शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
"प्रत्येक सनातनीला माझा संदेश...", राकेश किशोर यांच्याजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली
4
आरोग्य विमा की मेडीक्लेम? गंभीर आजार, ओपीडी आणि मॅटर्निटी कव्हरेज कशात मिळते, दोन्हीत किती फरक?
5
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
6
सात युद्धे थांबवल्याचा दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल नाहीच; कुणाला मिळाला 'शांतता पुरस्कार'
7
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
8
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
9
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
10
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
11
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
12
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
13
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
14
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
15
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
16
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
17
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
18
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
19
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
20
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?

पाच महिन्यात ५ हजारपेक्षा जास्त बळी

By admin | Updated: October 16, 2016 22:31 IST

राज्यातील विविध रस्ते अपघातांत 2016 च्या जानेवारी ते मे महिन्यांत 5 हजारपेक्षा जास्त जणांचे बळी गेल्याची बाब समोर आली आहे. यात नाशिक, कोल्हापूर क्षेत्र आघाडीवर असल्याची माहिती आरटीओकडून

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 - राज्यातील विविध रस्ते अपघातांत 2016 च्या जानेवारी ते मे महिन्यांत 5 हजारपेक्षा जास्त जणांचे बळी गेल्याची बाब समोर आली आहे. यात नाशिक, कोल्हापूर क्षेत्र आघाडीवर असल्याची माहिती आरटीओकडून उपलब्ध झाली. महत्वाची बाब म्हणजे बळींच्या संख्येपेक्षा जखमींची संख्या कितीतरी पटीने जास्त असून 16 हजार 312 जण जखमी आहेत. 
 
दारु पिऊन वाहन चालविणे, जलद व बेदरकारपणे वाहन चालविणे याचबरोबर ओव्हरटेक केल्याने राज्यात सर्वाधिक अपघातांना तोंड द्यावे लागते. अपघात होऊ नये यासाठी महामार्ग पोलिसांकडून जनजागृतीही केली जाते. यासाठी महाविद्यालयांमध्ये मोहिम घेतानाच बॅनर किंवा हॉर्डिगव्दारेही संदेश दिले जातात. तरीही अपघात काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. 2015 मध्ये राज्यातील विविध अपघातांत 13 हजार 212 जणांचे बळी गेले होते. 2016 मधील जानेवारी ते मे महिन्यापर्यंत हाच आकडा 5 हजार 394 पर्यंत गेला आहे. नाशिक क्षेत्रातील अहमदनगर, धुळे, नंंदुरबार, जळगाव, नाशिक (ग्रामिण) 1 हजार 197 तर कोल्हापूर क्षेत्रातील कोल्हापूर, पुणे (ग्रामिण), सांगली, सातारा, सोलापूर (ग्रामिण)मध्ये 1 हजार 111 जणांचे बळी गेले असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर ठाणे क्षेत्र, अमरावती क्षेत्र आणि नागपूर क्षेत्राचा नंबर लागतो. पाच महिन्यात मुंबई शहरात तर 222 जणांचा मृत्यू रस्ते अपघातांत झाला आहे.