शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रापेक्षा मंगोलियाची जनता भाग्यवान - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 20, 2015 15:40 IST

मंगोलियाला उदारतेने कर्ज देणा-या पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील शेतकरी व जैतापूर प्रकल्पात भरडल्या गेलेल्यांबाबतीत दाखवली तर बरं होईल, अशी टीका टोला उद्धव ठाकरेंनी केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगोलियाला एक अब्ज डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा करून भारताच्या आर्थिक ताकदीची चुणूक दाखवली. मात्र हीच सढळता पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील शेतकरी व जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात भरडल्या जाणार्‍या कोकणी जनतेच्या बाबतीत दाखवली तर बरेच होईल असे सांगत शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यामुळे महाराष्ट्रापेक्षा मंगोलियाची जनता भाग्यवान म्हणावी लागेल. अशी टीका त्यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच मंगोलियाला भेट दिली, त्यावेळी त्यांनी मंगोलियाला एक अब्ज डॉलरची मदत देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या या निर्णयावरून त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेच त्यांना लक्ष्य केले आहे. 
दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होण्यासाठी पंतप्रधानांनी एक अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले. मंगोलियात पायाभूत सुविधांच्या विकासाची गरज आहे व ही जबाबदारी पंतप्रधानांनी कर्तव्य म्हणून स्वीकारली आहे. मात्र एक अब्ज डॉलर हा लहान आकडा नव्हे, त्याचे रुपयांत रुपांतर केल्यास  आकडा समोर येईल तो पाहून महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या हजारो शेतकर्‍यांचे आत्मे गोंधळून जातील, असे ठाकरेंनी अग्रलेखात म्हटले आहे.  सावकारी तसेच बँकांच्या कर्जविळख्याने महाराष्ट्रातील शेतकरी मेला आहे व मरतो आहे. गारपीटग्रस्त, अवकाळग्रस्त शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आजही आहे. महाराष्ट्रातून मदतीसाठी योग्य प्रस्ताव गेला नसल्याने शेतकरी मदतीविना तडफडतो आहे असे खुद्द केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जाहीर केले. त्यामुळे खर्‍याचे खोटे व खोट्याचे खरे करण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही, पण महाराष्ट्रापेक्षा मंगोलियाची जनता भाग्यवान म्हणावी लागेल. यापूर्वी भूतान वगैरे राष्ट्रांनाही आमच्या पंतप्रधानांनी भरघोस आर्थिक मदत केली आहे. शेजारच्या लहान व गरीब राष्ट्रांना मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे व ती एक विदेश नीतीसुद्धा आहे. लहान व विकसनशील राष्ट्रांना हिंदुस्थानसारख्या मोठ्या राष्ट्रांकडून ही अपेक्षा असते व आमचे पंतप्रधान बाहेर जातात तेव्हा अशा राष्ट्रांना सढळहस्ते मदत करीत असतात. मात्र हीच सढळता व सहृदयता आमच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या बाबतीत दाखवली व जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात भरडल्या जाणार्‍या कोकणी जनतेच्या बाबतीत दाखवली तर बरे होईल, असा टोला त्यांनी लेखात हाणला आहे. केंद्राच्या व महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी मिळून शेतकर्‍यांच्या आत्महत्या व रखडलेल्या मदतीचा प्रश्‍न तेवढा निकाली लावावा हीच प्रार्थना, असेही त्यांनी लेखात नमूद केले आहे.