शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

मोरबे धरणग्रस्त अजूनही नागरी सुविधांपासून वंचित

By admin | Updated: April 26, 2016 03:17 IST

खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांची परवड अद्यापही सुरूच आहे. येथील सात आदिवासी वाड्यातील नागरिक गेली १५ वर्षे संघर्ष करूनही नागरी सुविधांपासून वंचित राहिले आहेत

आविष्कार देसाई,

अलिबाग- खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांची परवड अद्यापही सुरूच आहे. येथील सात आदिवासी वाड्यातील नागरिक गेली १५ वर्षे संघर्ष करूनही नागरी सुविधांपासून वंचित राहिले आहेत. आदिवासी समाजाला मरणयातना भोगाव्या लागत असल्याचे विदारक वास्तव समोर असतानाही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची बेफिकिरी अद्यापही सुरूच असल्याचे चित्र आहे.तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी येथे धरणाची उभारणी करण्याचे ठरले. सुमारे १९९४ साली धरण बांधण्यात आले. खालापूर तालुक्यातील चौक येथील पारकर बोरगाव, बौध्दवाडी, पिटकर वाडी, उंबरणे वाडी, अरकस वाडी, बोरगाव, नानीवली, नमऱ्याची वाडी, नढाळ वाडी, ओरशे कातकरवाडी, मोरबे कातकरवाडी, नढाळ नवीन, पडीर, कोयेने गाव या गाव वाड्यातील नागरिकांच्या जमिनी या धरणामध्ये गेल्या. त्यावेळी त्यांना तीन ते पाच हजार रुपये एकरी या दराने जमिनी विकाव्या लागल्या होत्या. जमिनी घेताना पुनर्वसन करण्याचे आश्वासन प्रशासन आणि सरकारने दिले होते. १५ वर्षे उलटून गेली तरी, वाड्या-वस्त्यांवर वीज पोचलेली नाही, रस्ते शोधूनही सापडणार नाहीत, गावठाण नाही, मैदान नाही, जागेची मोजणी झालेली नाही. स्मशानभूमीचाही मुद्दा आहे. अलिकडेच संघर्ष करून पाणी मिळाले आहे. प्रशासनही ठोस निर्णय घेत नसल्याचे मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेचे अध्यक्ष अंकुश वाघ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.