शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात अधिक बालमृत्यू

By admin | Updated: July 18, 2016 04:36 IST

अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटपेक्षाही भयावह स्थिती चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.

मिलिंद कीर्ती,

चंद्रपूर- अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटपेक्षाही भयावह स्थिती चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. २०१५-१६ या वर्षात मेळघाटमध्ये ४४६ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. तर, याच काळात चंद्रपूर जिल्ह्यातील बालमृत्यूचा आकडा ४६५ वर गेला होता. यामध्ये नवजात बालकांच्या मृत्यूंचा समावेश नाही. मेळघाटप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातही आदिवासी क्षेत्र असून तेथील बालके चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातील एनआरसीमध्ये दाखल केली जात असतात. त्यामुळे एनआरसीमध्ये बालमृत्यू अधिक होत असल्याची नोंद झाली आहे. सर्वप्रथम १९९३मध्ये अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालमृत्यंूची भयावह स्थिती उघडकीस आली होती. परिणामी आदिवासी बालके व मातांच्या पोषणाकरिता सर्वाधिक शासकीय योजना मेळघाटमध्ये राबविण्यात आल्या. विविध प्रगतिशील संवर्धक योजनांमुळे मेळघाटात १०५० बालमृत्यूंची संख्या यावर्षी ४४६पर्यंत खाली आली आहे. चंद्रपूर येथे २०१४-१५मध्ये ८१३ बालमृत्यू झाले होते. त्या वर्षी मेळघाटमध्ये ५१५ बालमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यापूर्वी २०१३-१४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल १२६० तर मेळघाटात ६०० बालमृत्यूंची नोंद करण्यात आली. २०१२-१३मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात ६९६ तर मेळघाटात ४०९ बालमृत्यू झाले होते. शहरी क्षेत्राची नोंद अधिकचंद्रपूर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण अशी बालमृत्यूंची नोंद केली जाते. त्यामध्ये २०१५-१६मध्ये शहरी क्षेत्र २९३ बालमृत्यू व ग्रामीण क्षेत्र १७२ बालमृत्यू, २०१४-१५मध्ये शहरी क्षेत्र ५७६ बालमृत्यू व ग्रामीण क्षेत्र २३७ बालमृत्यू, २०१३-१४मध्ये शहरी क्षेत्र ९९२ बालमृत्यू व ग्रामीण क्षेत्र २६८ बालमृत्यू नोंदविण्यात आले आहेत.मेळघाट आणि चंद्रपूर जिल्ह्याची तुलना करणार नाही. तेथील परिस्थिती आणि चंद्रपूरची परिस्थिती वेगळी आहे. आपण कुपोषणमुक्ती व बालमृत्यू नियंत्रणात चांगली प्रगती केली आहे. आपले प्रयत्न सुरू आहेत.- डॉ. श्रीराम गोगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प., चंद्रपूर