शहरं
Join us  
Trending Stories
1
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
2
"विश्वासघातकी बदलणार नाहीत...", निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का; NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर पडला
3
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
4
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव
7
"हिरोईन मटेरियल तू वाटत नाहीस...", असं म्हणत अभिनेत्रीला मालिकेतून दाखवला बाहेरचा रस्ता
8
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
9
Anil Chauhan: चीनसोबतचा सीमावाद हे सर्वांत मोठे आव्हान; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे वक्तव्य
10
यमुनेच्या पुराने अर्धी दिल्ली पाण्यात; नोएडा, गाझियाबादमध्ये स्थिती बिकट
11
अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा
12
‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार
13
Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क
14
घोड्यांचे रक्त पाजून ब्राझीलच्या फॅक्टरीत दररोज तयार केले जातात कोट्यवधी मच्छर; कारण काय?
15
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
17
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
18
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
19
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
20
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!

नेत्यांऐवजी 70 हजारहून अधिक मुंबईकरांची 'नोटा'ला पसंती

By admin | Updated: February 25, 2017 12:41 IST

मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे यंदाचे निकाल अनेक प्रकारे आश्चर्यचकीत करणारे ठरले आहेत. दिग्गज नेत्यांच्या पराभवापासून ते मोठ्या प्रमाणात नोटाचा वापर हे यंदाच्या निवडणुकांचे मुख्य आकर्षण ठरले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25 - मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे यंदाचे निकाल अनेक प्रकारे आश्चर्यचकीत करणारे ठरले आहेत. दिग्गज नेत्यांच्या पराभवापासून ते मोठ्या प्रमाणात 'नोटा' पर्यायाचा वापर हे यंदाच्या निवडणुकांचे मुख्य आकर्षण ठरले आहे. यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी ईव्हीएममधील 'नोटा' पर्यायाचा   मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. महानगरपालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार 227 प्रभागांमध्ये जवळपास 72,897 मुंबईकरांनी उमेदवारांना मतदान करण्याऐवजी 'नोटा' पर्यायाला अधिक पसंती दिली आहे. 
(भाजपाच्या यशाच्या फुग्यात तेवढी हवा आहे का? - उद्धव ठाकरे)
 
अनेक प्रभागांमध्ये नेत्यांना निवडण्याऐवजी मतदार राजाने नोटाचा पर्याय स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे. नोटाच्या वाढत्या वापराला लोकशाहीतील एक नवी सुरुवात आहे, असे राजकीय विश्लेषक मानत आहेत. नोटा वापरणं म्हणजे मतदारांचा उमेदवारांविरोधात असलेला हा रोष आहे. शिवाय, मतदारांना चांगले उमेदवार हवे आहेत, असा थेट संकेत याद्वारे मिळत आहे, असे मत विश्लेषकांचे मांडले आहे.  
(ईश्वरचिठ्ठी विरोधात शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर जाणार कोर्टात)
 
मनपा निवडणुकांमध्ये मुंबईकरांकडून 'नोटा' पर्याय वापरासंदर्भात 'फ्री अ बिलियन'चे नोटा अॅक्टिव्हिस्ट जेमिन वैष्णो यांनी सांगितले की, 'उमेदवारांवर बहिष्कार टाकण्याची ही सुरुवात आहे. मतदार जेव्हा उमेदवारांचे कार्य आणि त्यांच्या प्रतिमेपासून समाधानी नसतात, तेव्हा ते नोटाचा वापर करतात. राजकीय पक्षांसाठी हा एक इशारा आहे. सर्व राजकीय पक्षांना मतदारांचा रोष समजून घेण्याची गरज आहे. वेळेत याकडे लक्ष दिले गेले नाही तर याचा वाईट परिणाम होईल', अशी शक्यताही त्यांनी आहे.
(राजाला टाळी न दिल्याने दादू बहुमतापासून वंचित)
 
ईव्हीएम मशिनमध्ये नोटाचा पर्याय उपलब्ध झाल्याने अधिक प्रमाणात नागरिकांकडून नोटाचा वापर करण्यात आला आहे. ज्या प्रभागांकडे 'नोटा' या पर्यायाचा वापर करण्यात आला आहे, तेथे निश्चित स्वरुपात उमेदवारांविरोधात मतदारांनी असंतोष व्यक्त केला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये 9 हजार जणांनी नोटाचा वापर केला होता. मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये तब्बल 70 हजारहून अधिक जणांनी नोटा पर्यायाचा वापर केला आहे. ही बाब लोकशाहीसाठी सकारात्मकआहे मात्र राजकारण आणि नेतेमंडळीसाठी हा संकेत चांगला नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.