शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

महाराष्ट्रापेक्षा मंगोलियाची जनता भाग्यवान - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 20, 2015 15:40 IST

मंगोलियाला उदारतेने कर्ज देणा-या पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील शेतकरी व जैतापूर प्रकल्पात भरडल्या गेलेल्यांबाबतीत दाखवली तर बरं होईल, अशी टीका टोला उद्धव ठाकरेंनी केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगोलियाला एक अब्ज डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा करून भारताच्या आर्थिक ताकदीची चुणूक दाखवली. मात्र हीच सढळता पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील शेतकरी व जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात भरडल्या जाणार्‍या कोकणी जनतेच्या बाबतीत दाखवली तर बरेच होईल असे सांगत शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यामुळे महाराष्ट्रापेक्षा मंगोलियाची जनता भाग्यवान म्हणावी लागेल. अशी टीका त्यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच मंगोलियाला भेट दिली, त्यावेळी त्यांनी मंगोलियाला एक अब्ज डॉलरची मदत देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या या निर्णयावरून त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेच त्यांना लक्ष्य केले आहे. 
दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होण्यासाठी पंतप्रधानांनी एक अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले. मंगोलियात पायाभूत सुविधांच्या विकासाची गरज आहे व ही जबाबदारी पंतप्रधानांनी कर्तव्य म्हणून स्वीकारली आहे. मात्र एक अब्ज डॉलर हा लहान आकडा नव्हे, त्याचे रुपयांत रुपांतर केल्यास  आकडा समोर येईल तो पाहून महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या हजारो शेतकर्‍यांचे आत्मे गोंधळून जातील, असे ठाकरेंनी अग्रलेखात म्हटले आहे.  सावकारी तसेच बँकांच्या कर्जविळख्याने महाराष्ट्रातील शेतकरी मेला आहे व मरतो आहे. गारपीटग्रस्त, अवकाळग्रस्त शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आजही आहे. महाराष्ट्रातून मदतीसाठी योग्य प्रस्ताव गेला नसल्याने शेतकरी मदतीविना तडफडतो आहे असे खुद्द केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जाहीर केले. त्यामुळे खर्‍याचे खोटे व खोट्याचे खरे करण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही, पण महाराष्ट्रापेक्षा मंगोलियाची जनता भाग्यवान म्हणावी लागेल. यापूर्वी भूतान वगैरे राष्ट्रांनाही आमच्या पंतप्रधानांनी भरघोस आर्थिक मदत केली आहे. शेजारच्या लहान व गरीब राष्ट्रांना मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे व ती एक विदेश नीतीसुद्धा आहे. लहान व विकसनशील राष्ट्रांना हिंदुस्थानसारख्या मोठ्या राष्ट्रांकडून ही अपेक्षा असते व आमचे पंतप्रधान बाहेर जातात तेव्हा अशा राष्ट्रांना सढळहस्ते मदत करीत असतात. मात्र हीच सढळता व सहृदयता आमच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या बाबतीत दाखवली व जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात भरडल्या जाणार्‍या कोकणी जनतेच्या बाबतीत दाखवली तर बरे होईल, असा टोला त्यांनी लेखात हाणला आहे. केंद्राच्या व महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी मिळून शेतकर्‍यांच्या आत्महत्या व रखडलेल्या मदतीचा प्रश्‍न तेवढा निकाली लावावा हीच प्रार्थना, असेही त्यांनी लेखात नमूद केले आहे.