शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सरकारकडून इंग्रजांपेक्षाही भयंकर दडपशाही-चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 05:29 IST

सरकारने विनाशकारी प्रकल्प कोकणच्या माथी मारताना जी दंडेली चालविली आहे तेवढी इंग्रजांच्या काळातही झाली नव्ह

राजापूर (जि. रत्नागिरी) : सरकारने विनाशकारी प्रकल्प कोकणच्या माथी मारताना जी दंडेली चालविली आहे तेवढी इंग्रजांच्या काळातही झाली नव्हती. सरकार जनतेच्या घरावर नांगर फिरवून विकास करणार असेल तर त्याला काँग्रेसचा विरोध असून हा प्रकल्प आम्ही हाणून पाडू, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.रिफायनरी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चव्हाण यांची सागवे येथील कोचाळी मैदानावर सभा झाली. व्यासपीठावर काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, खासदार हुसेन दलवाई, आमदार भाई सावंत, हुस्नबानु खलिफे, प्रदेश प्रवक्ते हरिष रोग्ये, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम आदी उपस्थित होते.या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याच्या निर्णयावरुन शिवसेना - भाजपामध्ये निर्माण झालेल्या संघर्षावर चव्हाण यांनी जोरदार तोफ डागली. आपणही या राज्याचे मुख्यमंत्री होतो. उद्योगमंत्री म्हणूनही काम पाहिले असल्याने सर्व कायदे चांगलेच माहीत आहेत. रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी उद्योग खात्याने काढलेली अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार जसे मुख्यमंत्र्याना आहेत, तसेच ते उद्योगमंत्र्यांनाही आहेत. मात्र, ते अधिकार सचिव पातळीवर नाहीत, याची त्यांनी आठवण करुन दिली. उद्योगमंत्र्यांना तसे अधिकार नाहीत, हे मुख्यमंत्र्यांचे विधान लक्षात घेता हे राज्य मुख्यमंत्र्यांचे आहे का सचिवांचे आहे, असा प्रश्नही चव्हाण यांनी केला.