शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

मान्सून पोहोचलाय घाटमाथ्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 04:38 IST

कोकणच्या किनारपट्टीत दाखल झालेला मान्सून शनिवारी घाटमाथ्यावर कोल्हापूरमध्ये दाखल झाला. कोल्हापूर परिसरात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे/मुंबई : कोकणच्या किनारपट्टीत दाखल झालेला मान्सून शनिवारी घाटमाथ्यावर कोल्हापूरमध्ये दाखल झाला. कोल्हापूर परिसरात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. येत्या दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्र व्यापेल आणि मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होईल, असा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मान्सूनने मध्य अरबी समुद्र, कोकणचा आणखी काही भाग, कर्नाटकाचा आणखी काही भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, कर्नाटकातील गदगपर्यंत मजल मारली आहे़ गोव्यासह कोकणात धुवाधार पाऊस पडत आहे. गुरुवार, शुक्रवार अशा सलग दोन रात्री मुंबई शहर आणि उपनगरांतही दमदार पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. नवी मुंबई, ठाणे परिसराला पावसाने झोडपून काढले. लालबाग, परळ, वरळी, दादर, माहीमसह माटुंगा येथे शुक्रवारी रात्री उशीरा पावसाने जोरदार हजेरी लावली. वांद्रे-कुर्ला संकुलासह कुर्ला, घाटकोपर येथेही सरी कोसळल्या. शनिवारी सकाळीही घाटकोपर, कुर्ला, सायन, माटुंगा, दादर आणि लालबागसह दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली. दिवसभर मुंबईवर ढग दाटून आल्याचे चित्र होते.विदर्भातही काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यात दुपारी अडीचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. देसाईगंज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात विक्रीसाठी उघड्यावर ठेवलेले शेतकऱ्यांचे १२ क्विंटल धान भिजले. तसेच काही धान वाहून गेले. कोरा, झडशी, पवनार, नंदोरी व आष्टी (शहीद) भागात पाऊस आला. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यात सर्वाधिक २९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. भंडारा, गोंदिया, वर्धा, आणि अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात पावसाने हजेरी लावली.बाप-लेकाचा मृत्यूनाशिक जिल्ह्यात चोंढी (ता. सिन्नर) येथे वीज पडून बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला तर पुतण्या जखमी झाला. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. रघुनाथ कोंडाजी मवाळ (वय ४५) व त्यांचा मुलगा मयूर (१८) अशी मृतांची नावे आहेत. पाऊस सुरु झाल्यामुळे चारा झाकण्यासाठी हे तिघे घरातून बाहेर आले. चाऱ्यावर प्लॅस्टिकचा टाकत असताना वीज कडाडली व त्यांच्या अंगावर कोसळली. पुतण्या प्रशांत हाही भाजला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विदर्भात चार जण दगावले : पूजा करण्यासाठी गावालगतच्या शेतात गेलेल्या आदिवासी कुटुंबियांवर वीज पडून चार जण दगावले तर सात जण जखमी झाले. गडचिरोली जिल्ह्यातील धन्नूर (ता. मुलचेरा) येथे ही दुर्घटना घडली. शामराव मुन्नी कन्नाके (५८), त्यांचा मुलगा रितेश (२५), जानकीराम वारलू तोडसाम (४८) आणि संदीप शिवराम कुसनाके (३२) अशी मृतांची नावे आहेत.