काम पाहिले असल्याने सर्व कायदे चांगलेच माहीत आहेत. रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी उद्योग खात्याने काढलेली अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार जसे मुख्यमंत्र्याना आहेत, तसेच ते उद्योगमंत्र्यांनाही आहेत. मात्र, ते अधिकार सचिव पातळीवर नाहीत, याची त्यांनी आठवण करुन दिली. उद्योगमंत्र्यांना तसे अधिकार नाहीत, हे मुख्यमंत्र्यांचे विधान लक्षात घेता हे राज्य मुख्यमंत्र्यांचे आहे का सचिवांचे आहे, असा प्रश्नही चव्हाण यांनी केला.