शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

पाच महिन्यात ५ हजारपेक्षा जास्त बळी

By admin | Updated: October 16, 2016 22:31 IST

राज्यातील विविध रस्ते अपघातांत 2016 च्या जानेवारी ते मे महिन्यांत 5 हजारपेक्षा जास्त जणांचे बळी गेल्याची बाब समोर आली आहे. यात नाशिक, कोल्हापूर क्षेत्र आघाडीवर असल्याची माहिती आरटीओकडून

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 - राज्यातील विविध रस्ते अपघातांत 2016 च्या जानेवारी ते मे महिन्यांत 5 हजारपेक्षा जास्त जणांचे बळी गेल्याची बाब समोर आली आहे. यात नाशिक, कोल्हापूर क्षेत्र आघाडीवर असल्याची माहिती आरटीओकडून उपलब्ध झाली. महत्वाची बाब म्हणजे बळींच्या संख्येपेक्षा जखमींची संख्या कितीतरी पटीने जास्त असून 16 हजार 312 जण जखमी आहेत. 
 
दारु पिऊन वाहन चालविणे, जलद व बेदरकारपणे वाहन चालविणे याचबरोबर ओव्हरटेक केल्याने राज्यात सर्वाधिक अपघातांना तोंड द्यावे लागते. अपघात होऊ नये यासाठी महामार्ग पोलिसांकडून जनजागृतीही केली जाते. यासाठी महाविद्यालयांमध्ये मोहिम घेतानाच बॅनर किंवा हॉर्डिगव्दारेही संदेश दिले जातात. तरीही अपघात काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. 2015 मध्ये राज्यातील विविध अपघातांत 13 हजार 212 जणांचे बळी गेले होते. 2016 मधील जानेवारी ते मे महिन्यापर्यंत हाच आकडा 5 हजार 394 पर्यंत गेला आहे. नाशिक क्षेत्रातील अहमदनगर, धुळे, नंंदुरबार, जळगाव, नाशिक (ग्रामिण) 1 हजार 197 तर कोल्हापूर क्षेत्रातील कोल्हापूर, पुणे (ग्रामिण), सांगली, सातारा, सोलापूर (ग्रामिण)मध्ये 1 हजार 111 जणांचे बळी गेले असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर ठाणे क्षेत्र, अमरावती क्षेत्र आणि नागपूर क्षेत्राचा नंबर लागतो. पाच महिन्यात मुंबई शहरात तर 222 जणांचा मृत्यू रस्ते अपघातांत झाला आहे.