शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात नऊ महिन्यांत ५०० पेक्षा अधिक बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 05:16 IST

उच्च न्यायालयात माहिती : १५0 महिलांचा गर्भपात

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व अन्य आदिवासी विभागांतील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी उच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश देऊनही राज्य सरकारने काहीही ठोस पावले उचलली नसल्याचे चित्र समोर आले आहे.एप्रिल २०१८ पासून आतापर्यंत मेळघाट व अन्य आदिवासी विभागांत कुपोषणामुळे तब्बल ५०० हून अधिक बालकांचा मृत्यू झाला आणि १५० हून अधिक महिलांचा गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.

याचिकाकर्त्यांनी दिलेल्या माहितीनंतर मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. एन.एम. जामदार यांच्या खंडपीठाने म्हटले की, बालकांचा अशा प्रकारे कुपोषणाने मृत्यू व्हावा, असे कोणत्याही राज्य सरकारला वाटणार नाही. यावर राज्य सरकार पाषाणहृदयी व असंवेदनशील आहे. कुपोषणाची समस्या दूर करण्याबाबत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. त्यामुळे हा बालमृत्यू दर कमी व्हावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा, अशी विनंती याचिकाकर्ते राजेंद्र बर्मा यांनी न्यायालयाला केली. विदर्भातील अमरावतीच्या मेळघाट व राज्यातील अन्य आदिवासी विभागांतील मुलांना सकस आहार मिळावा व त्यांना आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. गेली १० वर्षे हे सर्व सामाजिक कार्यकर्ते मेळघाटसारख्या भागांतील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत आहेत.

महाराष्ट्रात सुमारे ९४ हजार बालके कुपोषित असल्याचे वृत्त याआधी प्रकाशित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर ही याचिका महत्त्वाची आहे.मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश देऊनही राज्य सरकारने काहीही केले नाही. तेथील लोकांवर वेळेत योग्य औषधोपचार होत नाहीत. उच्च न्यायालयातील दोन सुनावणींमधील तारखांमध्ये जास्त अंतर असेल तर डॉक्टर तेथे थांबत नाहीत. राज्य सरकारकडे मनुष्यबळ आहे आणि अन्य सर्व सुविधाही आहेत. मात्र, त्या लोकांपर्यंत पोहोचविण्याची इच्छा नाही, अशी या याचिकाकर्त्यांची तक्रार आहे.

मुंबईत एखाद्या मुलाचा मृत्यू झाला तर सीबीआय चौकशीची मागणी करण्यात येते. मात्र, आम्ही आदिवासी व कुपोषित मुलांच्या मूलभूत अधिकारांसाठी वर्षानुवर्षे लढत आहोत, त्यांना हा न्याय मिळत नाही, असे या याचिकाकर्त्यांनी सांगितले.

काय पावले उचलणार?न्यायालयाने केंद्र सरकारला व राज्य सरकारला ही कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी काय पावले उचलणार, याची माहिती पुढील सुनावणीत देण्याचे निर्देश दिले.मुलांना मराठी नाही आले, तर पुढे कसे होईल?

  • उच्च न्यायालयाने येथील मुलांच्या शैक्षणिक स्थितीची चौकशी केली असता याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले की, मुलांना शिक्षणाचा अधिकार असतानाही येथे शाळा नाहीत.अंगणवाडी सेविकांना २०० ते २५० रुपये इतके क्षुल्लक मानधन देऊन किमान २०० मुलांची जबाबदारी सोपविण्यात येते.
  • मुले मराठी विषयात नापास होतात. त्यावर न्यायालयाने मराठी शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. आपल्याच राज्यात मराठी शाळा बंद होण्याचे प्रमाण जास्त आहे. मुलांना मराठी आले नाही, तर पुढे कसे होईल, अशी चिंता न्यायालयाने व्यक्त केली.