शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यावर अमित शाहांना हसू आवलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
2
IND vs SA 2nd Test : पंतनही गमावला टॉस! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
3
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
4
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
5
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
6
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
7
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
8
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
9
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
10
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
11
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
12
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
13
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
14
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
15
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
16
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
17
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
18
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
19
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

स्मारकासाठी धोरण धाब्यावर?

By admin | Updated: July 2, 2015 03:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण धाब्यावर बसवायचे की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकरिता महापौर बंगला देऊन शिवसेनेला खुश करायचे या कात्रीत मुख्यमंत्री देवेंद्र

संदीप प्रधान , मुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण धाब्यावर बसवायचे की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकरिता महापौर बंगला देऊन शिवसेनेला खुश करायचे या कात्रीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडकल्याने स्मारकाचा निर्णय रखडला आहे. महापौर बंगल्याची रेडीरेकनरनुसार किंमत २०० कोटी रुपये असून ही मालमत्ता कौटुंबिक ट्रस्टला देण्याचा शिवसेनेचा आग्रह असल्याचे समजते.मागील केंद्र सरकारमधील हवाई वाहतूकमंत्री अजित सिंह यांनी दिल्लीतील त्यांच्या ताब्यातील बंगला सोडण्यास नकार देताना या बंगल्यात आपले पिताश्री चौधरी चरणसिंग यांचे वास्तव्य असल्याने त्यांचे स्मारक उभारण्याकरिता हा बंगला देण्याची मागणी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडे केली होती. त्यावेळी मोदी सरकारने शासकीय बंगले व वास्तू कुठल्याही व्यक्तीच्या स्मारकाकरिता यापुढे दिल्या जाणार नाहीत, असा आदेश काढला. केंद्र सरकारने काढलेला हा आदेश त्या सरकारच्या वास्तूंना लागू असला तरी राज्यातही भाजपाप्रणीत सरकार असल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकरिता महापौर बंगला देताना मोदींच्या भूमिकेला धाब्यावर बसवायचे किंवा कसे याचा निर्णय फडणवीस यांना घ्यावा लागणार आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्र्यांना याबाबत सादर केलेल्या अहवालात शिवसेनेची मागणी असलेला महापौर बंगला देण्याची शिफारस केली आहे. त्याचवेळी मोदी सरकारच्या धोरणाकडेही लक्ष वेधले आहे.या स्मारकासाठी सार्वजनिक ट्रस्ट स्थापन करावा अथवा महापालिकेला स्मारक उभे करण्यास मान्यता देण्यात यावी, असे महापालिका प्रशासन व शासनाचे मत आहे. परंतु भविष्यात महापालिकेत सत्ताबदल झाला तर शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची आबाळ होईल त्यामुळे कौटुंबिक ट्रस्टला स्मारकाकरिता महापौर बंगला देण्याचा शिवसेनेचा आग्रह असल्याकडे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. त्यामुळे आता कौटुंबिक ट्रस्टला ही मालमत्ता आंदण द्यायची का, याचाही निर्णय मुख्यमंत्र्यांना करावा लागणार आहे.काय आहे आदेश?शासकीय बंगले व वास्तू कुठल्याही व्यक्तीच्या स्मारकाकरिता यापुढे दिल्या जाणार नाहीत, असा आदेश काढला. या आदेशाचे पालन करायचे की शिवसेनेला खुश करायचे, या कात्रीत राज्य सरकार अडकले आहे.