शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

पाच महिन्यात ५ हजारपेक्षा जास्त बळी

By admin | Updated: October 16, 2016 22:31 IST

राज्यातील विविध रस्ते अपघातांत 2016 च्या जानेवारी ते मे महिन्यांत 5 हजारपेक्षा जास्त जणांचे बळी गेल्याची बाब समोर आली आहे. यात नाशिक, कोल्हापूर क्षेत्र आघाडीवर असल्याची माहिती आरटीओकडून

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 - राज्यातील विविध रस्ते अपघातांत 2016 च्या जानेवारी ते मे महिन्यांत 5 हजारपेक्षा जास्त जणांचे बळी गेल्याची बाब समोर आली आहे. यात नाशिक, कोल्हापूर क्षेत्र आघाडीवर असल्याची माहिती आरटीओकडून उपलब्ध झाली. महत्वाची बाब म्हणजे बळींच्या संख्येपेक्षा जखमींची संख्या कितीतरी पटीने जास्त असून 16 हजार 312 जण जखमी आहेत. 
 
दारु पिऊन वाहन चालविणे, जलद व बेदरकारपणे वाहन चालविणे याचबरोबर ओव्हरटेक केल्याने राज्यात सर्वाधिक अपघातांना तोंड द्यावे लागते. अपघात होऊ नये यासाठी महामार्ग पोलिसांकडून जनजागृतीही केली जाते. यासाठी महाविद्यालयांमध्ये मोहिम घेतानाच बॅनर किंवा हॉर्डिगव्दारेही संदेश दिले जातात. तरीही अपघात काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. 2015 मध्ये राज्यातील विविध अपघातांत 13 हजार 212 जणांचे बळी गेले होते. 2016 मधील जानेवारी ते मे महिन्यापर्यंत हाच आकडा 5 हजार 394 पर्यंत गेला आहे. नाशिक क्षेत्रातील अहमदनगर, धुळे, नंंदुरबार, जळगाव, नाशिक (ग्रामिण) 1 हजार 197 तर कोल्हापूर क्षेत्रातील कोल्हापूर, पुणे (ग्रामिण), सांगली, सातारा, सोलापूर (ग्रामिण)मध्ये 1 हजार 111 जणांचे बळी गेले असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर ठाणे क्षेत्र, अमरावती क्षेत्र आणि नागपूर क्षेत्राचा नंबर लागतो. पाच महिन्यात मुंबई शहरात तर 222 जणांचा मृत्यू रस्ते अपघातांत झाला आहे.