शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

आघाडीची घडी अखेर बसली!

By admin | Updated: December 8, 2015 02:33 IST

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी निवडून द्यायच्या ८ जागांपैकी ७ जागांवर आघाडी करून लढण्याची घोषणा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी सोमवारी केली.

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी निवडून द्यायच्या ८ जागांपैकी ७ जागांवर आघाडी करून लढण्याची घोषणा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी सोमवारी केली. यापैकी काँग्रेस ४ तर राष्ट्रवादी ३ जागा लढवेल. पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे मुंबईतील २पैकी १ जागा लढविली जाणार नाही. विधान परिषद निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची बैठक झाली. तीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवर शिक्कामोर्तब करीत ७ जागांपैकी मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार आणि नागपूर या ४ जागा काँग्रेसने तर सोलापूर, अहमदनगर, अकोला-बुलडाणा-वाशिम या ३ जागा राष्ट्रवादीने लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. खा. चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या चारही जागांवरील उमेदवारांच्या नावाचा प्रस्ताव अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे पाठविण्यात आला आहे. मंगळवारी उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या ३ जागांपैकी सोलापूरमध्ये विद्यमान आमदार दीपक साळुंखे पाटील व अहमदनगरमधून अरुणकाका जगताप यांची उमेदवारी जाहीर केली. अकोला-बुलडाणा- वाशिम या जागेची उमेदवारी सोमवारी जाहीर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)मुंबईतील जागेसाठी काँग्रेसकडून नारायण राणे उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी चर्चा असतानाच विद्यमान आमदार भाई जगताप यांनी अर्ज दाखल केला. उमेदवारांची अधिकृत घोषणा बाकी असली तरी जगताप यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. सेनेकडून मंत्री रामदास कदम यांनी मुंबईतून उमेदवारी अर्ज दाखल केला.