शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

मोरबे धरणग्रस्त अजूनही नागरी सुविधांपासून वंचित

By admin | Updated: April 26, 2016 03:17 IST

खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांची परवड अद्यापही सुरूच आहे. येथील सात आदिवासी वाड्यातील नागरिक गेली १५ वर्षे संघर्ष करूनही नागरी सुविधांपासून वंचित राहिले आहेत

आविष्कार देसाई,

अलिबाग- खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांची परवड अद्यापही सुरूच आहे. येथील सात आदिवासी वाड्यातील नागरिक गेली १५ वर्षे संघर्ष करूनही नागरी सुविधांपासून वंचित राहिले आहेत. आदिवासी समाजाला मरणयातना भोगाव्या लागत असल्याचे विदारक वास्तव समोर असतानाही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची बेफिकिरी अद्यापही सुरूच असल्याचे चित्र आहे.तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी येथे धरणाची उभारणी करण्याचे ठरले. सुमारे १९९४ साली धरण बांधण्यात आले. खालापूर तालुक्यातील चौक येथील पारकर बोरगाव, बौध्दवाडी, पिटकर वाडी, उंबरणे वाडी, अरकस वाडी, बोरगाव, नानीवली, नमऱ्याची वाडी, नढाळ वाडी, ओरशे कातकरवाडी, मोरबे कातकरवाडी, नढाळ नवीन, पडीर, कोयेने गाव या गाव वाड्यातील नागरिकांच्या जमिनी या धरणामध्ये गेल्या. त्यावेळी त्यांना तीन ते पाच हजार रुपये एकरी या दराने जमिनी विकाव्या लागल्या होत्या. जमिनी घेताना पुनर्वसन करण्याचे आश्वासन प्रशासन आणि सरकारने दिले होते. १५ वर्षे उलटून गेली तरी, वाड्या-वस्त्यांवर वीज पोचलेली नाही, रस्ते शोधूनही सापडणार नाहीत, गावठाण नाही, मैदान नाही, जागेची मोजणी झालेली नाही. स्मशानभूमीचाही मुद्दा आहे. अलिकडेच संघर्ष करून पाणी मिळाले आहे. प्रशासनही ठोस निर्णय घेत नसल्याचे मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेचे अध्यक्ष अंकुश वाघ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.