शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

आरोग्य संचालकपदी मोहन जाधव

By admin | Updated: April 14, 2016 04:02 IST

सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्या निलंबनानंतर संचालकपदाचा पदभार बुधवारी डॉ. मोहन जाधव यांच्याकडे देण्यात आला. मॅटपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक टप्प्यावर

सर्वोच्च न्यायालयापर्यंतची लढाई : जाधवांना न्याय मात्र मुख्यमंत्र्यांकडून मिळाला!

- अतुल कुलकर्णी,  मुंबई सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्या निलंबनानंतर संचालकपदाचा पदभार बुधवारी डॉ. मोहन जाधव यांच्याकडे देण्यात आला. मॅटपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक टप्प्यावर लढाई जिंकलेल्या डॉ. जाधव यांना अखेर मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून दिला.निलंबित संचालक डॉ. सतीश पवार यांनी केवळ औषध खरेदीत मनमानी केली नाही, पण संचालकपदापर्यंत पोहोचण्यासाठी आपणच पात्र ठरले पाहिजे, अशा प्रकारे निवडीचे निकष आयत्या वेळी बदलल्याचे स्पष्ट निष्कर्ष सर्वच न्यायालयांनी काढले होते. त्यामुळे सर्व प्रक्रियेत डॉ. पवार यांच्याहून अधिक शैक्षणिक अर्हता असलेले व सेवाज्येष्ठता असूनही डॉ. जाधव डावलले गेले होते. लोकमतने औषध खरेदीचा भांडाफोड केल्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला आणि त्यात डॉ. पवार यांना निलंबित करण्यात आले. त्यांचा पदभार कोणाला द्यायचा यावर विभागात मोठी खलबते झाली. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सेवा ज्येष्ठतेनुसार यादी तयार करून मुख्यमंत्र्यांकडे फाइल पाठवली. त्या फायलीत डॉ. अर्चना पाटील (सतीश पवार यांच्या पत्नी), डॉ. मुकूंद डिग्गीकर, डॉ. शशिकांत जाधव, डॉ. साधना तायडे आणि कांचन जगताप यांची नावे होती. त्यात पाटील, जाधव आणि तायडे हे औषध खरेदी समितीचे सदस्य होते, त्यांचीच चौकशी आता होणार आहे; त्यामुळे ही नावे घेता येणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली, तर डॉ. डिग्गीकर यांची दुसऱ्या एका खरेदी घोटाळ्यात विभागीय चौकशी सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलींद म्हैसकर यांनी निदर्शनास आणून दिले. विभागाच्या यादीत कोठेही नाव नसलेल्या डॉ. मोहन जाधव यांच्या लढ्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली आणि त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात फाईलवर जाधव यांच्याकडे पदभार द्यावा, असा निर्णय दिला. दरम्यान आज विधानसभेत औषध खरेदीवरुन अनेक सदस्यांनी सरकारला धारेवर धरले. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी चर्चेला उत्तर दिले.अन्यायाचा असाही शेवटविधिमंडळात औषध घोटाळ्यावरून घणाघाती भाषणे झाली, राज्याच्या आरोग्य विभागाचा प्रमुख निलंबित करण्याची वेळ आल्याने सरकारच्या प्रतिमेला तडा गेला, प्रधान सचिव भगवान सहाय यांची चौकशी समिती नेमावी लागली. त्यातून अनेक सत्ये समोर येतीलही. मात्र २००४ पासून अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या एका अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या ठाम भूमिकेमुळे या गदारोळातही न्याय मिळाला व मुख्यमंत्र्यांची अत्यंत संवेदनशील प्रतिमाही समोर आली.