शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

वेग मंदावल्याने मान्सून लांबणीवर

By admin | Updated: May 25, 2015 03:46 IST

अंदमानात १६ मे रोजी दाखल झालेला मान्सून २१ मे रोजी काही अंशी पुढे सरकला खरा; पण त्यानंतर आता त्याचा पुढील प्रवास मंदावला आहे.

मुंबई : अंदमानात १६ मे रोजी दाखल झालेला मान्सून २१ मे रोजी काही अंशी पुढे सरकला खरा; पण त्यानंतर आता त्याचा पुढील प्रवास मंदावला आहे. मागील तीन दिवसांपासून मान्सूनची उत्तरेकडील सीमा कायम आहे. येत्या तीन दिवसांत मान्सूनचा पुढील प्रवास पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यावर आलेली उष्णतेची लाटही कायम असून विदर्भाला उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.भारतीय हवामान शास्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी नैऋत्य मौसमी पावसाची उत्तरेकडे वाटचाल झालेली नाही. त्यामुळे २१ मे रोजी असलेली नैऋत्य मौसमी पावसाची उत्तरी सीमा आजही कायम आहे. त्यानुसार, नैऋत्य मौसमी पावसाने संपूर्ण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग व नैऋत्य आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. पुढील तीन दिवस नैऋत्य मौसमी पावसाचे दक्षिणेकडील अरबी समुद्राचा आग्नेय भाग, मालदीव-कॉमोरिनचा भाग व दक्षिण मध्य बंगालच्या उपसागरात आगमन होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे उत्तरेकडून महाराष्ट्रावर वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याचा वेग कायम आहे. परिणामी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कमाल तापमानाच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. शिवाय येथील उष्णतेच्या लाटेत भरच पडत असून, त्यामुळे उष्माघाताचे बळी वाढत आहेत. विदर्भातील उष्ण लाटेसह कोकण-गोव्याच्या काही भागात, विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात व कोकण-गोव्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.(प्रतिनिधी)