शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यात ५ हजारपेक्षा जास्त बळी

By admin | Updated: October 16, 2016 22:31 IST

राज्यातील विविध रस्ते अपघातांत 2016 च्या जानेवारी ते मे महिन्यांत 5 हजारपेक्षा जास्त जणांचे बळी गेल्याची बाब समोर आली आहे. यात नाशिक, कोल्हापूर क्षेत्र आघाडीवर असल्याची माहिती आरटीओकडून

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 - राज्यातील विविध रस्ते अपघातांत 2016 च्या जानेवारी ते मे महिन्यांत 5 हजारपेक्षा जास्त जणांचे बळी गेल्याची बाब समोर आली आहे. यात नाशिक, कोल्हापूर क्षेत्र आघाडीवर असल्याची माहिती आरटीओकडून उपलब्ध झाली. महत्वाची बाब म्हणजे बळींच्या संख्येपेक्षा जखमींची संख्या कितीतरी पटीने जास्त असून 16 हजार 312 जण जखमी आहेत. 
 
दारु पिऊन वाहन चालविणे, जलद व बेदरकारपणे वाहन चालविणे याचबरोबर ओव्हरटेक केल्याने राज्यात सर्वाधिक अपघातांना तोंड द्यावे लागते. अपघात होऊ नये यासाठी महामार्ग पोलिसांकडून जनजागृतीही केली जाते. यासाठी महाविद्यालयांमध्ये मोहिम घेतानाच बॅनर किंवा हॉर्डिगव्दारेही संदेश दिले जातात. तरीही अपघात काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. 2015 मध्ये राज्यातील विविध अपघातांत 13 हजार 212 जणांचे बळी गेले होते. 2016 मधील जानेवारी ते मे महिन्यापर्यंत हाच आकडा 5 हजार 394 पर्यंत गेला आहे. नाशिक क्षेत्रातील अहमदनगर, धुळे, नंंदुरबार, जळगाव, नाशिक (ग्रामिण) 1 हजार 197 तर कोल्हापूर क्षेत्रातील कोल्हापूर, पुणे (ग्रामिण), सांगली, सातारा, सोलापूर (ग्रामिण)मध्ये 1 हजार 111 जणांचे बळी गेले असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर ठाणे क्षेत्र, अमरावती क्षेत्र आणि नागपूर क्षेत्राचा नंबर लागतो. पाच महिन्यात मुंबई शहरात तर 222 जणांचा मृत्यू रस्ते अपघातांत झाला आहे.