शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

लेखकांची स्मारकं पुस्तकात दडलेली

By admin | Updated: January 11, 2017 03:30 IST

थोर नाटककार राम गणेश गडकरी यांचे साहित्य कळायला काहीसे कठीण आहे,

पुणे : थोर नाटककार राम गणेश गडकरी यांचे साहित्य कळायला काहीसे कठीण आहे, कोणतेही पात्र मग ते ‘राजसंन्यास’मधले का असेना, स्वल्पविराम, पूर्णविराम, दोन जागांमधील पॉज या गोष्टी वाचकाला उमगल्या तर त्यांना जे म्हणायचं आहे ते वाचकांपर्यंत योग्यरीत्या पोहोचते. त्यामुळे ‘राजसंन्यास’मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांची बदनामी झाली असे जे वाटते ते अल्पमतीप्रमाणे नसावे, अशी टीका करीत, अशा घटनांमुळे रसिकांच्या मनातील गडकरी यांच्या स्थानाला कुठेच धक्का लागणार नाही. कारण लेखक, कवी यांची स्मारकं त्यांच्या पुस्तकांतच दडलेली असतात, अशा शब्दांत गडकरींच्या पुतळा हटविण्याच्या घटनेचा नवनिर्वाचित नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर आणि साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी निषेध व्यक्त केला. संवाद पुणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी यांच्या वतीने ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जयंत सावरकर आणि ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांचा सत्कार डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी. डी. पाटील यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. याप्रसंगी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, सचिन इटकर, भारत देसडला, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर आणि निकिता मोघे उपस्थित होते. कवी उद्धव कानडे यांनी दोन्ही संमेलनाध्यक्षांशी संवाद साधला, यामध्ये काहीशा वादग्रस्त मुद्द्यांचा चेंडूही ते त्यांच्या कोर्टात भिरकावत होते. मात्र, दोन्ही संमेलनाध्यक्ष संतुलन ढळू न देता अत्यंत संयमाने हा चेंडू पुन्हा त्यांच्याकडेच शिताफीने सरकवत होते. प्रश्न-उत्तराचा हा खेळ चांगलाच रंगला.डोंबिवलीच्या साहित्य संमेलनात अध्यक्षीय चिंतन काय असेल? असा प्रश्न दोन्ही संमेलनाध्यक्षांना विचारण्यात आला, त्यावर डॉ. काळे यांनी परीक्षेच्या आधीच पेपर फोडणार नाही, असे मिश्किल उत्तर दिले. पण एक मात्र आहे, की संमेलनात वाङ्मयीन संस्कृतीचे चिंतन असायला हवे. भाषेशिवाय कोणत्याही वाङ्मयाची निर्मिती होत नाही आणि साहित्याचा रसिकांनी आस्वाद घेतला नाही तर ते काचेच्या बंद पेटीतच राहील, हा भाग तपशीलासह मांडण्याचा प्रयत्न असेल.सावरकर यांनी पूर्वीच्या संंमेलनाध्यक्षांनी काय केले हे मला माहीत नाही. मात्र, रंगभूमीवर काम न केलेलेच काही घडले नाही असे गळे काढतात. प्रत्येक गोष्टीला चढ-उतार असतात, काळाचा महिमा असतो. ज्या गोष्टींवर टीका करतो ती गोष्ट उद्या हवीशी वाटू शकते, याकडे लक्ष वेधून सावरकर यांनी सध्याचे नाटकाचे दर परवडवणारे नाहीत, मध्यमवर्गीयांचे करमणुकीचे एक बजेट ठरलेले असते त्या बाहेर त्यांना जाता येत नाही, त्यामुळे आस्वाद घेण्याची प्रक्रिया किती रसिक करू शकतात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नट, निर्माते आणि ठेकेदारांनी नाट्यगृहांच्या दुरुस्तीेसाठी सरकारवर विसंबून न राहाता ही नाट्यगृहे व्यवस्थित ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.(प्रतिनिधी)