शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

चंद्रपुरात अधिक बालमृत्यू

By admin | Updated: July 18, 2016 04:36 IST

अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटपेक्षाही भयावह स्थिती चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.

मिलिंद कीर्ती,

चंद्रपूर- अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटपेक्षाही भयावह स्थिती चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. २०१५-१६ या वर्षात मेळघाटमध्ये ४४६ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. तर, याच काळात चंद्रपूर जिल्ह्यातील बालमृत्यूचा आकडा ४६५ वर गेला होता. यामध्ये नवजात बालकांच्या मृत्यूंचा समावेश नाही. मेळघाटप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातही आदिवासी क्षेत्र असून तेथील बालके चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातील एनआरसीमध्ये दाखल केली जात असतात. त्यामुळे एनआरसीमध्ये बालमृत्यू अधिक होत असल्याची नोंद झाली आहे. सर्वप्रथम १९९३मध्ये अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालमृत्यंूची भयावह स्थिती उघडकीस आली होती. परिणामी आदिवासी बालके व मातांच्या पोषणाकरिता सर्वाधिक शासकीय योजना मेळघाटमध्ये राबविण्यात आल्या. विविध प्रगतिशील संवर्धक योजनांमुळे मेळघाटात १०५० बालमृत्यूंची संख्या यावर्षी ४४६पर्यंत खाली आली आहे. चंद्रपूर येथे २०१४-१५मध्ये ८१३ बालमृत्यू झाले होते. त्या वर्षी मेळघाटमध्ये ५१५ बालमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यापूर्वी २०१३-१४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल १२६० तर मेळघाटात ६०० बालमृत्यूंची नोंद करण्यात आली. २०१२-१३मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात ६९६ तर मेळघाटात ४०९ बालमृत्यू झाले होते. शहरी क्षेत्राची नोंद अधिकचंद्रपूर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण अशी बालमृत्यूंची नोंद केली जाते. त्यामध्ये २०१५-१६मध्ये शहरी क्षेत्र २९३ बालमृत्यू व ग्रामीण क्षेत्र १७२ बालमृत्यू, २०१४-१५मध्ये शहरी क्षेत्र ५७६ बालमृत्यू व ग्रामीण क्षेत्र २३७ बालमृत्यू, २०१३-१४मध्ये शहरी क्षेत्र ९९२ बालमृत्यू व ग्रामीण क्षेत्र २६८ बालमृत्यू नोंदविण्यात आले आहेत.मेळघाट आणि चंद्रपूर जिल्ह्याची तुलना करणार नाही. तेथील परिस्थिती आणि चंद्रपूरची परिस्थिती वेगळी आहे. आपण कुपोषणमुक्ती व बालमृत्यू नियंत्रणात चांगली प्रगती केली आहे. आपले प्रयत्न सुरू आहेत.- डॉ. श्रीराम गोगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प., चंद्रपूर