शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांऐवजी 70 हजारहून अधिक मुंबईकरांची 'नोटा'ला पसंती

By admin | Updated: February 25, 2017 12:41 IST

मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे यंदाचे निकाल अनेक प्रकारे आश्चर्यचकीत करणारे ठरले आहेत. दिग्गज नेत्यांच्या पराभवापासून ते मोठ्या प्रमाणात नोटाचा वापर हे यंदाच्या निवडणुकांचे मुख्य आकर्षण ठरले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25 - मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे यंदाचे निकाल अनेक प्रकारे आश्चर्यचकीत करणारे ठरले आहेत. दिग्गज नेत्यांच्या पराभवापासून ते मोठ्या प्रमाणात 'नोटा' पर्यायाचा वापर हे यंदाच्या निवडणुकांचे मुख्य आकर्षण ठरले आहे. यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी ईव्हीएममधील 'नोटा' पर्यायाचा   मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. महानगरपालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार 227 प्रभागांमध्ये जवळपास 72,897 मुंबईकरांनी उमेदवारांना मतदान करण्याऐवजी 'नोटा' पर्यायाला अधिक पसंती दिली आहे. 
(भाजपाच्या यशाच्या फुग्यात तेवढी हवा आहे का? - उद्धव ठाकरे)
 
अनेक प्रभागांमध्ये नेत्यांना निवडण्याऐवजी मतदार राजाने नोटाचा पर्याय स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे. नोटाच्या वाढत्या वापराला लोकशाहीतील एक नवी सुरुवात आहे, असे राजकीय विश्लेषक मानत आहेत. नोटा वापरणं म्हणजे मतदारांचा उमेदवारांविरोधात असलेला हा रोष आहे. शिवाय, मतदारांना चांगले उमेदवार हवे आहेत, असा थेट संकेत याद्वारे मिळत आहे, असे मत विश्लेषकांचे मांडले आहे.  
(ईश्वरचिठ्ठी विरोधात शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर जाणार कोर्टात)
 
मनपा निवडणुकांमध्ये मुंबईकरांकडून 'नोटा' पर्याय वापरासंदर्भात 'फ्री अ बिलियन'चे नोटा अॅक्टिव्हिस्ट जेमिन वैष्णो यांनी सांगितले की, 'उमेदवारांवर बहिष्कार टाकण्याची ही सुरुवात आहे. मतदार जेव्हा उमेदवारांचे कार्य आणि त्यांच्या प्रतिमेपासून समाधानी नसतात, तेव्हा ते नोटाचा वापर करतात. राजकीय पक्षांसाठी हा एक इशारा आहे. सर्व राजकीय पक्षांना मतदारांचा रोष समजून घेण्याची गरज आहे. वेळेत याकडे लक्ष दिले गेले नाही तर याचा वाईट परिणाम होईल', अशी शक्यताही त्यांनी आहे.
(राजाला टाळी न दिल्याने दादू बहुमतापासून वंचित)
 
ईव्हीएम मशिनमध्ये नोटाचा पर्याय उपलब्ध झाल्याने अधिक प्रमाणात नागरिकांकडून नोटाचा वापर करण्यात आला आहे. ज्या प्रभागांकडे 'नोटा' या पर्यायाचा वापर करण्यात आला आहे, तेथे निश्चित स्वरुपात उमेदवारांविरोधात मतदारांनी असंतोष व्यक्त केला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये 9 हजार जणांनी नोटाचा वापर केला होता. मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये तब्बल 70 हजारहून अधिक जणांनी नोटा पर्यायाचा वापर केला आहे. ही बाब लोकशाहीसाठी सकारात्मकआहे मात्र राजकारण आणि नेतेमंडळीसाठी हा संकेत चांगला नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.