शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

अखेर बरसला मान्सून!

By admin | Updated: July 4, 2014 01:19 IST

येणार येणार म्हणून ज्याची चातकासारखी वाट बघणे सुरू होते तो मान्सून अखेर गुरुवारी नागपुरात बरसला. गेल्या एक महिन्यापासून उकाड्याने त्रस्त असणाऱ्या नागपूरकरांना आज दिलासा मिळाला.

वातावरणात गारवा : उकाड्यापासून सुटका नागपूर : येणार येणार म्हणून ज्याची चातकासारखी वाट बघणे सुरू होते तो मान्सून अखेर गुरुवारी नागपुरात बरसला. गेल्या एक महिन्यापासून उकाड्याने त्रस्त असणाऱ्या नागपूरकरांना आज दिलासा मिळाला.जून महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. मात्र मान्सून उशिरा दाखल झाला. १९ तारखेला तो विदर्भात दाखल झाला खरा, पण बरसला मात्र नाही. उलट उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत गेली. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला तर शहरात उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले. त्यामुळे रोज पावसाची वाट बघणे सुरू होते. आज येणार, उद्या बरसणार अशी प्रतीक्षा सुरू होती. मात्र हवामान खात्याचे अंदाज त्याला दुजोरा देणारे नव्हते. बुधवारी मुंबईत पावसाने हजेरी लावल्यावर आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. मुंबईत पाऊस झाल्यावर सर्वसाधारणपणे दोन दिवसाने विदर्भात पाऊस पडतो. यावेळी दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बरसलेल्या धारांमुळे नागपूरकर सुखावले.दुपारपर्यंत कडाक्याचे ऊन असताना नंतर वातावरणात बदल होत गेला. दुपारनंतर शहराच्या काही भागात हलक्या सरीही आल्या. पण त्यामुळे फक्त रस्तेच ओले झाले. मात्र रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणातील उकाडा दूर झाला. कधी जोरदार तर कधी रिपरिप असे पावसाचे स्वरूप होते. रात्री ११ वाजेपर्यंत तो सुरूच होता. हवामान खात्याने पुढच्या २४ तासातही पावसाची शक्यता वर्तविली आहे. (प्रतिनिधी)