शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

३00 पेक्षा अधिक हरकती, सूचना परिवहन आयुक्तांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 01:58 IST

ओला, उबेरसह अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांद्वारे चालविण्यात येणाऱ्या टॅक्सी सेवांचे नियमन करण्याच्या दृष्टीने ‘महाराष्ट्र सिटी टॅक्सी योजना-२0१६’चा मसुदा तयार करण्यात आला

मुंबई : ओला, उबेरसह अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांद्वारे चालविण्यात येणाऱ्या टॅक्सी सेवांचे नियमन करण्याच्या दृष्टीने ‘महाराष्ट्र सिटी टॅक्सी योजना-२0१६’चा मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यावर शासनाने जनतेकडून हरकती व सूचना मागविल्या असून, परिवहन आयुक्तालयाच्या ई-मेलवर ३00 पेक्षा जास्त हरकती व सूचना धडकल्या आहेत. हरकती व सूचनांसाठी ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. मोबाइल अ‍ॅपवर आधारित ओला, उबेर यास अन्य खासगी टॅक्सी आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सी यांच्यामधील सेवेचा फरक सध्या धूसर होत चालला आहे. प्रामुख्याने अ‍ॅपवर चालणाऱ्या मोठ्या संख्येतील टॅक्सी आॅल इंडिया पर्यटक परवान्यावर स्थानिक शहर टॅक्सीसारखी सेवा देत आहेत आणि टॅक्सीच्या नियमांमध्ये फरक असल्याने, त्याचे नियमन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठीच महाराष्ट्र सिटी टॅक्सी योजना नावाने मसुदा तयार केला आणि त्यावर हरकती, तसेच सूचना वांद्रे येथील परिवहन आयुक्त कार्यालयाच्या पत्त्यावर अथवा ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन केले. आतापर्यंत ३00 पेक्षा जास्त हरकती व सूचना ई-मेलवर प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ५ नोव्हेंबरनंतर सर्व हरकती व सूचनांचा आढावा घेण्यात येईल. आढावा घेतल्यानंतरच योजनेत काही बदल करणे आवश्यक आहे की नाही, त्याचा निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. सिटी टॅक्सी योजनेत टुरिस्ट टॅक्सींना स्थानिक पातळीवर सेवा देण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर, भाडेदराची कमाल व किमान मर्यादा शासनाकडून ठरविली जातानाच, त्याची मर्यादा वाहन प्रकारानुसार केली जाईल. यात प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भातही उपाय सुचविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)मोबाइल अ‍ॅपवर आधारित ओला, उबेर यास अन्य खासगी टॅक्सी आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सी यांच्यामधील सेवेचा फरक सध्या धूसर होत चालला आहे. प्रामुख्याने अ‍ॅपवर चालणाऱ्या मोठ्या संख्येतील टॅक्सी आॅल इंडिया पर्यटक परवान्यावर स्थानिक शहर टॅक्सीसारखी सेवा देत आहेत आणि टॅक्सीच्या नियमांमध्ये फरक असल्याने त्याचे नियमन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.