शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

मराठवाड्यात आणखी ४ शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 5, 2014 03:42 IST

९० टक्के भाजलेल्या यल्लोरे यांच्यावर उस्मानाबाद येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला

औरंगाबाद : सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यातील आणखी चार शेतकऱ्यांनी स्वत:ला संपविले तर बीडमध्ये वडिलांचे हाल न पहावल्याने एका शेतकऱ्याच्या मुलाने मृत्यूला कवटाळले. गेल्या चार दिवसांत मराठवाड्यात १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्णातील लोहारा शहरातील मनोहर यल्लोरे (५६) यांनी शेतात सतत नापिकी, सोसायटी व बचतगटाचे कर्ज याला कंटाळून मंगळवारी रात्री अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. ९० टक्के भाजलेल्या यल्लोरे यांच्यावर उस्मानाबाद येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. कर्जाचा बोजा आणि पायाचे आॅपरेशन करण्यासाठी पैसे नसल्याने गुरुवारी दुपारी मेंढा (ता़उस्मानाबाद) येथील शंकर रामा लांडगे (६०) यांनी गळफास लावून आत्महत्या केली़ ते मणक्याच्या आजाराने त्रस्त होते़ सततच्या नापिकीमुळे माळरानावर असलेल्या चार एकरातून हातात काहीच उत्पन्न मिळत नसल्याने ते चिंतेत होते़ सतत होणारी नापिकी आणि दवाखान्याला होणारा खर्च याला कंटाळून लांडगे यांनी गळफास घेतला. बीड तालुक्यातील देवी बाभळगाव येथील श्रीराम सोपान जोगदंड (३८) या शेतकऱ्याच्या मुलाने कापसाचे पीक वाया गेल्याने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सांयकाळी घडली. औरंगाबाद जिल्ह्णातील सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव खुर्द येथील सांडू बनकर (४४) या शेतकऱ्याने बुधवारी रात्री नापिकी आणि कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना सतावत होती. याच विंवचनेतून बुधवारी रात्री घरात जाऊन गळफास घेतला. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बनकर यांच्यावर महाराष्ट्रग्रामीण बँकेचे १ लाख ३१ हजार ५४६ रुपये कर्ज, तर विविधकार्यकारी सोसायटीचे ७,६०० रुपये असे १ लाख ४० हजारांचे कर्ज आहे. (प्रतिनिधी)