शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

राज्यात आणखी १० स्मार्ट शहरे

By admin | Updated: June 18, 2016 01:45 IST

स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट न पाहता राज्यातील १० शहरे स्मार्ट करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी कल्याणमध्ये केली. ३० जूनपर्यंत

कल्याण : स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट न पाहता राज्यातील १० शहरे स्मार्ट करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी कल्याणमध्ये केली. ३० जूनपर्यंत दुसऱ्या फेरीसाठी स्मार्ट सिटीसाठी प्रस्ताव सादर करायेच आहेत. या परिषदेला पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान, खासदार कपिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कल्याण-डोंबिवली पालिकेने कल्याण स्पोर्ट कॉम्प्लेक्स सभागृहात भरवलेल्या स्मार्ट सिटी शिखर परिषद तसेच प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. फडवणीस म्हणाले की, राज्यातील शहरांचे स्मार्ट सिटीत रूपांतर करण्यासाठी बड्या परदेशी आयटीबेस्ड कंपन्यांशी नुकतीच सरकारने चर्चा केली आहे. त्यातील आॅरेकल कंपनी प्रकल्पात सहभागी होऊन पैसा आणि सेवा पुरविणार आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेने सगळ््यात प्रथम ई-गव्हर्नन्स सेवा सुरू केली होती. त्यामुळे आॅरेकल कंपनी लॉस एन्जेलिस काउंटीच्या आर्किटेक्चरच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटीचा पथदर्शी प्रकल्प हाती घेणार आहे. सरकारचे प्रतिनिधी २२ जूनला कंपनीच्या बंगळूर येथील कार्यालयास भेट देणार आहेत. त्यानंतर जुलैमध्ये कंपनीशी सामंजस्य करार (एमयूओ) केला जाणार आहे.’ बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना शिक्षा होत नाही, तर नियमाने काम करणाऱ्यास त्रास होतो. बेकायदा बांधकामे नियमित करावी लागतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत बेकायदा बांधकामे होऊ दिली जाणार नाहीत, याकडे लक्ष दिले जाईल,’ असे फडणवीस यांनी सांगितले. या वेळी फडणवीस यांच्या हस्ते पालिकेने तयार केलेल्या मोबाइल अ‍ॅप्सचे उद्घाटन झाले. ‘राइट टू सर्व्हिस’ या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी या अ‍ॅप्सचा उपयोग होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. परिषदेत देशातील ‘स्मार्ट सिटी’त समावेश झालेल्या महापालिकांचे महापौर, आयुक्त, तसेच राज्य स्तरावरील अधिकारी उपस्थित आहेत. (प्रतिनिधी)क्लस्टर, एसआरए लवकरचकल्याण-डोंबिवली परिसरात धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित आहे, असा उच्चार महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केला. त्यावर फडणवीस यांनी ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टर व एसआरए योजना लवकर लागू केली जाईल, अशी ग्वाही दिली. ही योजना उल्हासनगर, अंबरनाथ परिसरासाठीही असेल, असे त्यांनी नमूद केले. नवी डम्पिंग ग्राउंड नाहीतकल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न बराच गाजत आहे, यावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात यापुढे महापालिका व पालिकांना डम्पिंग ग्राउंडसाठी परवानगी दिली जाणार नाही, याचा पुनरुच्चार केला. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट जागच्या जागीच लावली जाईल. त्याचे विकेंद्रीकरण केले जाईल, यावर महापालिकांनी भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. विकास व्हावा - पालकमंत्रीकल्याण -डोंबिवली-शीळ या २१ किमी रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. ठाण्यापर्यंत आलेली मेट्रो पुढे कल्याण भिवंडीपर्यंत देखील वाढवावी, अशी अपेक्षाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. लोकसहभाग वाढवा - महेताशासन-प्रशासन-नागरिक यांच्या समन्वयाशिवाय विकास प्रक्रि या पूर्ण होऊ शकत नाही. लोकसहभाग वाढविला तर विकास प्रक्रि या वेगाने होण्यास मदत होईल, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता म्हणाले.