शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

उकाड्याने मुंबईकर त्रस्त

By admin | Updated: June 13, 2016 05:25 IST

शनिवारी मुंबई आणि उपनगरांत कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाने रविवारी मात्र विश्रांती घेतली.

मुंबई : शनिवारी मुंबई आणि उपनगरांत कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाने रविवारी मात्र विश्रांती घेतली. परिणामी वातावरणात झालेल्या किंचितशा बदलाने उकाड्यात वाढ झाली आणि मुंबईकर पुन्हा एकदा घामाने हैराण झाले. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीमुळे मान्सून मुंबईत दाखल होईपर्यंत तुरळक सरी पडतील, अशी आशा मुंबईकरांना होती. प्रत्यक्षात मात्र शनिवारच्या पावसानंतर रविवारी शहराकडे पावसाच्या ढगांनी पाठ फिरवली. तरीही येत्या २४ तासांत शहर आणि उपनगरांत मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवल्याने सोमवारी शहरात पुन्हा सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी पावसाची उत्तर सीमा रविवारी कायम होती. पुढील तीन दिवसांत नैर्ऋत्य मोसमी पावसाची वाटचाल मध्य व उत्तर बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, ईशान्यकडील राज्यांच्या काही भागात होण्यास परिस्थिती अनुकूल आहे. मागील २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. राज्यात ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागत असली तरी कोकण-गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. काही भागात कमाल तापमानात घट झाली आहे. (प्रतिनिधी)