शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
2
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
3
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
4
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
5
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
6
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
7
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
8
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
9
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
10
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
11
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
12
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
13
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
14
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
15
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
16
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
17
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
18
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
19
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
20
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची बँक खाती नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 07:01 IST

आॅनलाइन कारभार करण्यावर भर देणाऱ्या नवीन सरकारमुळे सर्व शिक्षा अभियानाचाच बोजवारा उडाला असून गरीब विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे

मुंबई : आॅनलाइन कारभार करण्यावर भर देणाऱ्या नवीन सरकारमुळे सर्व शिक्षा अभियानाचाच बोजवारा उडाला असून गरीब विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकत असलेल्या उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया मोफत गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे बंधनकारक आहे.मात्र, अद्याप ती जमा झालेली नाही. ही रक्कम जमा न झाल्याने या प्रकरणी शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी स्वत: लक्ष घातले असून सादर विद्यार्थ्यांची बँक खाती उघडून कार्यवाहीचा अहवाल १५ मेपर्यंत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.राज्यात २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सर्व घटकातील विद्यार्थी, अनुसूचित जाती, जमाती त्यासोबत दारिद्र्यरेषेखालील सर्व घटकांच्या ३७ लाख ६२ हजार २७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ मोफत गणवेशासाठी ४०० रुपयांची रक्कम त्या विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणे बंधनकारक होते. मात्र अद्याप १० लाख ९० हजार ६३३ मुलांचे बँक खातेच उघडले गेलेले नाही. राज्यातील ३५ जिल्हा परिषदा आणि २२ महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना हा निधी लागू आहे, पण शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र सुरू झाले तरी बँकेत खातेच नसल्याने लाखो विद्यार्थ्यांना हक्काचा गणवेश निधी मिळालेला नसल्याने गरीब पालकांना पदरमोड करून विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करावा लागला आहे. त्यामुळे नंदकुमार यांनी सूचना दिल्या आहेत.पालकांना विद्यार्थ्याचे बँक खाते उघडण्यास फार अडचणी येत आहेत. काही बँका शून्य रकमेवर जॉइंट अकाउंट उघडण्यास तयार नाहीत. या निधीची रक्कम पालकांच्या जन-धन अकाउंटवर ट्रान्सफर करण्यास सरकारने परवानगी दिली तर बरे होईल, असे सर्व शिक्षा अभियानाच्या एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.सर्व शिक्षा अभियान लाभार्थी३७६२०२७बँक खाते उघडलेले विद्यार्थी२६१७०६९बँक खाती न उघडलेले विद्यार्थी१०९०६३३