शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

पावसाळ्यापूर्वी मुंबईची सफाई

By admin | Updated: May 9, 2015 01:42 IST

ऐन पावसाळ्यात कचऱ्याचा प्रश्न पेटत असल्याने मुंबईत या काळात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरते़ यामुळे टीकेचे धनी बनावे लागत असल्याने यंदा

मुंबई : ऐन पावसाळ्यात कचऱ्याचा प्रश्न पेटत असल्याने मुंबईत या काळात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरते़ यामुळे टीकेचे धनी बनावे लागत असल्याने यंदा पालिका प्रशासनाने खरबदारी म्हणून सर्व २४ वॉर्डांना पावसाळ्यापूर्वीच साफसफाईची ताकिद दिली आहे़ या मोहिमेवर नजर ठेवण्यासाठी विभाग अधिकारी आणि उपायुक्तांना रस्त्यावर उतरुन मुंबई स्वच्छ करुन घेण्यासाठी ३१ मे पर्यंतची डेडलाईनही देण्यात आली आहे़पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येते़ अनेकवेळा ठेकेदार हा गाळ काढून नाल्यांच्या तोंडावर ठेवतात़ हा कचरा उचलण्यास दिरंगाई झाल्यास पावसाळ्यात त्याची दुर्गंधी पसरु लागते़ त्यामुळे नाल्यांच्या तोंडावर साठलेला गाळ, बांधकामातून तयार झालेली दगड-मातीचा कचरा आणि ओला व सुका कचरा तत्काळ उचलला जावा, याची ताकिद अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी सर्व वॉर्डांना परिपत्रकाद्वारे दिली आहे़साफसफाईची ही मोहीम प्रत्येक वॉर्डात यशस्वी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त व उपायुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ सात परिमंडळाचे उपायुक्त व २४ वॉर्डांचे सहाय्यक आयुक्तांना स्वत: रस्त्यावर उतरुन कचरा उचलला जात असल्याची खातरजमा करावी लागणार आहे़ प्रामुख्याने नाल्यांमधील गाळ डंपिंग ग्राऊंडपर्यंत वेळेत पोहोचत असल्याकडे या अधिकाऱ्यांना बारकाईने लक्ष ठेवावे लागेल, असे परित्रकात निक्षून सांगण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)