शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

मान्सून पोहोचलाय घाटमाथ्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 04:38 IST

कोकणच्या किनारपट्टीत दाखल झालेला मान्सून शनिवारी घाटमाथ्यावर कोल्हापूरमध्ये दाखल झाला. कोल्हापूर परिसरात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे/मुंबई : कोकणच्या किनारपट्टीत दाखल झालेला मान्सून शनिवारी घाटमाथ्यावर कोल्हापूरमध्ये दाखल झाला. कोल्हापूर परिसरात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. येत्या दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्र व्यापेल आणि मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होईल, असा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मान्सूनने मध्य अरबी समुद्र, कोकणचा आणखी काही भाग, कर्नाटकाचा आणखी काही भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, कर्नाटकातील गदगपर्यंत मजल मारली आहे़ गोव्यासह कोकणात धुवाधार पाऊस पडत आहे. गुरुवार, शुक्रवार अशा सलग दोन रात्री मुंबई शहर आणि उपनगरांतही दमदार पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. नवी मुंबई, ठाणे परिसराला पावसाने झोडपून काढले. लालबाग, परळ, वरळी, दादर, माहीमसह माटुंगा येथे शुक्रवारी रात्री उशीरा पावसाने जोरदार हजेरी लावली. वांद्रे-कुर्ला संकुलासह कुर्ला, घाटकोपर येथेही सरी कोसळल्या. शनिवारी सकाळीही घाटकोपर, कुर्ला, सायन, माटुंगा, दादर आणि लालबागसह दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली. दिवसभर मुंबईवर ढग दाटून आल्याचे चित्र होते.विदर्भातही काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यात दुपारी अडीचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. देसाईगंज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात विक्रीसाठी उघड्यावर ठेवलेले शेतकऱ्यांचे १२ क्विंटल धान भिजले. तसेच काही धान वाहून गेले. कोरा, झडशी, पवनार, नंदोरी व आष्टी (शहीद) भागात पाऊस आला. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यात सर्वाधिक २९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. भंडारा, गोंदिया, वर्धा, आणि अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात पावसाने हजेरी लावली.बाप-लेकाचा मृत्यूनाशिक जिल्ह्यात चोंढी (ता. सिन्नर) येथे वीज पडून बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला तर पुतण्या जखमी झाला. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. रघुनाथ कोंडाजी मवाळ (वय ४५) व त्यांचा मुलगा मयूर (१८) अशी मृतांची नावे आहेत. पाऊस सुरु झाल्यामुळे चारा झाकण्यासाठी हे तिघे घरातून बाहेर आले. चाऱ्यावर प्लॅस्टिकचा टाकत असताना वीज कडाडली व त्यांच्या अंगावर कोसळली. पुतण्या प्रशांत हाही भाजला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विदर्भात चार जण दगावले : पूजा करण्यासाठी गावालगतच्या शेतात गेलेल्या आदिवासी कुटुंबियांवर वीज पडून चार जण दगावले तर सात जण जखमी झाले. गडचिरोली जिल्ह्यातील धन्नूर (ता. मुलचेरा) येथे ही दुर्घटना घडली. शामराव मुन्नी कन्नाके (५८), त्यांचा मुलगा रितेश (२५), जानकीराम वारलू तोडसाम (४८) आणि संदीप शिवराम कुसनाके (३२) अशी मृतांची नावे आहेत.